शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अविश्वासामुळे चिंतित होते प्रणव मुखर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:27 IST

काँग्रेससाठी संकटमोचक अशी ओळख असलेले भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेवर १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या पक्षाने भरवसा ठेवला नाही, याची त्यांना खंत वाटली होती.

- व्यंकटेश केसरीकाँग्रेससाठी संकटमोचक अशी ओळख असलेले भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेवर १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या पक्षाने भरवसा ठेवला नाही, याची त्यांना खंत वाटली होती. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदासाठी पी.व्ही. नरसिंहराव यांचा विचार झाला आणि त्यानंतर त्या पदासाठी डॉ. मनमोहनसिंग यांची निवड करण्यात आली यामुळे त्यांना धक्का बसला होता आणि ते दुखावले गेले होते’’ असा खुलासा त्यांच्या द कोअ‍ॅलिशन इयर्स १९९६-२००२ या पुस्तकातून करण्यात आला आहे.गेल्या शुक्रवारी या पुस्तकाचे विमोचन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, ‘‘पंतप्रधानपदाची दावेदार व्यक्ती ही अनुभवी राजकारणी असावी, असा विचारप्रवाह काँग्रेसपक्षात बळावला होता. त्या व्यक्तीला पक्षाचे व्यवहार आणि प्रशासन या दोन्ही गोष्टींचा अनुभव असायला हवा, याविषयी पक्षात एकमत झाले होते. त्यामुळे (सोनिया गांधींनी) डॉ. मनमोहनसिंग यांची निवड केली आणि त्यांनीही त्यास मान्यता दिली.’’प्रणवदा यांच्या मतानुसार ‘‘सरकारात सामील होण्याची माझी इच्छा नव्हती आणि मी ही गोष्ट सोनिया गांधींजवळ बोलून दाखवली होती. पण मी सरकारमध्ये असायला हवे, कारण सरकार चालविताना माझी भूमिका महत्त्वाची राहणार होती. तसेच डॉ. मनमोहनसिंग यांना माझी मदत मिळाली असती’’ असे सोनियांना वाटत होते.पर्याय सुचवा२००७ साली जेव्हा डाव्या पक्षांनी राष्ट्रपतिपदासाठी माझ्या नावाचा पुरस्कार केला तेव्हा सोनिया गांधींनी मला बोलावून सांगितले की आपण संसद आणि सरकारचे प्रमुख स्तंभ आहात. त्याविषयी प्रणवदांनी पुस्तकात लिहिले आहे की माझ्याविषयीचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, मला तो मान्य राहील. त्यानंतर २०१२ सालीसुद्धा चर्चेच्या ओघात सोनियाजी म्हणाल्या होत्या की या पदासाठी आपण सर्वात लायक व्यक्ती आहात पण सरकारात आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असल्यामुळे राष्टÑपतिपदासाठी आपण एखादे पर्यायी नाव सुचवू शकता का? त्यावेळी मला वाटले होते की सं.पु.आ. चा राष्टÑपतिपदाचा उमेदवार म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव त्या पुढे करून माझ्याकडे पंतप्रधानपद सोपवतील.’’मंत्रालयाबाबत विचारणा केलीत्यानंतर सोनिया गांधींनी प्रणवदा यांना विचारले की संरक्षण, गृह, विदेश किंवा वित्त या मंत्रालयांपैकी कोणते मंत्रालय हवे? त्यांची इच्छा होती की प्रणवदांनी संरक्षण मंत्रालय सांभाळावे. पंतप्रधानांच्या आर्थिक धोरणाविषयी मतभेद असल्यामुळे मुखर्जींनी वित्तमंत्रालय घेण्यास नकार दिला होता. संरक्षण मंत्रालय घेण्याबाबतही प्रणवदांनी टाळाटाळ करून त्यांनी विदेश मंत्रालयाऐवजी गृहमंत्रालय मिळावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण पदग्रहण समारंभाचे वेळी त्यांना समजले की त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपद सोपविण्यात येणार आहे.’’पुस्तकात नमूद केलेल्या आणखी काही गोष्टी- पंतप्रधान होण्यास सोनिया गांधींनी नकार दिल्यानंतर पंतप्रधानपदासाठी माझी निवड करण्यात येईल असे मला वाटले होते. कारण मला सरकारमध्ये काम करण्याचा भरपूर अनुभव होता.- मी गृहमंत्रालयाचा भार स्वीकारावा असे लालूप्रसादांना वाटत होते. पण मी त्यास नकार दिला.- सरकारचा भाग बनण्याची शरद पवार यांची इच्छा नव्हती. पण आपण आल्याने सरकार मजबूत होईल असे मी त्यांना म्हटले तेव्हा त्यांनी कृषिमंत्री पद स्वीकारण्यास मान्यता दिली.- लोकसभा अध्यक्षपदी ए.आर. अंतुले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ती चर्चा शिवराज पाटील आणि मीराकुमार यांच्या नावापर्यंत पोचली तेव्हा सोमनाथ चॅटर्जी यांचे नाव मी सुचविले.- मीडियाच्या काही स्तंभलेखकांनी असेही लिहून टाकले की कनिष्ठ व्यक्तीच्या (डॉ. मनमोहनसिंग) हाताखाली मी काम करणार नाही, त्यामुळे मी सरकारमध्ये सामील होणार नाही.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीIndiaभारत