शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

राजकारणाची मेट्रो!

By admin | Updated: December 23, 2016 23:55 IST

पुण्यातील बहुचर्चीत मेट्रो सुरू व्हावी, वेगवान प्रवास व्हावा अशी पुणेकरांची अपेक्षा. मात्र, मेट्रोच्या कामाने वेग घेण्यापेक्षा या निमित्ताने

पुण्यातील बहुचर्चीत मेट्रो सुरू व्हावी, वेगवान प्रवास व्हावा अशी पुणेकरांची अपेक्षा. मात्र, मेट्रोच्या कामाने वेग घेण्यापेक्षा या निमित्ताने राजकारणच सुसाट झाले. प्रत्येक टप्प्यावर राजकारणाच्या गर्तेतून मेट्रोचा प्रवास सुरू आहे. राजकीय लढाईचे हत्यार म्हणून मेट्रोचा वापर केला गेला. अगदी भूमिपूजनापर्यंत हा वाद सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज, शनिवारी मेट्रोचे भूमिपूजन होत आहे. वास्तविक पंतप्रधानांच्या हस्ते एखादा प्रकल्प सुरू होणे याला वेगळे महत्व असते. प्रकल्प पुढे जाण्यास त्यातून मदत होते. काही पदांबाबत पक्षीय राजकारण करणे योग्य नसते. परंतु, दोन्ही बाजूंनी हे घडले. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मेट्रोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातच पालक मंत्री गिरीष बापट यांनी समारंभासाठी दोन व्यासपीठे उभारण्याची घोषणा केली. पंतप्रधान कार्यालयाच्या राजशिष्टाचाराचा दाखला दिला गेला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच उपव्यासपीठावर बसण्याची खेळी असल्याचा संशय आला. यामुळे महापौर प्रशांत जगताप यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या हस्ते आदल्या दिवशीच भूमिपूजन करण्याची आततायी भूमिका घेतली. कॉँग्रेसनेही त्याला पाठिंंबा दिला. परंतु, स्थानिक पातळीवर कार्यकर्ते झुंजत असले तरी राष्ट्रीय पातळीवरील समीकरणे वेगळी असतात, हे महापौरांना उमगले नाही. पंतप्रधान कार्यालयाकडूनच शरद पवार यांचे नाव व्यासपीठावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापौरांना घूमजाव करावे लागले. यामध्ये खरी कोंडी झाली ती कॉँग्रेसची. राष्ट्रवादीबरोबर फरफट होते आहे, हा समज खोडून काढण्यासाठी शुक्रवारी मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्याला उपस्थित होते. मेट्रोचा प्रस्ताव आमचा, प्रयत्नही आमचे होते, अशी भूमिका कॉँग्रेसतर्फे मांडण्यात आली. विकासकामातून राजकीय फायदा घेणे नवीन नाही. राजकारणाचे तेच पहिले सूत्र असते. परंतु, नागरी प्रश्नांवर कधी तरी राजकारण्यांनी एकत्र यायला हवे. वाहतुकीच्या समस्येमुळे पुणे शहर प्रगतीच्या आलेखावर मृत होऊ पाहात आहे. यावर उपाययोजना असलेले मेट्रोसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राजकारणाच्या चिखलात अडकू नये, हीच नागरिकांची किमान अपेक्षा असते. पंतप्रधानांनी सर्वच राजकीय पक्षांच्या मदतीने मेट्रोला धक्का द्यावा आणि राजकारणाच्या गर्तेतून मेट्रो बाहेर काढावी, हीच पुणेकराची इच्छा आहे.