शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तणावमुक्त व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:31 IST

‘मुंबईतील पोलीस आता आॅन ड्युटी आठ तासच काम करतील.’ आॅन ड्युटी २४ तास कार्यरत असणाºया पोलिसांसाठी ही एक चांगली बातमी आहे. तूर्त मुंबईसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला

‘मुंबईतील पोलीस आता आॅन ड्युटी आठ तासच काम करतील.’ आॅन ड्युटी २४ तास कार्यरत असणाºया पोलिसांसाठी ही एक चांगली बातमी आहे. तूर्त मुंबईसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असला तरी पुढे राज्यभर त्याचा विस्तार होईल आणि समाजातील या महत्त्वाच्या घटकाला न्याय मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. सध्या राज्यातील पोलिसांची अवस्था अतिशय बिकट आहे. कामाचे तास निश्चित नाहीत, साप्ताहिक सुटी मिळेलच याची शाश्वती नाही. वरून कामाचा प्रचंड ताण. आंदोलने, व्हीव्हीआयपींची सुरक्षा, सणावारातील बंदोबस्त, मोर्चे, अधिवेशन काळातील व्यवस्था अशा अनेक कामांमुळे पोलीस सतत तणावात असतात. लेबर कायद्यात आठ तासाच्या ड्युटीची तरतूद असतानाही मनुष्यबळ कमी असल्यामुळे राज्यातील पोलिसांना रोज १२ ते १४ तास काम करावे लागते. पुरेशी साधने नसतानाही जोखीम पत्करावी लागते. यात कुठे चूक झाली तर वरिष्ठांकडून तंबी मिळते. त्यांची बोलणी खावी लागते. चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. बदली, निलंबन, बडतर्फीची टांगती तलवार असतेच. अशा या वातावरणात काम करीत असताना पोलिसांवर प्रचंड मानसिक ताण येतो. या तणावातून काही पोलीस आत्महत्येचे पाऊल उचलतात. महाराष्टÑात एक लाखामागे १७ पोलीस आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. राष्टÑीय स्तरावरील हे प्रमाण १०.५ टक्के एवढे आहे. वरिष्ठांकडून होणारा अपमान आणि छळ हे यामागचे एक कारण असले तरी यातील बहुतांश आत्महत्यांमागे कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. कामाच्या व्यापासोबतच मानसिक पातळीवरही पोलिसाचे स्वत:शीच द्वंद्व चालू असते. ‘शेवटी मीही एक माणूस आहे‘ हे लोक समजून का घेत नाही, हा प्रश्न त्याला वारंवार पडत असावा. समाजातून आपुलकी मिळत नाही. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळातच नकारात्मक असतो. कुटुंबाच्या अपेक्षांची पूर्तताही करणेही शक्य होत नाही. अशा या कोंडीतून त्याच्या शारीरिक व मानसिक समस्या सुरू होतात. कामाचे ठिकाण, वेळ, घर किंवा पोलीस कॉलनी याचा कुठेच ताळमेळ नसल्यामुळे आणि साप्ताहिक सुटी किंवा रजा मिळेलच याची शाश्वती नसल्यामुळे सुटीचे नियोजन करता येत नाही. मुलाबाळांसोबत वेळ घालविता येत नाही. त्यातून मग नात्यातील तणाव निर्माण होतात. घर असतानाही बेघर झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. प्रशासन पातळीवरून वेळोवेळी मांडण्यात आलेल्या अहवालांतही पोलिसांच्या या अवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शेवटी महाराष्टÑ शासनाने याची दखल घेऊन काही उपाययोजना हाती घेतल्या हे चांगले झाले. मुंबईतील पोलिसांच्या कामाचे आठ तास केले, हा त्यातलाच एक टप्पा म्हटला पाहिजे. आजमितीला राज्यात एक लाखामागे अवघे १५३ पोलीस आहेत. राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. मोर्चे, आंदोलनांचा जोर वाढला आहे. व्हीव्हीआयपींचा सुरक्षा बंदोबस्त वाढत आहे. अशा स्थितीत आहे त्या तुटपुंज्या मनुष्यबळावर त्यांचा सामना करणे अवघड आहे. त्यासाठी पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियाही सुरू करावी लागेल. याशिवाय पोलिसांचे इतर अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या योग्य निवासाची सोय, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या बढत्या, बदल्यात पक्षपात होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पोलीस कुटुंबीयांसाठी नियमितपणे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेता आले तर कौटुंबिक ताणतणाव निवळण्यास मदत होऊ शकेल. या सर्व आघाड्यांवर त्यांना मानसिक स्वास्थ्य देता आले तरच इतर कोणत्याही आघाड्यांवर ते सक्षमपणे लढू शकतील हे लक्षात घेतले पाहिजे.

टॅग्स :Policeपोलिस