शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पीके-यमकेचे ‘सत्यमेव जयते’

By राजा माने | Updated: April 30, 2018 01:46 IST

महागुरू नारदांनी इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेला कामगार दिनाची सुटी दिल्याने तो खुश होता. (यमके म्हणजे राजकुमार हिरानी-आमीर खान यांच्या ‘पीके’चा डुप्लीकेट आमचा यमगरवाडीचा ‘एमके’ अर्थात मनकवडे!

महागुरू नारदांनी इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेला कामगार दिनाची सुटी दिल्याने तो खुश होता. (यमके म्हणजे राजकुमार हिरानी-आमीर खान यांच्या ‘पीके’चा डुप्लीकेट आमचा यमगरवाडीचा ‘एमके’ अर्थात मनकवडे! त्याला समोरच्या व्यक्तीचा हस्तस्पर्श झाला की त्या व्यक्तीचा इतिहास जाणण्याची सिद्धी ‘पीके’प्रमाणेच साध्य होती. म्हणूनच तर नारदांनी इंद्रदेवाकडे शिफारस करून त्याची इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टरपदी नियुक्ती केली होती.) आपली सुटी त्याने आपल्या यमगरवाडीला पानी फौंडेशनच्या कामावर श्रमदानासाठी देण्याचा निर्णय घेतला आणि खुशीने कुदळ-टिकाव घेऊन कामाच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यातच त्याचा फोन खणाणला! नारदांचा फोन नसावा अशी प्रार्थना करतच त्याने फोन उचलला. घडले तसेच. फोन नारदाचा नव्हता तर त्याचा डुप्लिकेट पीकेचा होता. तिकडून पीके बोलू लागला...पीके - कैसे हो भैय्या यमके?यमके - व्वा.. वाह... पीकेभैय्या तुम्ही? अलभ्य लाभ! कशी काय आठवण केलीत?पीके - मराठी भूमीत तुफान आलंय... तुम्हाला म्हाईत नही क्या भैय्या?यमके - म्हाईत कैसा नही? मै उधरच चल्या... हमारे यमगरवाडीमे श्रमदान चालू है उधर कामपेही जा रहा हूँ! पण मराठीमे बोला तो चलेगा क्या भैय्या?पीके - का नाही. आमीरभाई मराठी शिकते शिकते मुझे भी मराठी शिका गये!यमके - ते एक बरं झालं बाबा! आमच्या मराठी भूमीत आमीरभाई आणि किरणतार्इंनी १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यात पुन्हा तुफान आणलंय भावा... पण तू आज माझी आठवण का केलीस. अन् आमीरभार्इंनी तुला मला बोलायची परवानगी कशी दिली?पीके - अरे, आमीरभाई आणि किरणभाभी तुझ्याच भागातल्या गावांमध्ये स्वत: येऊन काम करताहेत. मग किरणभाभींनी मलाही बोलावून तुला भेटून माहिती घ्यायला सांगितले आहे.यमके - बाया-बापड्या म्हणू नको की लेकरं-बाळं म्हणू नको, सगळेच्या सगळे गावात पहाटंच कामावर पोहचत्यात... आणखी काय माहिती पाहिजे किरणतार्इंना?पीके - भैय्या, ते सगळं माहीत आहे भाभींना! पण नक्की कमी कुठे आहे काय, याची माहिती तुझ्याकडून पाहिजे आहे.यमके - काय राव! नेहमी चांगल्यातच काहीतरी कमी शोधायची जबाबदारी नेहमी महागुरू नारद माझ्यावर सोपवतात... आता तू पण!पीके - अरे, चांगलं काम अधिक चांगलं व्हावं यासाठीच तर ती जबाबदारी तुझ्यावर असते.यमके - हो. खरंच गावागावात माणसांनी मनापासून तुफान आणलंय... पण २२ मेनंतर या तुफानाला गावातल्या आणि भागातल्या लोकांनीच दिशा द्यायला हवी. पानी फौंडेशनने जसे गावांची निवड करताना सरपंच किंवा उपसरपंचासह गावकऱ्यांपैकीच चार जणांना श्रमदानाचे काम कसे करायचे, याचे प्रशिक्षण दिले. आता पुढे त्या गावात पाणी वितरण संस्थेसारख्या यंत्रणाची कायमस्वरूपी गावातल्याच लोकांची संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे.पीके - खरंच, भाभींना मी हे सांगतो! तुफान कायम ठेवायचे असेल तर सर्वांनी मिळून कायमस्वरूपी अशा संस्था उभ्या केल्याच पाहिजेत...- राजा माने

raja.mane@lokmat.com