शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

सावली हरवण्याचे सुख

By admin | Updated: May 19, 2017 02:43 IST

निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवता येऊ शकतात. किंबहुना एकही क्षेत्र असे आढळणार नाही, की ज्याची माहिती

- प्रल्हाद जाधवनिसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवता येऊ शकतात. किंबहुना एकही क्षेत्र असे आढळणार नाही, की ज्याची माहिती, ज्याचे उत्तर निसर्गाकडे नाही. आणि म्हणून माणसाने निसर्गाकडे सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून पाहिले पाहिजे, असे मला वाटते.गेल्याच आठवड्यात आपण शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. सकाळी साडेअकराच्या सुमारास सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने माणसाची सावली हरवल्याचा आभास निर्माण झाला. एरव्ही डावीकडे किंवा उजवीकडे असणारी किंवा मागे पुढे असणारी, सतत सोबत करणारी त्याची सावली काही क्षण त्याला सोडून गेली होती...सावली ही माणसाच्या सर्वात जवळची गोष्ट. ती कायम आपल्या सोबत असणार असा त्याला विश्वास असतो; पण तीसुद्धा कधी ना कधी आपली सोबत सोडणार आहे हे जळजळीत वास्तव स्वीकारूनच माणसाला जगता आले पाहिजे आणि तसे जगता आले तरच त्याला जगण्याचा खरा अर्थ उमगला असे म्हणता येईल.सावली हरवणे हा काही क्षणांचा आभास असला किंवा चकवा असला तरी, आपली सावलीही आपल्याला सोडून जाऊ शकते हे त्यामागील सत्य माणसाला बरेच काही शिकवून जाणारे आहे.माणूस जगताना अनेक गोष्टी घट्ट धरून ठेवतो. हे माझे, ते माझे करतो. मी इतक्या पदव्या मिळवल्या, इतकी प्रॉपर्टी मिळवली, इतका प्रवास केला, इतकी माणसे जोडली, असे म्हणत राहतो. हा सारा हिशेब अखेरच्या निरोपाच्या क्षणी निरर्थक ठरणारा असतो. या साऱ्या गोष्टी इथेच सोडून आपल्याला एकट्यानेच त्या शेवटच्या अज्ञात प्रवासासाठी निघायचे आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा माणसाला मोठा धक्का बसतो आणि तो तडफडायला लागतो. पण याची जाणीव आधीपासूनच असेल तर माणसाला त्याचा धक्का बसत नाही, आणि म्हणूनच कदाचित निसर्ग माणसाला हा सावली हरवण्याचा चकवा घालत असावा.हे माझे हे माझे करत प्रत्येक गोष्टीला चिकटून न बसता आज ना उद्या हे मला सोडावे लागणार आहे, याचे भान ठेवून निर्लेप मनाने जगणारा माणूस सदैव सुखी असतो. इदं न मम हा वेदांत त्याला सांगण्याची वेळ येत नाही. आणि म्हणूनच स्वत:ची सावली हरवून बसण्याची जाणीव सुखपर्यवासी आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि ती करून दिल्याबद्दल आपण निसर्गाप्रति कृतज्ञ असायला हवे.