शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

‘अमृता’ला विष बनविणारे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:33 IST

कोल्हापुरात भरउन्हाळ्यात वृक्षलागवडीचा उपक्रम राबविला आहे. अशास्त्रीय पद्धतीने लावलेली ही झाडे जगतील का ? भरउन्हाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम तुम्ही कुठे पाहिला, ऐकला आहे? नसेल तर कोल्हापूरला या, येथे तो पाहायला मिळेल. उन्हाळ्यातही वृक्षारोपण कसे यशस्वी करता येते, हे शिकायला मिळेल. कारण महापालिकेने तसा शोध लावून त्याची अंमलबजावणी केली आहे.

- चंद्रकांत कित्तुरेएखाद्याला नवजीवन किंवा संजीवनी देण्यासाठी अमृत दिले जाते, पण हेच अमृत (?) कोवळ्या झाडांच्या जीवावर उठले आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत राज्यभरात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्यासाठी महापालिका, नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेने अमृत योजनेतून मिळालेल्या निधीतून जी काही कामे सुरू केली आहेत त्यामध्ये भरउन्हाळ्यातील वृक्षारोपणाचा समावेश आहे. पुणे येथील निसर्ग लँडस्केप सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरातील २७ गुंठ्यातील २० गुंठे जमिनीत दोन फुटांचे अंतर न ठेवता आठ-दहा फूट उंचीची सुमारे एक हजार झाडे लावण्यात आली आहेत. दोन झाडांमध्ये किती अंतर असावे याचे निकषही पाळले गेलेले नाहीत. वड-पिंपळ यासारख्या झाडांचेही अशा पद्धतीने रोपण करण्यात आले आहे. पूर्णपणे अशास्त्रीय पद्धतीने हे वृक्षारोपण सुरू आहे. शास्त्रीयदृष्ट्या दोन झाडांमधील अंतर ८ ते १० फुटांचे आवश्यक असते. मात्र, येथे एक फूट चौरस अंतरामध्ये चार-चार झाडे लावण्यात आली आहेत. बरे, भरउन्हाळ्यात लावलेली झाडे जगतील का, याचा साधा विचारही ही झाडे लावताना केला गेला नाही. कोल्हापूर महापालिकेची वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समिती आहे. या समितीमधील तज्ज्ञांचाही सल्ला या कामासाठी घेतला गेला नाही. काम केल्याचे दाखवायचे आणि निधी खर्ची टाकायचा याचसाठी हे केल्याचे दिसते.‘लोकमत’ने या साऱ्या प्रकाराबाबत आवाज उठविल्यानंतर नियमानुसार सर्व काही सुरू असल्याचा खुलासा महापालिकेतर्फे करण्यात आला, पण प्रत्यक्ष वृक्षारोपणाच्या ठिकाणी भेट दिली असता वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे लक्षात येते. महापालिकेच्या आयुक्तांनीही या वृक्षारोपणाची पाहणी करून झालेल्या चुका तात्काळ सुधारण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर यापुढे वृक्षारोपण करताना वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समितीसह सर्वांच्या सहमतीनेच ते करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.२०१५-१६ या वर्षातही अमृत योजनेंतर्गत कोल्हापूर शहरात महापालिकेतर्फे एक कोटी रुपये खर्च करून झाडे लावण्यात आली आहेत. त्यातील किती झाडे अस्तित्वात आहेत हा संशोधनाचा विषय आहे. २०१६-१७ साठीही एक कोटी ६० लाख रुपये खर्च करून बेलबागेसह तीन ठिंकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. एकीकडे पर्यावरण रक्षण आणि वृक्षारोपणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये दिले जात असताना या योजनांची कशी वाट लावली जाते, याचे हे ठळक उदाहरण म्हणावे लागेल. राज्यात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाते. त्यामधील किती जगतात, यावर नेहमीच चर्चा झडत असते. त्याची कारणे काहीही असली तरी कोल्हापूर महापालिकेचे भरउन्हाळ्यातील हे वृक्षारोपण म्हणजे अमृताला विष बनविण्यासारखे आहे.