शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मणिपूर हिंसाचारावर PM मोदींनी एक वर्ष दोन महिने पूर्ण झाल्यावर मौन सोडले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 05:30 IST

सरकारी पातळीवर होत असलेला वांशिक भेदभावाचा पुरस्कार, हेच मणिपूर शांत न होण्यामागील मुख्य कारण आहे. दुर्दैवाने त्याची चिंता ना राज्य सरकारला वाटते, ना केंद्र सरकारला! तशी ती वाटली असती, तर मणिपूर कधीच शांत झाले असते.

मणिपूरमध्ये ३ मे २०२३ पासून उफाळलेल्या वांशिक हिंसाचारासंदर्भात धारण केलेले मौन अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचाराच्या उद्रेकास बरोबर एक वर्ष दोन महिने पूर्ण झाल्यावर सोडले. बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेस उत्तर देताना, पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचाराची धग कमी झाल्याचा दावा केला आणि विरोधकांना या मुद्द्यावरून राजकारण न करण्याचे आवाहन केले. काही तत्त्व आगीत तेल ओतण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला; परंतु हिंसाचारास एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटूनही, ते स्वत: या मुद्द्यावर का बोलले नाहीत किंवा त्यांना मणिपूरला भेट देऊन हिंसाचारग्रस्तांना दिलासा का द्यावासा वाटला नाही, या प्रश्नाचे उत्तर काही त्यांनी दिले नाही.

केंद्रीय गृहमंत्री काही दिवस आणि गृह राज्यमंत्री काही आठवडे मणिपूरमध्ये तळ ठोकून बसले होते, याचा मात्र त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधानांनी मणिपूर हिंसाचारावर धारण केलेल्या मौनावर आणि त्या राज्याला भेट न देण्यावर सातत्याने टीकास्त्र डागत असलेल्या विरोधकांचे मात्र पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे समाधान झालेले दिसत नाही. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी मणिपूरच्या संदर्भात पंतप्रधानांवर कडवट भाषेत केलेल्या उपरोधिक टीकेतून तेच संकेत मिळतात. बुधवारी पंतप्रधान संसदेत मणिपूर हिंसाचारावर राज्य सरकारची पाठराखण करीत असताना, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने मात्र मणिपूर सरकारला चांगलेच धारेवर धरले. मणिपूर मध्यवर्ती कारागृहातील एका कच्च्या कैद्याला, केवळ तो कुकी समुदायातील असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात न नेल्याबद्दल, न्यायालयाने राज्य सरकारची जोरदार कानउघाडणी केली. अर्थात त्यामुळे मणिपूर सरकारवर काही फरक पडण्याची शक्यता कमीच आहे; अन्यथा वर्षभरापेक्षा अधिक काळ राज्य हिंसाचाराच्या आगीत धगधगत असतानाही, वांशिक भेदभावाची पाठराखण त्या सरकारने केलीच नसती.

सरकारी पातळीवर होत असलेला वांशिक भेदभावाचा पुरस्कार, हेच मणिपूर शांत न होण्यामागील मुख्य कारण आहे. दुर्दैवाने त्याची चिंता ना राज्य सरकारला वाटते, ना केंद्र सरकारला! तशी ती वाटली असती, तर मणिपूर कधीच शांत झाले असते. दुसऱ्या बाजूला विरोधकही या मुद्द्यावर गंभीर असल्याचे दिसत नाही. मणिपूरमधील हिंसाचार ही त्यांना मोदी सरकारला धारेवर धरण्याची आयती संधी तेवढी वाटते. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित न करण्यामागे सत्ताधाऱ्यांचा राजकीय स्वार्थ असावा असे म्हणावे, तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ मणिपूरच नव्हे, तर संपूर्ण ईशान्य भारतात जबर फटका बसला आहे.

लोकसभेच्या मणिपूरमधील दोन्ही जागा तर रालोआने गमावल्याच; पण आसाम आणि अरुणाचल प्रदेश वगळता ईशान्येतील इतरही राज्यांमध्ये त्या आघाडीला जबर फटका बसला आहे. मेघालयातील दोन्ही आणि नागालँड व मिझोरममधील एकुलत्या एक जागाही विरोधकांनी जिंकल्या आहेत. आश्चर्य म्हणजे बुधवारी पंतप्रधान राज्यसभेत म्हणाले, की काही तत्त्व आगीत तेल ओतत आहेत आणि मणिपूरची जनता त्यांना नाकारल्याशिवाय राहणार नाही! मणिपूरच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत तर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील रालोआलाच नाकारले आहे. पंतप्रधानांनी मौन सोडण्यामागील कदाचित तेदेखील एक कारण असू शकते; पण मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करायची असल्यास आपल्याला राजकारण बाजूला ठेवावे लागेल, हे त्यांचे विधान मात्र सगळ्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

ईशान्य भारत हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत नाजूक भाग आहे. ‘चिकन नेक’ या नावाने ओळखली जात असलेली जमिनीची चिंचोळी पट्टी देशाच्या मुख्य भूमीला ईशान्य भारताशी जोडण्याचे काम करते. नेमका तिथेच वार करून ईशान्येतील राज्यांना भारतापासून तोडण्याचे स्वप्न चीन अनेक वर्षांपासून जोपासत आला आहे. ते पूर्ण होऊ द्यायचे नसल्यास त्या भागात शांतता नांदणे अत्यंत आवश्यक आहे. त्या भागातील जनतेच्या मनात, त्यांना वेगळेपणाची वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण न होऊ देणे, ही मुख्य भूमीतील सगळ्यांची, प्रामुख्याने राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. दुर्दैवाने संकुचित स्वार्थासाठी राजकीय पक्षांना त्याचा विसर पडत आहे. राजकारण म्हटले, की विरोधकांवर वार-प्रतिवार हे चालतच राहणार आहे; पण किमान राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे तरी त्यापासून दूर ठेवले पाहिजेत. त्याचे भान सत्ताधारी अन् विरोधकांना येईल, तो देशासाठी सुदिन असेल!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारlok sabhaलोकसभा