शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृता’ला विष बनविणारे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:33 IST

कोल्हापुरात भरउन्हाळ्यात वृक्षलागवडीचा उपक्रम राबविला आहे. अशास्त्रीय पद्धतीने लावलेली ही झाडे जगतील का ? भरउन्हाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम तुम्ही कुठे पाहिला, ऐकला आहे? नसेल तर कोल्हापूरला या, येथे तो पाहायला मिळेल. उन्हाळ्यातही वृक्षारोपण कसे यशस्वी करता येते, हे शिकायला मिळेल. कारण महापालिकेने तसा शोध लावून त्याची अंमलबजावणी केली आहे.

- चंद्रकांत कित्तुरेएखाद्याला नवजीवन किंवा संजीवनी देण्यासाठी अमृत दिले जाते, पण हेच अमृत (?) कोवळ्या झाडांच्या जीवावर उठले आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत राज्यभरात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्यासाठी महापालिका, नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेने अमृत योजनेतून मिळालेल्या निधीतून जी काही कामे सुरू केली आहेत त्यामध्ये भरउन्हाळ्यातील वृक्षारोपणाचा समावेश आहे. पुणे येथील निसर्ग लँडस्केप सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरातील २७ गुंठ्यातील २० गुंठे जमिनीत दोन फुटांचे अंतर न ठेवता आठ-दहा फूट उंचीची सुमारे एक हजार झाडे लावण्यात आली आहेत. दोन झाडांमध्ये किती अंतर असावे याचे निकषही पाळले गेलेले नाहीत. वड-पिंपळ यासारख्या झाडांचेही अशा पद्धतीने रोपण करण्यात आले आहे. पूर्णपणे अशास्त्रीय पद्धतीने हे वृक्षारोपण सुरू आहे. शास्त्रीयदृष्ट्या दोन झाडांमधील अंतर ८ ते १० फुटांचे आवश्यक असते. मात्र, येथे एक फूट चौरस अंतरामध्ये चार-चार झाडे लावण्यात आली आहेत. बरे, भरउन्हाळ्यात लावलेली झाडे जगतील का, याचा साधा विचारही ही झाडे लावताना केला गेला नाही. कोल्हापूर महापालिकेची वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समिती आहे. या समितीमधील तज्ज्ञांचाही सल्ला या कामासाठी घेतला गेला नाही. काम केल्याचे दाखवायचे आणि निधी खर्ची टाकायचा याचसाठी हे केल्याचे दिसते.‘लोकमत’ने या साऱ्या प्रकाराबाबत आवाज उठविल्यानंतर नियमानुसार सर्व काही सुरू असल्याचा खुलासा महापालिकेतर्फे करण्यात आला, पण प्रत्यक्ष वृक्षारोपणाच्या ठिकाणी भेट दिली असता वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे लक्षात येते. महापालिकेच्या आयुक्तांनीही या वृक्षारोपणाची पाहणी करून झालेल्या चुका तात्काळ सुधारण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर यापुढे वृक्षारोपण करताना वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समितीसह सर्वांच्या सहमतीनेच ते करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.२०१५-१६ या वर्षातही अमृत योजनेंतर्गत कोल्हापूर शहरात महापालिकेतर्फे एक कोटी रुपये खर्च करून झाडे लावण्यात आली आहेत. त्यातील किती झाडे अस्तित्वात आहेत हा संशोधनाचा विषय आहे. २०१६-१७ साठीही एक कोटी ६० लाख रुपये खर्च करून बेलबागेसह तीन ठिंकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. एकीकडे पर्यावरण रक्षण आणि वृक्षारोपणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये दिले जात असताना या योजनांची कशी वाट लावली जाते, याचे हे ठळक उदाहरण म्हणावे लागेल. राज्यात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाते. त्यामधील किती जगतात, यावर नेहमीच चर्चा झडत असते. त्याची कारणे काहीही असली तरी कोल्हापूर महापालिकेचे भरउन्हाळ्यातील हे वृक्षारोपण म्हणजे अमृताला विष बनविण्यासारखे आहे.