शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रणवदांची संघवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:38 IST

प्रणव मुखर्जी हे ७ जूनला संघाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यास शिबिरात समारोपाचे पाहुणे म्हणून येत असल्याच्या घटनेने एका जुन्या वादाला देशात नवा रंग चढविला जात आहे

माजी राष्टÑपती प्रणव मुखर्जी हे ७ जूनला संघाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यास शिबिरात समारोपाचे पाहुणे म्हणून येत असल्याच्या घटनेने एका जुन्या वादाला देशात नवा रंग चढविला जात आहे. प्रणव मुखर्जी ज्या दिवशी राष्ट्रपती झाले त्याच दिवशी ते पक्षातीत झाले व त्यांचा कोणताही पक्ष राहिला नाही. त्याआधीचे त्यांचे आयुष्य काँग्रेस पक्षात व त्यातील वरिष्ठ पदे भूषविण्यात गेले. ते देशाचे अर्थमंत्री होते, गृहमंत्री, परराष्टÑमंत्री, पक्षाचे प्रवक्ते आणि त्याच्या धोरणाची आखणी करणारेही ते एक नेते होते. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांची भूमिका पक्षनिरपेक्ष व अपक्ष झाली. त्यामुळे ते आज संघाच्या किंवा उद्या कुणा संघटनेच्या व्यासपीठावर गेले तर त्याला कुणी हरकत घेण्याचे कारण नाही. संघ ही काँग्रेसविरोधी संघटना आहे आणि तिचा इतिहासही तसाच आहे. मात्र तिच्यावर बंदी नाही. त्या संघटनेने जन्माला घातलेल्या पक्षाचे सरकार लोकांनी केंद्रात सत्तेवर आणले आहे. अशावेळी प्रणव मुखर्जींनी त्या संघटनेचे निमंत्रण स्वीकारले असेल तर त्याचा एवढा गदारोळ करण्याचे कारण नाही. मुखर्जींंनी त्यांच्या भूमिका सदैव धर्मनिरपेक्ष राखल्या आहेत व त्यांच्याशी ते प्रामाणिक आहे. संघात पाऊल ठेवल्याने त्यांचा त्यांना विसर पडेल असे समजणे हा बालीशपणा आहे. एवढ्यावरही ते त्या विसरले तर उतारवयात त्यांच्या बुद्धीने घेतलेले वळण म्हणून ते साऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. फार पूर्वी नेपाळच्या राजाने संघाचे असे निमंत्रण स्वीकारले होते. आंतरराष्ट्रीय राजशिष्टाचाराचे फारसे ज्ञान नसलेल्या त्या राजाला तेव्हा एका परक्या सत्तेने दुसºया देशातील राजकारणात असा हस्तक्षेप करू नये अशी समज परराष्टÑ खात्याने दिल्यानंतर त्याने तो दौरा रद्द केला होता. प्रणव मुखर्जी परके नाहीत आणि त्यांना साºयांसारखेच मतस्वातंत्र्य व संचारस्वातंत्र्यही आहे. शिवाय त्यांच्याएवढा नेता जेव्हा असा निर्णय घेतो तेव्हा त्यामागे त्याचा निश्चित विचारही असणार. प्रणव मुखर्जी हे एस.एम. कृष्णा नाहीत आणि ते कोणत्या मोहाने तेथे जात नाहीत. तसेही राष्ट्रपतीचे पद भूषविलेल्या व्यक्तीला नंतरच्या काळात कोणतेही राजकीय वा खासगी पद स्वीकारता येत नाही. प्रणव मुखर्जींना व्यासपीठांचीही गरज नाही. त्यांना ती जगभर उपलब्ध आहेत. खरे तर त्यांना बोलविण्यामागे संघाचा हेतू कोणता याचीच चर्चा या तुलनेत अधिक होणे आवश्यक आहे. आपली नकारात्मक प्रतिमा काहीशी धुवून काढणे, गांधी खुनाच्या आरोपापासून आताच्या धर्मांध प्रतिमेचे आपल्याला चिकटलेले लेपन जरा स्वच्छ करणे किंवा आम्ही फक्त सांस्कृतिक आहोत हे जगाला दाखविणे हा संघाचा हेतू यामागे नसणारच असे नाही. संघातली माणसे बोलत नाहीत आणि जे बोलतात ते कमालीचे वरवरचे व प्रचारी असते. याउलट काँग्रेसमध्ये वाचाळांची भरती मोठी आहे. परिणामी प्रत्येकच लहान-सहान गोष्टींचा प्रश्न बनविणे व त्यात गुंतणे हा त्याही रिकाम्या माणसांचा आवडता उद्योग आहे. एक कोणत्याही पदावर नसलेला व दीर्घकाळ आपल्यासोबत राहिलेला माणूस कोठे जातो, काय करतो आणि काय बोलतो या गोष्टीला एवढे महत्त्व त्यांनी तरी देण्याचे कारण काय? त्यामुळे ज्याची प्रतिमा बदलते वा डागाळते तो इसम ती सांभाळायला समर्थ आहे. त्यासाठी आपण अगोदरच पाणी आणि साबण घेऊन घाटावर पोहचण्याचे कारण नाही. आपली प्रतिमा सुधारण्याची खरी गरज संघाला आहे. त्याने सरकार जिंकले, पण त्याचा इतिहास तसाच राहिला आहे. तो स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नव्हता आणि त्याचे गोडसेशी असलेले नातेही त्याने लपविले नाही. त्याचा उच्चवर्णीय तोंडवळा अजून तसाच आहे. अशावेळी लोक आपल्याशी जुळल्याचे दाखविणे ही त्याची गरज आहे आणि ती तो अबोलपणे पूर्ण करीत आहे. माणसे महत्त्वाची नसतात, संघटना महत्त्वाच्या असतात. त्यांच्या राजकीय गरजांचा विचार त्याचमुळे अधिक आवश्यक आहे. सबब प्रणवदांना येऊ द्या, त्यांना बोलू द्या, त्यांना तेथेच राहायचे असेल तर तो त्यांचा मताधिकार माना. त्यामुळे ते मोठे व्हायचे नाहीत आणि संघही स्वच्छ व्हायचा नाही. ज्याने त्याने आपले घर सांभाळायचे व प्रतिष्ठा राखायची हेच आजच्या काळात महत्त्वाचे आहे.