शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राजकारणाची मेट्रो!

By admin | Updated: December 23, 2016 23:55 IST

पुण्यातील बहुचर्चीत मेट्रो सुरू व्हावी, वेगवान प्रवास व्हावा अशी पुणेकरांची अपेक्षा. मात्र, मेट्रोच्या कामाने वेग घेण्यापेक्षा या निमित्ताने

पुण्यातील बहुचर्चीत मेट्रो सुरू व्हावी, वेगवान प्रवास व्हावा अशी पुणेकरांची अपेक्षा. मात्र, मेट्रोच्या कामाने वेग घेण्यापेक्षा या निमित्ताने राजकारणच सुसाट झाले. प्रत्येक टप्प्यावर राजकारणाच्या गर्तेतून मेट्रोचा प्रवास सुरू आहे. राजकीय लढाईचे हत्यार म्हणून मेट्रोचा वापर केला गेला. अगदी भूमिपूजनापर्यंत हा वाद सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज, शनिवारी मेट्रोचे भूमिपूजन होत आहे. वास्तविक पंतप्रधानांच्या हस्ते एखादा प्रकल्प सुरू होणे याला वेगळे महत्व असते. प्रकल्प पुढे जाण्यास त्यातून मदत होते. काही पदांबाबत पक्षीय राजकारण करणे योग्य नसते. परंतु, दोन्ही बाजूंनी हे घडले. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मेट्रोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातच पालक मंत्री गिरीष बापट यांनी समारंभासाठी दोन व्यासपीठे उभारण्याची घोषणा केली. पंतप्रधान कार्यालयाच्या राजशिष्टाचाराचा दाखला दिला गेला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच उपव्यासपीठावर बसण्याची खेळी असल्याचा संशय आला. यामुळे महापौर प्रशांत जगताप यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या हस्ते आदल्या दिवशीच भूमिपूजन करण्याची आततायी भूमिका घेतली. कॉँग्रेसनेही त्याला पाठिंंबा दिला. परंतु, स्थानिक पातळीवर कार्यकर्ते झुंजत असले तरी राष्ट्रीय पातळीवरील समीकरणे वेगळी असतात, हे महापौरांना उमगले नाही. पंतप्रधान कार्यालयाकडूनच शरद पवार यांचे नाव व्यासपीठावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापौरांना घूमजाव करावे लागले. यामध्ये खरी कोंडी झाली ती कॉँग्रेसची. राष्ट्रवादीबरोबर फरफट होते आहे, हा समज खोडून काढण्यासाठी शुक्रवारी मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्याला उपस्थित होते. मेट्रोचा प्रस्ताव आमचा, प्रयत्नही आमचे होते, अशी भूमिका कॉँग्रेसतर्फे मांडण्यात आली. विकासकामातून राजकीय फायदा घेणे नवीन नाही. राजकारणाचे तेच पहिले सूत्र असते. परंतु, नागरी प्रश्नांवर कधी तरी राजकारण्यांनी एकत्र यायला हवे. वाहतुकीच्या समस्येमुळे पुणे शहर प्रगतीच्या आलेखावर मृत होऊ पाहात आहे. यावर उपाययोजना असलेले मेट्रोसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राजकारणाच्या चिखलात अडकू नये, हीच नागरिकांची किमान अपेक्षा असते. पंतप्रधानांनी सर्वच राजकीय पक्षांच्या मदतीने मेट्रोला धक्का द्यावा आणि राजकारणाच्या गर्तेतून मेट्रो बाहेर काढावी, हीच पुणेकराची इच्छा आहे.