शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

पोलीस तणावमुक्त व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:31 IST

‘मुंबईतील पोलीस आता आॅन ड्युटी आठ तासच काम करतील.’ आॅन ड्युटी २४ तास कार्यरत असणाºया पोलिसांसाठी ही एक चांगली बातमी आहे. तूर्त मुंबईसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला

‘मुंबईतील पोलीस आता आॅन ड्युटी आठ तासच काम करतील.’ आॅन ड्युटी २४ तास कार्यरत असणाºया पोलिसांसाठी ही एक चांगली बातमी आहे. तूर्त मुंबईसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असला तरी पुढे राज्यभर त्याचा विस्तार होईल आणि समाजातील या महत्त्वाच्या घटकाला न्याय मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. सध्या राज्यातील पोलिसांची अवस्था अतिशय बिकट आहे. कामाचे तास निश्चित नाहीत, साप्ताहिक सुटी मिळेलच याची शाश्वती नाही. वरून कामाचा प्रचंड ताण. आंदोलने, व्हीव्हीआयपींची सुरक्षा, सणावारातील बंदोबस्त, मोर्चे, अधिवेशन काळातील व्यवस्था अशा अनेक कामांमुळे पोलीस सतत तणावात असतात. लेबर कायद्यात आठ तासाच्या ड्युटीची तरतूद असतानाही मनुष्यबळ कमी असल्यामुळे राज्यातील पोलिसांना रोज १२ ते १४ तास काम करावे लागते. पुरेशी साधने नसतानाही जोखीम पत्करावी लागते. यात कुठे चूक झाली तर वरिष्ठांकडून तंबी मिळते. त्यांची बोलणी खावी लागते. चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. बदली, निलंबन, बडतर्फीची टांगती तलवार असतेच. अशा या वातावरणात काम करीत असताना पोलिसांवर प्रचंड मानसिक ताण येतो. या तणावातून काही पोलीस आत्महत्येचे पाऊल उचलतात. महाराष्टÑात एक लाखामागे १७ पोलीस आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. राष्टÑीय स्तरावरील हे प्रमाण १०.५ टक्के एवढे आहे. वरिष्ठांकडून होणारा अपमान आणि छळ हे यामागचे एक कारण असले तरी यातील बहुतांश आत्महत्यांमागे कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. कामाच्या व्यापासोबतच मानसिक पातळीवरही पोलिसाचे स्वत:शीच द्वंद्व चालू असते. ‘शेवटी मीही एक माणूस आहे‘ हे लोक समजून का घेत नाही, हा प्रश्न त्याला वारंवार पडत असावा. समाजातून आपुलकी मिळत नाही. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळातच नकारात्मक असतो. कुटुंबाच्या अपेक्षांची पूर्तताही करणेही शक्य होत नाही. अशा या कोंडीतून त्याच्या शारीरिक व मानसिक समस्या सुरू होतात. कामाचे ठिकाण, वेळ, घर किंवा पोलीस कॉलनी याचा कुठेच ताळमेळ नसल्यामुळे आणि साप्ताहिक सुटी किंवा रजा मिळेलच याची शाश्वती नसल्यामुळे सुटीचे नियोजन करता येत नाही. मुलाबाळांसोबत वेळ घालविता येत नाही. त्यातून मग नात्यातील तणाव निर्माण होतात. घर असतानाही बेघर झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. प्रशासन पातळीवरून वेळोवेळी मांडण्यात आलेल्या अहवालांतही पोलिसांच्या या अवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शेवटी महाराष्टÑ शासनाने याची दखल घेऊन काही उपाययोजना हाती घेतल्या हे चांगले झाले. मुंबईतील पोलिसांच्या कामाचे आठ तास केले, हा त्यातलाच एक टप्पा म्हटला पाहिजे. आजमितीला राज्यात एक लाखामागे अवघे १५३ पोलीस आहेत. राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. मोर्चे, आंदोलनांचा जोर वाढला आहे. व्हीव्हीआयपींचा सुरक्षा बंदोबस्त वाढत आहे. अशा स्थितीत आहे त्या तुटपुंज्या मनुष्यबळावर त्यांचा सामना करणे अवघड आहे. त्यासाठी पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियाही सुरू करावी लागेल. याशिवाय पोलिसांचे इतर अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या योग्य निवासाची सोय, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या बढत्या, बदल्यात पक्षपात होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पोलीस कुटुंबीयांसाठी नियमितपणे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेता आले तर कौटुंबिक ताणतणाव निवळण्यास मदत होऊ शकेल. या सर्व आघाड्यांवर त्यांना मानसिक स्वास्थ्य देता आले तरच इतर कोणत्याही आघाड्यांवर ते सक्षमपणे लढू शकतील हे लक्षात घेतले पाहिजे.

टॅग्स :Policeपोलिस