शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

नियोजन आणि गोंधळ

By admin | Updated: June 27, 2015 00:30 IST

नियोजनाची कला ही एक अशी महत्त्वाची बाब आहे, जिच्यामुळे रंक राव बनू शकतो किंवा नियोजनाअभावी राजा रंक बनू शकतो. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीमागे विधात्याचं

विजयराज बोधनकर -नियोजनाची कला ही एक अशी महत्त्वाची बाब आहे, जिच्यामुळे रंक राव बनू शकतो किंवा नियोजनाअभावी राजा रंक बनू शकतो. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीमागे विधात्याचं नियोजन आहे. ठरल्या वेळापत्रकाप्रमाणे ऋतू येतात, काम बजावून जातात. अशा अनेक गोष्टींपासून माणसाने धडा घ्यायला पाहिजे. मानवी विकासामध्ये नियोजन हे राजमुकुटासारखी •भूमिका बजावत असते. ज्या व्यक्तीजवळ किंवा ज्या घरात नियोजनाचा अभावच अभाव असतो त्या घरात कायम दारिद्र्यच वास करीत असते. पण अत्यंत सामान्य घरात जर नियोजन अर्थातच प्लॅनींगची सवय लागलेली असेल ते घर ठरल्या वेळेत श्रीमंत होत जातं. वैचारीकदृष्ट्या सक्षम होत जातं. एका अशाच नियोजनाच्या बाबतीत शून्य असलेल्या घरी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो. शहर नवीन होतं. आमच्या शहरापासून खूप लांब असल्यामुळे आम्ही ट्रेनचं परतीचं रिझर्वेशन करूनच ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताची परतीची ट्रेन होती. रेल्वे स्टेशनपासून ते घर तसं लांब होतं म्हणून आम्ही रात्रीच एक रिक्षावाला बुक करून ठेवायला सांगितले. त्या घरच्या प्रमुखाने रिक्षा बुक केल्याचे सांगितले. आम्ही निश्चिंत झालो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे लवकर उठून आटोपून तयार झालो, तरीही घरातली माणसं काही उठली नव्हती. मग आम्ही घर प्रमुखाला उठविले. निवांतपणे ते उठले, आरामात विधी आटोपले, आमची तगमग चालू होती. मग हे महाशय रिक्षा शोधायला गेले. नंतर कळलं त्यांनी अगोदरच्या दिवशी रिक्षा बुक केलीच नव्हती. बराच वेळानंतर रिक्षा सापडली, पण वेळ खूप झाला. कसेबसे स्टेशनला पोहचलो, तर गाडी निघून गेली होती. आम्ही निराश झालो. पण त्या घर-प्रमुखाच्या चेहऱ्यावर कुठलीही अपराधीपणाची भावना नव्हती. लट ती व्यक्ती विनासंकोच म्हणाली, ‘चला आता घरी, मस्त दुपारचं जेवा आणि रात्रीच्या गाडीने निघा!’ पुढचा सारा गोंधळ आपल्या लक्षात आलाच असेल. ही गोष्ट तशी खूप छोटी, पण त्यावरून •भारतीयांची मानसीकता लक्षात येते. नियोजनाच्या बाबतीत अस्ताव्यस्त राहणं हा आपला स्थायीभाव असावा. घर असो वा व्यवसाय, वा देश, नियोजन नसेल तर सारं चुकतच जातं. वेळेला, कामाला, दर्र्जाला, संबधांना सुद्धा मॅनेज करावं लागतं. निष्काळजी लोकांमुळे योजनेचा धुव्वा उडतो. छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळकांनी आपलं स्वराज्य केवळ नियोजनाच्या बळावर मिळवलं हे सांगायला हवं का? नियोजन हासुद्धा अध्यात्माचाच एक महत्वाचा भाग आहे.