शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

निंदानालस्तीतच राजकारण्यांना रस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:40 IST

गेल्या काही महिन्यांत राजकारणी लोकांनी एकमेकांवर टीका करताना एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गाठली.

गेल्या काही महिन्यांत राजकारणी लोकांनी एकमेकांवर टीका करताना एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गाठली. त्यांची भाषणे निंदात्मक, किळसवाणी आणि राजकीय संघर्ष करण्यापर्यंत मजल गाठलेली होती. यापूर्वी या देशात अशी भाषा कधीच वापरण्यात आली नव्हती. त्यांनी ताळतंत्र सोडून एकमेकांचे जे वाभाडे काढले, ते अशोभनीय होते. राजकीय पक्षापेक्षा पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या वक्तव्यांनी देशाला लाज आणली. त्यांच्या भाषणावरून आणि एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीवरून भविष्यातील राजकारण कसे राहील, याचा अंदाज सहज बांधता येतो. त्यांच्या टीकेत भ्रष्टाचाराचा जसा उल्लेख होता, तसाच एकमेकांवर व्यक्तिगत आरोप करण्यातही ते कुठे मागे राहिले नाहीत. या गदारोळात राजकीय नेते आणि त्यांचे अनुयायी, तसेच त्यांचे विरोधक यांचे वर्तन योग्य नव्हते, त्यात राजकीय उमेदवाराचा मात्र अंत झाला, लोकांचेही नुकसान झाले.

१५०० साली फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडेमस यांनी केलेली भविष्यवाणी जशी खरी ठरू पाहत आहे, तद्वतच रॉबर्ट पेन या १९४६ सालच्या पुलित्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या ‘आॅल द किंग्ज मेन’ या कादंबरीत भविष्यातील राजकारण कसे निंदात्मक राहील, याचे जे वर्णन केलेले आहे, त्याचा प्रत्यय सध्याच्या राजकारणातून पाहायला मिळत आहे. या कादंबरीत राजकीय भ्रष्टाचाराचे वर्णन लेखकाने केले आहे. त्यातून विली स्टार्क या काल्पनिक गव्हर्नरचा कसा उदयास्त होतो, हे मार्मिकपणे दर्शविण्यात आले आहे. त्यातील स्टार्क हा आपल्या मित्रास मदत करता-करता आपण कसे सर्वश्रेष्ठ आहोत, या भावनेने कसा पछाडला जातो, हे स्पष्ट केले आहे. राजकीय निंदा कशी करण्यात येते आणि बदनामी कशी केली जाते व ती खालपर्यंत कशी झिरपत जाते, हे प्रत्ययकारी पद्धतीने दर्शविण्यात आले आहे.

निंदात्मक वक्तव्यात बदनामी कशी दडलेली असते, हे त्यातून दाखविण्यात आले आहे. शाब्दिक टीकेने त्याची सुरुवात होते आणि त्यातून निंदात्मक लेखन सुरू होते. सध्याच्या काळात एकमेकांची शाब्दिक निंदा करण्यावर भर दिला जात आहे. एखाद्या व्यक्तीविषयी खोटी वक्तव्ये करून, त्याच्या लौकिकास कलंकित करण्यात येत आहे. निंदा करणे हा काही गुन्हा नाही, पण सार्वजनिक टीका हा न्यायालयीन खटल्याचा विषय होऊ शकतो. व्यक्तीविषयी करण्यात आलेले उल्लेख हे सत्य घटनांवर आधारित असायलाच हवेत किंवा भाषण करणाऱ्या व्यक्तीचे ते स्वत:चे अधिकृत मत असायला हवे. रागाच्या भरात केलेली खोटी वक्तव्ये ही निंदात्मक अभिव्यक्तीत मोडली जातात.

सध्याचे युग हे खोट्या बातम्याचे, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप करण्याचे आहे. असे आरोप केले जात असताना संबंधित व्यक्तीवर न्यायालयात खटला का भरला जात नाही, याचे लोकांना आश्चर्य वाटते. राजकारणी व्यक्तींवर टीका करताना त्याविषयीचा पुरावा बाळगणे आवश्यक असते, पण अशा आरोपांकडे भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली दुर्लक्ष करण्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतल्याचे दिसून आले. या आरोपांच्या संदर्भात वृत्तपत्रांनी पक्षपाती दृष्टिकोन बाळगल्याचे दिसून आले.एका नेत्याने दुसºया नेत्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला, तर दुसºयाने पहिल्या व्यक्तीने आपल्या बायकोचा त्याग केला असल्याने, त्याला कुटुंबाच्या अडचणींची कल्पना कशी येणार, अशा शब्दात त्याचे वाभाडे काढले. एकमेकांना या तºहेने शिव्या देण्याची चढाओढ सुरू झाल्यावर त्या शिव्यांची चळतच निर्माण झाली. एकाने दुसºयाला मूर्ख म्हटले, तर दुसºयाने पहिल्याला गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणून हिणवले. कुणी कुणाला दुर्योधन म्हटले, तर आणखी कुणी काही म्हटले. व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपातून कुटुंबांचीही सुटका झाली नाही. त्यातून मृत व्यक्तींचाही उद्धार करण्यापर्यंत मजल गाठण्यात आली. विरोधकांनी सत्तारूढ नेत्याला रक्तपिपासू आणि आधुनिक काळातील सीझर, हिटलर किंवा नेपोलियन असल्याचा उल्लेख केला.

आपण व्यक्त केलेले मत हे आपले व्यक्तिगत मत होते, असे सांगून राजकारणी लोक न्यायालयाच्या संतापापासून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करीत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन सर्व लोक स्वत:ची मते व्यक्त करीत असतात, मग ती मते इतरांना हानिकारक का ठरेनात! एकमेकांची निंदा करण्याचा प्रकार पूर्वीदेखील होत होता, पण सध्या तंत्रज्ञानामुळे ही निंदा सर्वदूर पसरायला वेळ लागत नाही. राजकीय निवडणुकांमुळे स्पर्धात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे एकमेकांना कमी लेखण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्या स्पर्धेमुळे जर कोट्यवधी रुपयांचा लाभ होणार असेल, तर त्या स्पर्धेला घाणेरडे स्वरूप प्राप्त होते. बदनामी करण्याच्या प्रचारमोहिमेने फायदा होत असल्यामुळे, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची राजकीय पक्षांची तयारी असते. बंगालच्या राजकीय रणभूमीवर एक ज्येष्ठ राजकारणी म्हणाला. ‘हुकूमशाहीत विनोदाला स्थान नसते. हुकूमशहांना आपल्याकडे बघून कुणी हसलेले आवडत नसते.’ त्याचे हे म्हणणे सत्तारूढ पक्षाला अचूक लागू पडते, हे जर त्याने स्वीकारले, तर राजकीय पक्षांना एका व्यासपीठावर येणे सोपे जाईल, पण राजकीय तेढ इतकी विकोपाला पोचली आहे की, ती पुन्हा पूर्व पातळीवर आणणे कठीण झाले आहे.

- डॉ. एस. एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारण