शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

एक्झिट पोलच्या दाव्यांची पोल‘खोल’

By admin | Updated: October 20, 2014 05:58 IST

निवडणूकपूर्व अंदाज, एक्झिट पोलची आकडेवारी तज्ज्ञांनी काहीही दिली असली तरी मतदारांनी आपला कौल देताना बहुतेकांचे दावे खोटे ठरविले आहेत

निवडणूकपूर्व अंदाज, एक्झिट पोलची आकडेवारी तज्ज्ञांनी काहीही दिली असली तरी मतदारांनी आपला कौल देताना बहुतेकांचे दावे खोटे ठरविले आहेत. त्यामुळे अशा चाचण्यांच्या शास्त्रीय आधारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे. १५ आॅक्टोबरच्या मतदानाला ४८ तास बाकी असेपर्यंतच निवडणूकपूर्व अंदाज वर्तविता येतील, असे बंधन निवडणूक आयोगाने घालून दिले होते. मतदान सायंकाळी ६ वाजता संपल्यानंतर तासाभरातच एक्झिट पोलची आकडेवारी विविध टीव्ही चॅनेल्सवर झळकू लागली आणि त्यावर लगेच दावे-प्रतिदावेही सुरू झाले. मतदान संपताच निकाल सांगितल्याच्या आवेशात एक्झिट पोल कसे दिले जात आहेत, अशी विचारणा लगोलग सोशल मीडियातून सुरू झाली होती. भाजपाच्या समर्थकांनी एक्झिट पोलचे समर्थन करीत फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅपवर प्रतिहल्ले चढविले. आता निकालाने सगळे काही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अचूक अंदाज वर्तविल्याचा टेंभा मिरविणाऱ्या चाणक्यने भाजपाला १५१ आणि शिवसेनेला ७१ जागा दाखविल्या होत्या. सर्वांत खात्रीशीर एक्झिट पोल असे त्याचे कौतुकही करण्यात आले होते. तथापि, तो सपशेल चुकला. अर्थात हे भाकीत आपल्याकडेच चुकते असे नाही. २००४च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही ते चुकले होते आणि त्याची जगभर चर्चा झाली होती. मतदान करून बाहेर पडता पडता मतदारांचा कौल घेण्याचा प्रयत्न यात केला जातो. या वेळी कोणत्याही एक्झिट पोलचे सर्व पक्षांचे आकडे तंतोतंत खरे निघाले नाहीत, पण काही त्याच्या आसपास पोहोचले़ पाश्चात्त्य देशांमध्ये एक्झिट पोल घेताना जेवढी दक्षता बाळगली जाते आणि बारकावे टिपण्याचा प्रयत्न होतो तेवढी शास्रशुद्ध पद्धत आपल्याकडे आजही अवलंबिण्यात आलेली नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये बरेचदा तफावत दिसून येते. निवडणूकपूर्व चाचणी किंवा एक्झिट पोलचे काम करणाऱ्या एजन्सी एखाद्या पक्षाची बाजू घेण्यासाठी त्यांना सोईची आकडेवारी देतात, असाही आपल्याकडे मोठा आक्षेप आहे. काही एजन्सींनी आर्थिक देवाणघेवाणीच्या मोबदल्यात अनुकूल आकडेवारी देण्याची तयारी दर्शविली होती, असे एका स्टिंग आॅपरेशनमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी समोर आले होते. भारतातील अशा बहुतेक चाचण्या या मोठ्या मीडिया हाउसच्या माध्यमातून करण्यात येतात आणि या हाउसच्या राजकीय सलगीबाबत उलटसुलट चर्चा होत आली आहे. कमी मतदारसंख्या असलेल्या लहान देशांमध्ये एक्झिट पोलची आकडेवारी खरी निघू शकते. मात्र, भारतासारख्या विशालकाय देशात हे प्रचंड किचकट असे काम असते. भाषिक, धार्मिक आणि जातीय वैविध्य असलेल्या मतदारांचा अंदाज एकाच कसोटीवर मोजणे कठीण होऊन बसते.