शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
4
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
5
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
6
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
7
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
8
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
9
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
10
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
11
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
12
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
14
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
15
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
16
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
17
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
18
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
19
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
20
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण कलंकित करणारी निवडणूक!

By विजय दर्डा | Updated: May 13, 2019 01:45 IST

सत्तेच्या लढाईत परस्परांवर असे काही विखारी शब्दांचे वाग्बाण सोडले जात आहेत की, जणू शत्रूच लढाईच्या मैदानात उतरले आहेत!

दुश्मनी जम कर करो, लेकिन ये गुंजाइशरहे/ जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों!सुप्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा हा शेर सध्याच्या निवडणुकीस चपखलपणे लागू होतो. सत्तेच्या लढाईत परस्परांवर असे काही विखारी शब्दांचे वाग्बाण सोडले जात आहेत की, जणू शत्रूच लढाईच्या मैदानात उतरले आहेत! कौरव-पांडवांचे युद्ध सुरू असल्यासारखे वाटत आहे.

अशी निवडणूक मी लहानपणापासून कधीच पाहिली नाही, असे मला अत्यंत खेदाने व नाईलाजाने म्हणावे लागत आहे. पंडित नेहरूंच्या काळापासूनच्या सर्व निवडणुका मला आठवतात. १८ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत राजकारणातील अनेक चढ-उतार पाहिले, निवडणुकांचेही बारकाईने निरीक्षण केले, सत्तांतरे पाहिली व पंतप्रधानांचे पदावर येणे, सत्तेतून जाणेही पाहिले. या देशातील मतदारांची ताकदही मी पाहिली. मातब्बर दिग्गज नेत्यांना मतदारांनी चितपट केल्याचे पाहिले. तरीही आजवर मला लोकशाहीचा विजय होताना दिसला, समाज जिंकताना दिसला. आताच्या निवडणुकीने भारतीय राजकारणाला जेवढे कलंकित केले व समाजात कटुता घोळविली, तेवढी यापूर्वी मी कधीही पाहिली नव्हती!

माझे बाबुजी, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज होते. त्यामुळे मी बालपणापासून राजकारण जवळून पाहात आलो. नंतर संसदीय राजकारणात सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मिळाली. या सर्व टप्प्यांवर मला नेहमी राजकारणाचे पावित्र्य पाहायला मिळाले. मला चांगले आठवते की, १९६२ मध्ये लोकनायक बापूजी अणे नागविदर्भ आंदोलन समितीच्या पाठिंब्याने नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवीत होते. काँग्रेसचे उमेदवार होते रिखबचंद शर्मा. त्यांच्या प्रचारासाठी पं. जवाहरलाल नेहरू नागपूरला आले. सभेत त्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करतानाच अणेसाहेबांचीही तोंडभरून स्तुती केली. अणेजी मलाही आदरणीय असल्याचे पंडित नेहरू म्हणाले. त्यावेळी निवडणुकीत असे पावित्र्य होते. नाती आणि व्यक्तिमत्त्वाचा आदर व मान राखला जायचा.

भारतीय लोकशाहीला मजबूत व पवित्र ठेवण्याचे श्रेय पंडित जवाहरलाल नेहरूंना जाते. त्या काळात ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र काँग्रेसचाच बोलबाला होता. बलाढ्य विरोधक नावालाही नव्हते. तरीही विरोधी पक्ष अत्यंत गरजेचे आहेत. ते नसतील तर लोकशाहीला अर्थच उरणार नाही, असे नेहरूजींचे म्हणणे असायचे. विरोधी पक्षांचे सर्व मोठे नेते संसदेत येतील, अशी ते व्यवस्था करायचे. नेहरूंवर तिखट टीका करणारे हे नेते असायचे. मला आठवते की, हेम बारुआ नावाचे संसद सदस्य होते. त्यांनी एकदा नेहरूजींबद्दल अपशब्द वापरले होते. नेहरूजींच्या निधनानंतर एका ख्यातनाम संपादकांनी या बारुआंना विचारले की, तुम्ही पंडितजींच्या पार्थिवाला त्रिवार प्रणाम का केलात? त्यावर बारुआ यांनी सांगितले होते : पहिला प्रणाम देशाच्या महान स्वातंत्र्यसेनानीला, दुसरा लोकशाहीवर प्रगाढ श्रद्धा असलेल्या पंतप्रधानांना आणि तिसरा विशाल हृदयी माणसाला होता. मी नेहरूजींबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आठवडाभराने त्यांनी मला बोलावून कॉफी पाजली व म्हणाले, तुमचे भाषण खूपच तिखट होते, तेवढेच काव्यात्मकही होते! तेव्हा मी नेहरूंची माफीही मागितली नव्हती! हे हेम बारुआ आसामी भाषेतील उत्तम कवीही होते.

या संदर्भात अटलजींचा किस्सा आठवतो. ते पंतप्रधान म्हणून सत्तेवर आले. अचानक त्यांना संसदेच्या कॉरिडॉरमधील नेहरूजींचे पोट्रेट गायब झालेले दिसले. अटलजींना खूप वाईट वाटले. त्यांनी बोलून दाखविले की, लोकशाहीत सरकारे येतील व जातीलही, पण लोकशाही जिवंत राहायला हवी. आजवर जेवढे पंतप्रधान होऊन गेले, त्यांच्यामुळेच देश आहे तसा आहे. तरुण वयापासून जी तसबीर मी पाहात आलो, ती तेथे नसल्याचे पाहून माझ्या मनाला खूप यातना झाल्या. त्याच दिवशी सायंकाळपर्यंत नेहरूंचे पोट्रेट होते त्या जागेवर पुन्हा लावले गेले!राजकीय पावित्र्य व विरोधकांचाही सन्मान करण्याच्या संस्कृतीत वाढलेल्या माझ्यासारख्याला आज देशातील वातावरण गलिच्छ झाल्याचे जाणवते. समाजात फूट पडल्याचे मी पाहतो. तुम्ही आमचे समर्थक असाल, तरच खरे देशप्रेमी आहात, अन्यथा तुमचे देशप्रेम शंकास्पद आहे, असा संदेश दिला जात असल्याचे दिसते. नेत्यांच्या जिभेवर संयमच राहिलेला नाही. या जगात नसलेल्या नेत्यालाही पद्धतशीर बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. धर्माच्या आधारे समाजाचे कप्पेबंद भाग पाडले जात आहेत. देशाच्या बहाद्दर सैनिकांच्या शौर्याचेही श्रेय लाटले जात आहे. यावर निवडणूक आयोगाने अंकुश ठेवायला हवा, पण आयोगाने खूपच निराश केले. आयोग गप्प बसल्यानेच सर्वांनाच मोकळे रान मिळाले आहे.

या निवडणुकीने समाजाचे तर तुकडे केलेच आहेत, पण राजकारणही मुळापासून हादरून टाकले आहे. राजकारणात मतभेद स्वाभाविक आहेत. ते असायलाही हवेत, पण मनभेद होता कामा नयेत. ज्याने समाज दुभंगेल, अशी कटुता राजकारणात असू नये. पुढील दोन आठवड्यांत निवडणुका संपतील, पण या विखारी प्रचाराने समाजमनावर जे घाव पडले आहेत, ते भरून निघायला न जाणो पुढचा किती काळ जायला लागेल!

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक