शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

सावली हरवण्याचे सुख

By admin | Updated: May 19, 2017 02:43 IST

निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवता येऊ शकतात. किंबहुना एकही क्षेत्र असे आढळणार नाही, की ज्याची माहिती

- प्रल्हाद जाधवनिसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवता येऊ शकतात. किंबहुना एकही क्षेत्र असे आढळणार नाही, की ज्याची माहिती, ज्याचे उत्तर निसर्गाकडे नाही. आणि म्हणून माणसाने निसर्गाकडे सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून पाहिले पाहिजे, असे मला वाटते.गेल्याच आठवड्यात आपण शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. सकाळी साडेअकराच्या सुमारास सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने माणसाची सावली हरवल्याचा आभास निर्माण झाला. एरव्ही डावीकडे किंवा उजवीकडे असणारी किंवा मागे पुढे असणारी, सतत सोबत करणारी त्याची सावली काही क्षण त्याला सोडून गेली होती...सावली ही माणसाच्या सर्वात जवळची गोष्ट. ती कायम आपल्या सोबत असणार असा त्याला विश्वास असतो; पण तीसुद्धा कधी ना कधी आपली सोबत सोडणार आहे हे जळजळीत वास्तव स्वीकारूनच माणसाला जगता आले पाहिजे आणि तसे जगता आले तरच त्याला जगण्याचा खरा अर्थ उमगला असे म्हणता येईल.सावली हरवणे हा काही क्षणांचा आभास असला किंवा चकवा असला तरी, आपली सावलीही आपल्याला सोडून जाऊ शकते हे त्यामागील सत्य माणसाला बरेच काही शिकवून जाणारे आहे.माणूस जगताना अनेक गोष्टी घट्ट धरून ठेवतो. हे माझे, ते माझे करतो. मी इतक्या पदव्या मिळवल्या, इतकी प्रॉपर्टी मिळवली, इतका प्रवास केला, इतकी माणसे जोडली, असे म्हणत राहतो. हा सारा हिशेब अखेरच्या निरोपाच्या क्षणी निरर्थक ठरणारा असतो. या साऱ्या गोष्टी इथेच सोडून आपल्याला एकट्यानेच त्या शेवटच्या अज्ञात प्रवासासाठी निघायचे आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा माणसाला मोठा धक्का बसतो आणि तो तडफडायला लागतो. पण याची जाणीव आधीपासूनच असेल तर माणसाला त्याचा धक्का बसत नाही, आणि म्हणूनच कदाचित निसर्ग माणसाला हा सावली हरवण्याचा चकवा घालत असावा.हे माझे हे माझे करत प्रत्येक गोष्टीला चिकटून न बसता आज ना उद्या हे मला सोडावे लागणार आहे, याचे भान ठेवून निर्लेप मनाने जगणारा माणूस सदैव सुखी असतो. इदं न मम हा वेदांत त्याला सांगण्याची वेळ येत नाही. आणि म्हणूनच स्वत:ची सावली हरवून बसण्याची जाणीव सुखपर्यवासी आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि ती करून दिल्याबद्दल आपण निसर्गाप्रति कृतज्ञ असायला हवे.