शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

नियोजन आणि गोंधळ

By admin | Updated: June 27, 2015 00:30 IST

नियोजनाची कला ही एक अशी महत्त्वाची बाब आहे, जिच्यामुळे रंक राव बनू शकतो किंवा नियोजनाअभावी राजा रंक बनू शकतो. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीमागे विधात्याचं

विजयराज बोधनकर -नियोजनाची कला ही एक अशी महत्त्वाची बाब आहे, जिच्यामुळे रंक राव बनू शकतो किंवा नियोजनाअभावी राजा रंक बनू शकतो. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीमागे विधात्याचं नियोजन आहे. ठरल्या वेळापत्रकाप्रमाणे ऋतू येतात, काम बजावून जातात. अशा अनेक गोष्टींपासून माणसाने धडा घ्यायला पाहिजे. मानवी विकासामध्ये नियोजन हे राजमुकुटासारखी •भूमिका बजावत असते. ज्या व्यक्तीजवळ किंवा ज्या घरात नियोजनाचा अभावच अभाव असतो त्या घरात कायम दारिद्र्यच वास करीत असते. पण अत्यंत सामान्य घरात जर नियोजन अर्थातच प्लॅनींगची सवय लागलेली असेल ते घर ठरल्या वेळेत श्रीमंत होत जातं. वैचारीकदृष्ट्या सक्षम होत जातं. एका अशाच नियोजनाच्या बाबतीत शून्य असलेल्या घरी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो. शहर नवीन होतं. आमच्या शहरापासून खूप लांब असल्यामुळे आम्ही ट्रेनचं परतीचं रिझर्वेशन करूनच ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताची परतीची ट्रेन होती. रेल्वे स्टेशनपासून ते घर तसं लांब होतं म्हणून आम्ही रात्रीच एक रिक्षावाला बुक करून ठेवायला सांगितले. त्या घरच्या प्रमुखाने रिक्षा बुक केल्याचे सांगितले. आम्ही निश्चिंत झालो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे लवकर उठून आटोपून तयार झालो, तरीही घरातली माणसं काही उठली नव्हती. मग आम्ही घर प्रमुखाला उठविले. निवांतपणे ते उठले, आरामात विधी आटोपले, आमची तगमग चालू होती. मग हे महाशय रिक्षा शोधायला गेले. नंतर कळलं त्यांनी अगोदरच्या दिवशी रिक्षा बुक केलीच नव्हती. बराच वेळानंतर रिक्षा सापडली, पण वेळ खूप झाला. कसेबसे स्टेशनला पोहचलो, तर गाडी निघून गेली होती. आम्ही निराश झालो. पण त्या घर-प्रमुखाच्या चेहऱ्यावर कुठलीही अपराधीपणाची भावना नव्हती. लट ती व्यक्ती विनासंकोच म्हणाली, ‘चला आता घरी, मस्त दुपारचं जेवा आणि रात्रीच्या गाडीने निघा!’ पुढचा सारा गोंधळ आपल्या लक्षात आलाच असेल. ही गोष्ट तशी खूप छोटी, पण त्यावरून •भारतीयांची मानसीकता लक्षात येते. नियोजनाच्या बाबतीत अस्ताव्यस्त राहणं हा आपला स्थायीभाव असावा. घर असो वा व्यवसाय, वा देश, नियोजन नसेल तर सारं चुकतच जातं. वेळेला, कामाला, दर्र्जाला, संबधांना सुद्धा मॅनेज करावं लागतं. निष्काळजी लोकांमुळे योजनेचा धुव्वा उडतो. छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळकांनी आपलं स्वराज्य केवळ नियोजनाच्या बळावर मिळवलं हे सांगायला हवं का? नियोजन हासुद्धा अध्यात्माचाच एक महत्वाचा भाग आहे.