शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन आणि गोंधळ

By admin | Updated: June 27, 2015 00:30 IST

नियोजनाची कला ही एक अशी महत्त्वाची बाब आहे, जिच्यामुळे रंक राव बनू शकतो किंवा नियोजनाअभावी राजा रंक बनू शकतो. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीमागे विधात्याचं

विजयराज बोधनकर -नियोजनाची कला ही एक अशी महत्त्वाची बाब आहे, जिच्यामुळे रंक राव बनू शकतो किंवा नियोजनाअभावी राजा रंक बनू शकतो. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीमागे विधात्याचं नियोजन आहे. ठरल्या वेळापत्रकाप्रमाणे ऋतू येतात, काम बजावून जातात. अशा अनेक गोष्टींपासून माणसाने धडा घ्यायला पाहिजे. मानवी विकासामध्ये नियोजन हे राजमुकुटासारखी •भूमिका बजावत असते. ज्या व्यक्तीजवळ किंवा ज्या घरात नियोजनाचा अभावच अभाव असतो त्या घरात कायम दारिद्र्यच वास करीत असते. पण अत्यंत सामान्य घरात जर नियोजन अर्थातच प्लॅनींगची सवय लागलेली असेल ते घर ठरल्या वेळेत श्रीमंत होत जातं. वैचारीकदृष्ट्या सक्षम होत जातं. एका अशाच नियोजनाच्या बाबतीत शून्य असलेल्या घरी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो. शहर नवीन होतं. आमच्या शहरापासून खूप लांब असल्यामुळे आम्ही ट्रेनचं परतीचं रिझर्वेशन करूनच ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताची परतीची ट्रेन होती. रेल्वे स्टेशनपासून ते घर तसं लांब होतं म्हणून आम्ही रात्रीच एक रिक्षावाला बुक करून ठेवायला सांगितले. त्या घरच्या प्रमुखाने रिक्षा बुक केल्याचे सांगितले. आम्ही निश्चिंत झालो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे लवकर उठून आटोपून तयार झालो, तरीही घरातली माणसं काही उठली नव्हती. मग आम्ही घर प्रमुखाला उठविले. निवांतपणे ते उठले, आरामात विधी आटोपले, आमची तगमग चालू होती. मग हे महाशय रिक्षा शोधायला गेले. नंतर कळलं त्यांनी अगोदरच्या दिवशी रिक्षा बुक केलीच नव्हती. बराच वेळानंतर रिक्षा सापडली, पण वेळ खूप झाला. कसेबसे स्टेशनला पोहचलो, तर गाडी निघून गेली होती. आम्ही निराश झालो. पण त्या घर-प्रमुखाच्या चेहऱ्यावर कुठलीही अपराधीपणाची भावना नव्हती. लट ती व्यक्ती विनासंकोच म्हणाली, ‘चला आता घरी, मस्त दुपारचं जेवा आणि रात्रीच्या गाडीने निघा!’ पुढचा सारा गोंधळ आपल्या लक्षात आलाच असेल. ही गोष्ट तशी खूप छोटी, पण त्यावरून •भारतीयांची मानसीकता लक्षात येते. नियोजनाच्या बाबतीत अस्ताव्यस्त राहणं हा आपला स्थायीभाव असावा. घर असो वा व्यवसाय, वा देश, नियोजन नसेल तर सारं चुकतच जातं. वेळेला, कामाला, दर्र्जाला, संबधांना सुद्धा मॅनेज करावं लागतं. निष्काळजी लोकांमुळे योजनेचा धुव्वा उडतो. छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळकांनी आपलं स्वराज्य केवळ नियोजनाच्या बळावर मिळवलं हे सांगायला हवं का? नियोजन हासुद्धा अध्यात्माचाच एक महत्वाचा भाग आहे.