शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पाऊल उचला, मागे वळून पाहायला वेळ नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 08:18 IST

दिनांक १ जून रोजी संध्याकाळी ४.१५ ते ७ या दरम्यान कन्याकुमारीहून नवी दिल्लीला परत येत असताना विमानप्रवासात शब्दबद्ध केलेले विचार..

- नरेंद्र मोदीपंतप्रधान

माझ्या प्रिय देशवासीयांनो,लोकशाहीच्या महापर्वाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तीन दिवस कन्याकुमारी इथे आध्यात्मिक यात्रा झाली. ती पूर्ण करून दिल्लीला रवाना होण्यासाठी मी विमानात येऊन बसलो आहे. स्वतःमध्ये अपार ऊर्जेचा प्रवाह  अनुभवतो आहे.या निवडणुकीत अनेक सुखद योगायोग आले आहेत. अमृतकाळातल्या या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाची सुरवात मी १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थळ मेरठ इथून केली. भारतमातेची परिक्रमा करत माझी शेवटची प्रचारसभा पंजाबमधल्या होशियारपूर इथे झाली. संत रविदासजी यांची तपोभूमी.  त्यानंतर  कन्याकुमारीमध्ये भारतमातेच्या चरणांशी बसण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या क्षणांमध्ये निवडणुकीचा कोलाहल तन-मनात दाटला होता. रॅली, ‘रोड-शो’मध्ये पाहिलेले असंख्य चेहरे, अपार स्नेहाचा उमाळा, अनेकांच्या नजरेतला विश्वास, ती आपुलकी.. सारे आठवून माझे डोळे पाणावत होते. मी नीरवतेमध्ये जात होतो, साधनेत  प्रवेश करत होतो. 

काही क्षणातच राजकीय वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप... आरोपांचा आवाज आणि शब्द सारे काही अंतर्धान होऊ लागले. माझ्या मनातला विरक्त भाव अधिक गडद झाला. इतक्या मोठ्या दायित्वामध्ये अशी साधना कठीण असते; मात्र कन्याकुमारीची भूमी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने ती सोपी केली. कन्याकुमारीमध्ये विवेकानंद  स्मारकाची निर्मिती एकनाथ रानडेजींनी केली होती. एकनाथजींसोबत भटकंती करण्याची संधी मला अनेकदा मिळाली.  या ठिकाणी विवेकानंद शिला स्मारकाबरोबरच संत तिरुवल्लूवर यांची भव्य मूर्ती,  गांधी मंडपम् आणि कामराजर मणीमंडपम् आहे. जे लोक देशाच्या एकतेविषयी शंका व्यक्त करतात, त्यांना कन्याकुमारीची ही भूमी एकतेचा अमीट संदेश देते. 

स्वामी विवेकानंद म्हणाले होते,  Every Nation Has a Message To deliver, a mission to fulfil, a destiny to reach. भारत हजारो वर्षांपासून याच भावनेने  वाटचाल करीत आहे. हजारो वर्षांपासून विचारांच्या संशोधनाचे केंद्र राहिला आहे. ‘इदं न मम’ हा भारताच्या चारित्र्याचा एक सहज आणि स्वाभाविक भाग बनला आहे. भारताच्या कल्याणातून जगाचे कल्याण आणि भारताच्या प्रगतीतून जगाची प्रगती, या धारणेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपली स्वातंत्र्य चळवळ आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी जगातील अनेक देश पारतंत्र्यात होते. भारताच्या स्वातंत्र्याने त्या देशांनाही प्रेरणा आणि बळ दिले आणि त्या देशांनीही स्वातंत्र्य मिळविले. 

आज भारताचे प्रशासनिक प्रारूप जगातील अनेक देशांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आले आहे. अवघ्या १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीच्या अवस्थेतून बाहेर काढणे ही अभूतपूर्व बाब आहे. लोकाभिमुख उत्तम सुशासन (प्रो-पीपल गुड गव्हर्नन्स), आकांक्षित जिल्हे (aspirational district), आकांक्षित तालुके (aspirational block) या अभिनव प्रयोगांची जगभरात चर्चा होत आहे. गरिबांचे सक्षमीकरण करण्यात, व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यात आणि गरिबांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर करू शकतो, याचे उदाहरण म्हणून आपल्या भारताची डिजिटल इंडिया मोहीम आज संपूर्ण जगासमोर एक उदाहरण म्हणून समोर आली आहे. 

सद्य:स्थितीत भारताची प्रगती आणि भारताचा उदय ही जगभरातील आपल्या सर्व सहप्रवासी देशांसाठीदेखील एक ऐतिहासिक घटना असणार आहे. आता एकही क्षण वाया न घालवता आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि मोठ्या उद्दिष्टांच्या दिशेने पावले उचलायची आहेत. नवी स्वप्ने पाहायची आहेत आणि ती स्वप्ने जगायला सुरुवात करायची आहे. मी देशासाठी रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्सफॉर्म (परिवर्तन) असा दृष्टिकोन समोर ठेवला आहे.  आपल्याला Speed (वेग), Scale (श्रेणी), Scope (व्याप्ती) आणि Standards (मानके) असे चहुबाजूंनी वेगाने काम करावे लागेल.

स्वामी विवेकानंद यांनी १८९७ मध्ये म्हटले होते की, आपल्याला पुढील ५० वर्षे केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करायची आहेत. त्यांच्या या आवाहनानंतर बरोबर ५० वर्षांनंतर, १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. आज आपल्याकडे तशीच सुवर्णसंधी आहे. आपण पुढील २५ वर्षे केवळ आणि केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करूया. आपले हे प्रयत्न भावी पिढ्या आणि आगामी शतकांसाठी नवभारताचा भक्कम पाया बनून अमर राहतील. हे लक्ष्य आता दूर नाही. चला, वेगाने पावले उचला!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी