शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सावली हरवण्याचे सुख

By admin | Updated: May 19, 2017 02:43 IST

निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवता येऊ शकतात. किंबहुना एकही क्षेत्र असे आढळणार नाही, की ज्याची माहिती

- प्रल्हाद जाधवनिसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवता येऊ शकतात. किंबहुना एकही क्षेत्र असे आढळणार नाही, की ज्याची माहिती, ज्याचे उत्तर निसर्गाकडे नाही. आणि म्हणून माणसाने निसर्गाकडे सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून पाहिले पाहिजे, असे मला वाटते.गेल्याच आठवड्यात आपण शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. सकाळी साडेअकराच्या सुमारास सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने माणसाची सावली हरवल्याचा आभास निर्माण झाला. एरव्ही डावीकडे किंवा उजवीकडे असणारी किंवा मागे पुढे असणारी, सतत सोबत करणारी त्याची सावली काही क्षण त्याला सोडून गेली होती...सावली ही माणसाच्या सर्वात जवळची गोष्ट. ती कायम आपल्या सोबत असणार असा त्याला विश्वास असतो; पण तीसुद्धा कधी ना कधी आपली सोबत सोडणार आहे हे जळजळीत वास्तव स्वीकारूनच माणसाला जगता आले पाहिजे आणि तसे जगता आले तरच त्याला जगण्याचा खरा अर्थ उमगला असे म्हणता येईल.सावली हरवणे हा काही क्षणांचा आभास असला किंवा चकवा असला तरी, आपली सावलीही आपल्याला सोडून जाऊ शकते हे त्यामागील सत्य माणसाला बरेच काही शिकवून जाणारे आहे.माणूस जगताना अनेक गोष्टी घट्ट धरून ठेवतो. हे माझे, ते माझे करतो. मी इतक्या पदव्या मिळवल्या, इतकी प्रॉपर्टी मिळवली, इतका प्रवास केला, इतकी माणसे जोडली, असे म्हणत राहतो. हा सारा हिशेब अखेरच्या निरोपाच्या क्षणी निरर्थक ठरणारा असतो. या साऱ्या गोष्टी इथेच सोडून आपल्याला एकट्यानेच त्या शेवटच्या अज्ञात प्रवासासाठी निघायचे आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा माणसाला मोठा धक्का बसतो आणि तो तडफडायला लागतो. पण याची जाणीव आधीपासूनच असेल तर माणसाला त्याचा धक्का बसत नाही, आणि म्हणूनच कदाचित निसर्ग माणसाला हा सावली हरवण्याचा चकवा घालत असावा.हे माझे हे माझे करत प्रत्येक गोष्टीला चिकटून न बसता आज ना उद्या हे मला सोडावे लागणार आहे, याचे भान ठेवून निर्लेप मनाने जगणारा माणूस सदैव सुखी असतो. इदं न मम हा वेदांत त्याला सांगण्याची वेळ येत नाही. आणि म्हणूनच स्वत:ची सावली हरवून बसण्याची जाणीव सुखपर्यवासी आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि ती करून दिल्याबद्दल आपण निसर्गाप्रति कृतज्ञ असायला हवे.