शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रजेने नाकारले, राजाही उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:54 IST

दिवस कसे बदलतात पहा! कोणे एकेकाळी मराठी साहित्य संमेलनाचे गारुड मराठी समाजमनावर ठाण मांडून बसले होते. वर्षातून एकदा होणारा हा शारदेचा सोहळा तमाम मराठी जनांसाठी मोठ्या कुतूहलाचा विषय होता.

दिवस कसे बदलतात पहा! कोणे एकेकाळी मराठी साहित्य संमेलनाचे गारुड मराठी समाजमनावर ठाण मांडून बसले होते. वर्षातून एकदा होणारा हा शारदेचा सोहळा तमाम मराठी जनांसाठी मोठ्या कुतूहलाचा विषय होता. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२ कोटी. भारतातील इतर राज्यांत राहणाºया मराठी भाषिकांची संख्या सुमारे २.५ कोटी. इतकेच काय तर अगदी सातासमुद्रापलीकडे मराठी पताका डौलाने फडकविणारे अमेरिका, युरोप, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, आखाती देशांतील ५० लाखांच्या जवळपास असलेले मराठी भाषिक. अशाप्रकारे संपूर्ण जगात सुमारे १५ कोटी मराठी बांधवांना या संमेलनाचे किती किती आकर्षण असायचे. मराठी भाषेच्या या कौतुक सोहळ्याची ते चातकाप्रमाणे वाट बघायचे. भाषेचा सत्कार करणारा अशा प्रकारचा भव्यदिव्य सोहळा मराठीच्या भाग्यी लाभलाय ही गोष्ट या मराठी जनांसाठी प्रचंड अभिमानाची होती. परंतु मागच्या काही वर्षात राजकारण्यांनाही लाजवेल इतके गलिच्छ राजकारण या संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता व्हायला लागले, संमेलनासाठी पैसा हवा म्हणून आयोजक राजकारण्यांच्या हवेल्यांना साकडे घालू लागले, आता पैसा दिलाच आहे तर तसा मानही द्या, असे जवळजवळ धमकावत प्रायोजक राजकारणी साहित्याच्या मंचावर गर्दी करू लागले आणि साहित्यातील हे अनपेक्षित व्यावहारिक स्थित्यंतर गुमान बघणारे साहित्य रसिक या संमेलनांपासून हळूहळू दूर होऊ लागले. ते इतके दूर झाले की आता संमेलनाच्या मांडवात साहित्याचा गहन विचार दिसत नाही, दिसते ती फक्त ‘क’ ला ‘क’ जुळवणारी यमकबंबाळ कविता अन् अवस्तुनिष्ठ विषयांवरचे रटाळ परिसंवाद. संमेलनाच्या या प्रवासात साहित्य वेगाने मागे पडत असले तरी जेवणावळीचे पंचतारांकित स्वरूप मात्र कायम आहे आणि ते कायम टिकवता यावे म्हणून दरवर्षी आयोजकांची नुसती धावाधाव सुरू असते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. प्रजेने या संमेलनांना कधीचेच नाकारल्याने स्वयंप्रेरणेने कुणी आयोजकांना दमडीचीही मदत करीत नाहीत आणि सरकार जे मागच्या अनेक वर्षांपासून केवळ २५ लाख रुपये देतेय. त्या रुपयात तर संमेलनाचा शामियानाही उभा राहत नाही. म्हणून आता साहित्य महामंडळाने शासनाकडे एक कोटीची मागणी केली आहे. कर्नाटक सरकार कन्नड साहित्य संमेलनाकरिता तब्बल आठ कोटी रुपये देत आहे. मग आपल्या सरकारला यात काय अडचण आहे, असा महामंडळाचा सवाल आहे. परंतु मायबाप सरकारच्याही लेखी हे संमेलन केवळ त्यांची राजकीय विवशता आहे. त्यामुळे सरकारने या मागणीकडे साधे लक्षही दिलेले नाही. परिणामी प्रजेने नाकारले, राजाही उदासीन अशी या संमेलनाची अवस्था झाली आहे.

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र