शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

प्रजेने नाकारले, राजाही उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:54 IST

दिवस कसे बदलतात पहा! कोणे एकेकाळी मराठी साहित्य संमेलनाचे गारुड मराठी समाजमनावर ठाण मांडून बसले होते. वर्षातून एकदा होणारा हा शारदेचा सोहळा तमाम मराठी जनांसाठी मोठ्या कुतूहलाचा विषय होता.

दिवस कसे बदलतात पहा! कोणे एकेकाळी मराठी साहित्य संमेलनाचे गारुड मराठी समाजमनावर ठाण मांडून बसले होते. वर्षातून एकदा होणारा हा शारदेचा सोहळा तमाम मराठी जनांसाठी मोठ्या कुतूहलाचा विषय होता. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२ कोटी. भारतातील इतर राज्यांत राहणाºया मराठी भाषिकांची संख्या सुमारे २.५ कोटी. इतकेच काय तर अगदी सातासमुद्रापलीकडे मराठी पताका डौलाने फडकविणारे अमेरिका, युरोप, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, आखाती देशांतील ५० लाखांच्या जवळपास असलेले मराठी भाषिक. अशाप्रकारे संपूर्ण जगात सुमारे १५ कोटी मराठी बांधवांना या संमेलनाचे किती किती आकर्षण असायचे. मराठी भाषेच्या या कौतुक सोहळ्याची ते चातकाप्रमाणे वाट बघायचे. भाषेचा सत्कार करणारा अशा प्रकारचा भव्यदिव्य सोहळा मराठीच्या भाग्यी लाभलाय ही गोष्ट या मराठी जनांसाठी प्रचंड अभिमानाची होती. परंतु मागच्या काही वर्षात राजकारण्यांनाही लाजवेल इतके गलिच्छ राजकारण या संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता व्हायला लागले, संमेलनासाठी पैसा हवा म्हणून आयोजक राजकारण्यांच्या हवेल्यांना साकडे घालू लागले, आता पैसा दिलाच आहे तर तसा मानही द्या, असे जवळजवळ धमकावत प्रायोजक राजकारणी साहित्याच्या मंचावर गर्दी करू लागले आणि साहित्यातील हे अनपेक्षित व्यावहारिक स्थित्यंतर गुमान बघणारे साहित्य रसिक या संमेलनांपासून हळूहळू दूर होऊ लागले. ते इतके दूर झाले की आता संमेलनाच्या मांडवात साहित्याचा गहन विचार दिसत नाही, दिसते ती फक्त ‘क’ ला ‘क’ जुळवणारी यमकबंबाळ कविता अन् अवस्तुनिष्ठ विषयांवरचे रटाळ परिसंवाद. संमेलनाच्या या प्रवासात साहित्य वेगाने मागे पडत असले तरी जेवणावळीचे पंचतारांकित स्वरूप मात्र कायम आहे आणि ते कायम टिकवता यावे म्हणून दरवर्षी आयोजकांची नुसती धावाधाव सुरू असते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. प्रजेने या संमेलनांना कधीचेच नाकारल्याने स्वयंप्रेरणेने कुणी आयोजकांना दमडीचीही मदत करीत नाहीत आणि सरकार जे मागच्या अनेक वर्षांपासून केवळ २५ लाख रुपये देतेय. त्या रुपयात तर संमेलनाचा शामियानाही उभा राहत नाही. म्हणून आता साहित्य महामंडळाने शासनाकडे एक कोटीची मागणी केली आहे. कर्नाटक सरकार कन्नड साहित्य संमेलनाकरिता तब्बल आठ कोटी रुपये देत आहे. मग आपल्या सरकारला यात काय अडचण आहे, असा महामंडळाचा सवाल आहे. परंतु मायबाप सरकारच्याही लेखी हे संमेलन केवळ त्यांची राजकीय विवशता आहे. त्यामुळे सरकारने या मागणीकडे साधे लक्षही दिलेले नाही. परिणामी प्रजेने नाकारले, राजाही उदासीन अशी या संमेलनाची अवस्था झाली आहे.

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र