शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

नगरपालिकांत राजकीय इर्जिक

By admin | Updated: November 10, 2016 00:18 IST

नगर जिल्ह्यात पक्ष म्हणून कोणताही नेता बांधणी करायला तयार नाही.

नगर जिल्ह्यात पक्ष म्हणून कोणताही नेता बांधणी करायला तयार नाही. विरोधी पक्षनेते एका पालिकेत भाजपासोबत प्रचार करणार, तर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या मतदारसंघातच राष्ट्रवादीचे चिन्ह हद्दपार झाले आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांत सगळे पक्ष आपली ताकद अजमावतील. या निवडणुका ‘मिनी’ विधानसभेच्या धर्तीवर होतील, अशी शक्यता होती. पण, प्रत्यक्षात सगळेच पक्ष चाचपडत आहेत. युती झाली नाही तर वेगळे लढण्याची तयारी ठेवा, असा आदेश सेना-भाजपाने सुरुवातीला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. नंतर युतीची घोषणा झाली. प्रत्यक्षात खाली वेगळेच चित्र आहे. दोन्ही कॉंगे्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला असल्याने दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना आपापली सोय पाहाण्याची मुभाच मिळाली आहे. स्थानिक पातळीवर सगळाच सोयीचा मामला सुरु आहे. नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे राज्यात विरोधी पक्षनेते आहेत. ते राहुरी नगरपालिकेत भाजपासोबत आघाडी करतील अशी शक्यता आहे. तशा बैठकाही झाल्या आहेत. म्हणजे विखे यांच्या मतदारसंघातील राहाता व शिर्डी या पालिकांत विखे व भाजपा यांच्यात संघर्ष रंगणार, तर इकडे राहुरीत विखे-भाजपा एका व्यासपीठावर दिसणार. श्रीरामपूर ही जिल्ह्यातील मोठी नगरपालिका आहे. या पालिकेत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी, भाजपा व सेना यांची महाआघाडी झाली आहे. येथे नगराध्यक्षपदावरुन भाजपाने माघार घेत ही जागा राष्ट्रवादीला सोडली. माजी मंत्री गोविंदराव आदिक यांची कन्या येथे आता भाजपाच्या पाठिंब्याने लढते आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या मतदारसंघातील पाथर्डी पालिकेतही राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढत नाही. तेथे हा पक्ष जगदंबा नावाच्या आघाडीत सामील झाला आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या स्वत:च्या मतदारसंघातच राष्ट्रवादीला आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करता येणार नाही. सेना-भाजपा सत्तेत आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाच आमदार भाजपाकडे आहेत. एक खासदार आहे. राम शिंदे यांच्या रुपाने कॅबिनेट मंत्रिपद आहे. मात्र, असे असतानाही स्थानिक पातळीवर आपली सत्ता येईल, ही खात्री या पक्षाला नाही. शिवसेनेतही तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अगदी दोन्ही कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचे धोरण या पक्षांना घ्यावे लागत आहे. दोन्ही कॉंग्रेसलाही आपले आहे ते स्थान टिकेल याची खात्री नाही. सर्वच पक्षांनी संघटन बांधणीकडे दुर्लक्ष करुन पक्ष स्थानिक नेत्यांच्या हवाली केले असल्याने अशी राजकीय इर्जिक करण्याची वेळ पक्षांवर आली आहे. पक्षीय ध्येयधोरणांपेक्षा आपला स्थानिक विरोधक कोण, हे बघितले जात आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवितानाही लोकांची व कार्यकर्ऱ्यांची मते घेण्यापेक्षा नेत्यांना सोयीची व्यक्ती कोण, हे पाहिले जात आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सामाजिक कार्यकर्ते अशा राजकीय चाकोरीबाहेरील व्यक्तिमत्त्वांना राजकारणात आणून उमेदवारी देण्याचा विचार याही निवडणुकीत अभावानेच झाला. नगर जिल्हा पदवीधर निवडणुकीलाही सामोरा जात आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात नगरचा समावेश होतो. या मतदारसंघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे हे कॉंग्रेसकडून उमेदवारी करत आहेत. मात्र, नगर जिल्ह्यातून कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अथवा विखे गटाने त्यांच्यासाठी मतदारनोंदणी करण्याचे साधे आवाहनही केले नाही. तांबे हेही पक्षाऐवजी स्वत:ची यंत्रणा वापरुन ही निवडणूक लढत आहेत. तेच चित्र भाजपात आहे. भाजपाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्यासाठीही त्यांच्या पक्षाचे आमदार, नेते राबताना दिसत नाहीत. पक्षही या उमेदवाऱ्या बऱ्याचदा थेट वरुनच जाहीर करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही उमेदवार स्वीकारावे लागतात. पक्ष नावाची यंत्रणा यात कमजोर होऊन नेते बलवान होत आहेत. - सुधीर लंके