शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांध राजकारण अन् धार्मिकतेला राजकारणाची जोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 03:17 IST

धर्मवेडाने आंधळेपण आलेली माणसे सर्वधर्मसमभाव व देशप्रेम याहून परधर्मद्वेषाचे राजकारणच अधिक करतात. मग अकबराने अलाहाबाद उभारले तेव्हा त्याने इस्लामचा त्याग केला होता याचेही स्मरण करावेसे त्यांना वाटत नाही.

उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ सरकारचे धर्मांध इरादे त्याने कधी लपविले नाहीत. त्या राज्यात साडेतीन कोटी मुसलमान नागरिक आहेत. मात्र, त्यातील एकालाही आदित्यनाथांनी त्यांच्या पक्षाचे तिकीट लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मिळू दिले नाही. २०१४ व २०१७च्या निवडणुकी तशाच स्वरूपाच्या पार पडल्या. धर्मांध राजकारण व धार्मिकतेला राजकारणाची जोड, यामुळे त्या राज्यात त्यांचे सरकार मोठ्या संख्येने विजयीही झाले. मात्र, निवडणुकीने दिलेला अधिकार विकासासाठी व कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी असतो. तो धार्मिक वा सांस्कृतिक अन्यायासाठी किंवा इतिहास पुसून टाकण्यासाठी नसतो. मुद्दा आदित्यनाथ सरकारने ‘अलाहाबाद’ या शहराचे नाव बदलून त्याला ‘प्रयागराज’ बनविण्याचा घेतलेल्या निर्णयाचा आहे. अलाहाबाद हे गंगा, यमुना व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाचे पवित्र क्षेत्र आणि ते ‘प्रयागराज’ म्हणून ओळखलेही जाते. एके काळी अत्यंत सधन व औद्योगिक उभारणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराला मोठा सांस्कृतिक लौकिकही लाभला होता. मात्र, गेल्या काही दशकांत त्याला अधोगतीची अवकळा लाभली आणि त्याचे स्वरूप दिवसेंदिवस दरिद्री व दयनीय होत गेले. मुळात हिंदूंना पवित्र वाटणाऱ्या या शहराची उभारणीच सम्राट अकबराने केली. त्याने तिथे किल्ला उभारला, नदीचे तट बांधून यात्रेकरूंची सोय केली. त्यांच्यासाठी पागोळ्या बांधल्या. हे काम अकबराने इस्लामचा त्याग केल्यानंतर व त्याचा दीने इलाही हा नवा धर्म स्थापन केल्यानंतरच्या काळात केले आहे. त्याचमुळे त्याचे नाव ‘लाहाबाद’ (इलाहीबाद) असे ठेवले गेले. हे सर्वतोमुखी झाले व आजतागायत हे शहर त्याच नावाने ओळखले जाते, पण संघ व भाजपाच्या राजकारणात विकासकारणाहून राजकारण अधिक बळकट आहे. त्यामुळे विकास झाला नाही तरी चालेल. देशाचा इतिहास पुसून काढून त्याला भगवा रंग देण्याचे व त्याचे जमेल तेवढे हिंदूकरण करण्याचे धोरण त्या पक्षाने गेली चार वर्षे चालविले आहे व देशाने ते अनुभवले आहे. अलाहाबादचे ‘प्रयागराज’ करणे हा त्याच राजकारणाचा एक पवित्रा आहे. नावे बदलली की संस्कृती बदलते वा विकासाची गंगा वाहू लागते असे नाही. गेल्या काही वर्षांत अनेक शहरांची व स्थळांची नावे बदलली गेली, पण ती पूर्वी होती तशीच राहिली. आदित्यनाथांच्या राजकारणाचा हेतू मुसलमानांना डिवचण्याचा व डावलण्याचा आहे. हे राज्य वा हा देश तुमचा नाही, हे त्यांना बजावण्याचा आहे. तुमचे सारे काही आम्ही नाहिसे करू, हा त्यांचा हेका आहे. ताजमहालची त्यांनी चालविलेली दुर्दशा त्यातूनच सुरू झाली आहे. इतिहास हा कुणा एका धर्माचा, वर्गाचा वा जातीचा नसतो, तो देशाचा असतो. त्याचा वारसा जपणे व त्याकडे पाहात वर्तमानाची वाट प्रकाशित करणे हे नव्या पिढ्यांचे काम असते. मात्र, धर्मवेडाने आंधळेपण आलेली माणसे सर्वधर्मसमभाव व देशप्रेम याहून परधर्मद्वेषाचे राजकारणच अधिक करतात. मग त्यांना बाबर, अकबर व औरंगजेब सारखेच दिसतात. काही काळापूर्वी या आदित्यनाथाने सगळ्या सरकारी इमारती व राज्य सरकारच्या बसेस यांना भगवा रंग देण्याचा निर्णय घेतला. कुणा दुसºयाच्या शहाण्या सल्ल्याने तो अंमलात मात्र आला नाही. देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई परवा एका भाषणात म्हणाले, देश म्हणजे सर्वसमावेशकता, पण ते न्यायमूर्ती आहेत. आदित्यनाथासारखे महंत पदावरून मुख्यमंत्री पदावर आलेले राजकारणी नाहीत. निळ्या आकाशाला भगवा रंग फासण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते पछाडलेले नाहीत. आदित्यनाथ तसे आहेत. ते दुहीचे व द्वेषाचे राजकारण करीत आहेत. त्यांना मोदी अडवत नाहीत आणि भागवतांना हे चालणारेही आहे. लोक गप्प राहतात. कारण त्यांच्या मनात हिंदुत्ववाद्यांनी अलीकडे केलेल्या हिंसाचाराची धास्ती आहे. विरोधकांना कैद करता येते आणि मुसलमान? ते तर धास्तावलेलेच आहेत. देशात भय आणि संशयाचे राजकारण काही काळ यशस्वी होते. मात्र, त्यातून त्याची विभागणी होत नाही, हे आदित्यनाथांएवढेच त्यांच्या चाहत्यांनीही लक्षात घेतले पाहिजे. हा देश त्यात राहणाºया साºयांचा आहे व त्याचा इतिहासही त्या साºयांचा आहे. तो जपणे याचेच नाव राष्ट्रकारण आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ