शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

काव्यगत न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 08:27 IST

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया अलिकडे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील न्यायालयात अटक वारंट रद्द करण्यासाठी आल्या होत्या. भाजपा नेते एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी एकूण २२ खटले वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केले आहेत.

- मिलिंद कुलकर्णीसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अलिकडे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील न्यायालयात अटक वारंट रद्द करण्यासाठी आल्या होत्या. भाजपा नेते एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी एकूण २२ खटले वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केले आहेत. बदनामी खडसे यांची झालेली असताना त्यांनी स्वत: खटला दाखल न करता कार्यकर्त्यांमार्फत दाखल करून माझा छळ चालविला असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.कर्करोगाने पीडित असल्याने प्रत्येक न्यायालयात जाणे शक्य नसल्याने सर्व खटले एकत्र करावे, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयातही त्यांनी ही कैफियत मांडली, दोनदा त्यांना अश्रू अनावर झाले. न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.भ्रष्टाचाराविरुध्द लढणे चुकीचे आहे काय? असा छळवाद का मांडला आहे, असे दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा व्हायला हवी.भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्रात लढा उभारला तो अण्णा हजारे यांनी. राळेगण सिद्धीत रचनात्मक कार्य केल्यानंतर अण्णा यांनी संपूर्ण देश असा का होऊ शकत नाही, असा प्रश्न समाजाला विचारला. आधी कृती आणि मग उक्ती या प्रकारात अण्णांचे कार्य मोडत असल्याने तरुणांपासून तर विचारवंतांपर्यंत अनेक जण त्यांना जोडले गेले. संघटन तयार होत असताना, कार्य विस्तारत असताना काही पथ्य पाळावी लागतात. आंदोलन हे व्यक्तीकेंद्रित न होता, सामूहिक निर्णयावर भर देणारे असायला हवे. परंतु ते व्यक्तीकेंद्रित राहिले आहे, हा भ्रष्टाचारविरोधी लढ्याला मिळालेला शाप आहे. अण्णा यांच्यासोबत असलेले अनेक विचारवंत, कार्यकर्ते हळूहळू त्यांना सोडून गेले. परवाच्या दिल्लीतील फसलेल्या आंदोलनात कोणीही नामवंत व्यक्ती सहभागी झालेली नव्हती, हे ठळकपणे समोर आले.यापूर्वीच्या दिल्लीतील आंदोलनात सहभागी अरविंद केजरीवाल, किरण बेदी, रामदेव बाबा यांनी राजकीय स्वार्थ साधल्यानंतर आंदोलन वाऱ्यावर सोडले. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची स्थापना मुळात या आंदोलनातून झाली. परंतु पुन्हा केवळ व्यक्तीकेंद्रीत राजकारणामुळे ‘आप’ची प्रतिमा माफीनामा मागणारा आणि पंजाब, गोव्यात पराभूत होणारा पक्ष अशी झाली. दिल्लीत सत्ता असूनही सरकार आणि पक्षात मोठा सावळागोंधळ आहे. योगेंद्र यादव, कुमार विश्वास हे एकेकाळचे सहकारी त्यांना सोडून गेले.भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे चुकीचे नाही, परंतु हा लढाऊ नेता, कार्यकर्ता प्रामाणिक असायला हवा. दुर्दैवाने या चळवळीतील नेते ‘हम करेसो कायदा’ या मनोभूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. माहिती अधिकार कायदा तसेच संबंधितांच्या प्रतिस्पर्धी गटाने दिलेल्या कागदपत्रांवरुन हे नेते मंत्री, राजकीय लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिकांवर थेट आरोप करतात. प्रतिष्ठित व्यक्तींवर आरोप म्हटल्यावर प्रसारमाध्यमे ते उचलून धरतात. विरोधी पक्ष त्याचे भांडवल करतात. समाजदेखील त्यावर विश्वास ठेवतो. न्यायालयाने निकाल देण्यापूर्वीच त्या व्यक्तीची राजकीय, व्यावसायिक मोठी हानी होते. पुन्हा ही प्रकरणे तडीस नेण्याचा उत्साह भ्रष्टाचारविरोधी नेत्यांमध्ये दिसून आलेला नाही. त्यामुळेच केजरीवालांना माफीनाम्याचे सत्र सुरू करावे लागले.दुसºयावर आरोप करताना स्वत: ची प्रतिमा प्रामाणिक, स्वच्छ असायला हवे ना? पण या मंडळींना प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र दुसºयाकडून नको असते, आम्ही प्रामाणिक आहोत, म्हणजे आहोतच. त्याविषयी युक्तीवाद करणे त्यांच्या कार्यपद्धतीत बसत नाही.आता कल्पना इनामदार या अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील कार्यकर्तीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दमानियांवर आरोप केले. खडसे यांना गुंतविण्यासाठी दमानीया यांनी माझ्याकडे प्रस्ताव दिला होता. तर दमानिया म्हणतात, भुजबळांविरुद्ध लढ्यातून दूर व्हावे, म्हणून इनामदार माझ्याकडे प्रस्ताव घेऊन आल्या होत्या. भ्रष्टाचाराविरुध्द लढणा-या नेत्यांकडून एकमेकांवर होणा-या चिखलफेकीने या चळवळीची होणारी हानी, धोक्यात आलेली विश्वासार्हता हे समाजाच्या दृष्टीने गंभीर विषय आहेत.दमानिया बाई यांनी खडसेंविरुद्ध खटला दाखल केला, तर खडसे समर्थकांनी त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले. लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत. ते बजावणे म्हणजे छळवाद कसे म्हणता येईल? आपण वापरला तो अधिकार, दुस-याने वापरला तर तो छळवाद, असे म्हणणे न्यायोचित नाही.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे