शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एक्झिट पोलच्या दाव्यांची पोल‘खोल’

By admin | Updated: October 20, 2014 05:58 IST

निवडणूकपूर्व अंदाज, एक्झिट पोलची आकडेवारी तज्ज्ञांनी काहीही दिली असली तरी मतदारांनी आपला कौल देताना बहुतेकांचे दावे खोटे ठरविले आहेत

निवडणूकपूर्व अंदाज, एक्झिट पोलची आकडेवारी तज्ज्ञांनी काहीही दिली असली तरी मतदारांनी आपला कौल देताना बहुतेकांचे दावे खोटे ठरविले आहेत. त्यामुळे अशा चाचण्यांच्या शास्त्रीय आधारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे. १५ आॅक्टोबरच्या मतदानाला ४८ तास बाकी असेपर्यंतच निवडणूकपूर्व अंदाज वर्तविता येतील, असे बंधन निवडणूक आयोगाने घालून दिले होते. मतदान सायंकाळी ६ वाजता संपल्यानंतर तासाभरातच एक्झिट पोलची आकडेवारी विविध टीव्ही चॅनेल्सवर झळकू लागली आणि त्यावर लगेच दावे-प्रतिदावेही सुरू झाले. मतदान संपताच निकाल सांगितल्याच्या आवेशात एक्झिट पोल कसे दिले जात आहेत, अशी विचारणा लगोलग सोशल मीडियातून सुरू झाली होती. भाजपाच्या समर्थकांनी एक्झिट पोलचे समर्थन करीत फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅपवर प्रतिहल्ले चढविले. आता निकालाने सगळे काही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अचूक अंदाज वर्तविल्याचा टेंभा मिरविणाऱ्या चाणक्यने भाजपाला १५१ आणि शिवसेनेला ७१ जागा दाखविल्या होत्या. सर्वांत खात्रीशीर एक्झिट पोल असे त्याचे कौतुकही करण्यात आले होते. तथापि, तो सपशेल चुकला. अर्थात हे भाकीत आपल्याकडेच चुकते असे नाही. २००४च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही ते चुकले होते आणि त्याची जगभर चर्चा झाली होती. मतदान करून बाहेर पडता पडता मतदारांचा कौल घेण्याचा प्रयत्न यात केला जातो. या वेळी कोणत्याही एक्झिट पोलचे सर्व पक्षांचे आकडे तंतोतंत खरे निघाले नाहीत, पण काही त्याच्या आसपास पोहोचले़ पाश्चात्त्य देशांमध्ये एक्झिट पोल घेताना जेवढी दक्षता बाळगली जाते आणि बारकावे टिपण्याचा प्रयत्न होतो तेवढी शास्रशुद्ध पद्धत आपल्याकडे आजही अवलंबिण्यात आलेली नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये बरेचदा तफावत दिसून येते. निवडणूकपूर्व चाचणी किंवा एक्झिट पोलचे काम करणाऱ्या एजन्सी एखाद्या पक्षाची बाजू घेण्यासाठी त्यांना सोईची आकडेवारी देतात, असाही आपल्याकडे मोठा आक्षेप आहे. काही एजन्सींनी आर्थिक देवाणघेवाणीच्या मोबदल्यात अनुकूल आकडेवारी देण्याची तयारी दर्शविली होती, असे एका स्टिंग आॅपरेशनमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी समोर आले होते. भारतातील अशा बहुतेक चाचण्या या मोठ्या मीडिया हाउसच्या माध्यमातून करण्यात येतात आणि या हाउसच्या राजकीय सलगीबाबत उलटसुलट चर्चा होत आली आहे. कमी मतदारसंख्या असलेल्या लहान देशांमध्ये एक्झिट पोलची आकडेवारी खरी निघू शकते. मात्र, भारतासारख्या विशालकाय देशात हे प्रचंड किचकट असे काम असते. भाषिक, धार्मिक आणि जातीय वैविध्य असलेल्या मतदारांचा अंदाज एकाच कसोटीवर मोजणे कठीण होऊन बसते.