शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पीकविम्याचा फेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:25 IST

गेल्या वर्षी एक कोटी लोकांनी विमा काढला असला तरी २४ लाख शेतक-यांनाच त्याच्या लाभापोटी १६४८ कोटी रुपये मिळाले.

गेल्या वर्षी एक कोटी लोकांनी विमा काढला असला तरी २४ लाख शेतक-यांनाच त्याच्या लाभापोटी १६४८ कोटी रुपये मिळाले. नुकसान झाल्यास हमखास भरपाई मिळेलच याची आजही खात्री नाही.पावसाने पाठ फिरविली, पिके करपायला लागली शिवारात ही गत अन् तिकडे शेतकरी विम्याच्या रांगेत. खेड्यांवर हळूहळू अवकळा पसरायला लागली. दुष्काळाची काळी सावली पुन्हा पडणार काय? दिवसभर वारे भन्नाट वाहते. चिलटांचा कहर वाढला. पारावरच्या गप्पांना रंग भरत नाही. कुठे तरी एखादं फटकारं पडल्याचं वाट्स अ‍ॅपवरून कळते आणि आपल्याकडेही येईल. अजून श्रावण संपला नाही. भादवा बाकी आहे. या जबर आशेवरच सगळेजण तग धरून आहेत. टी.व्ही.वर दाखविली जाणारी सह्याद्रीतील हिरवळ आणि पर्यटकांच्या टोळ्या नाही म्हटलं तरी कोरड्या मनावर हराळी उगवतात; पण रान सुकत चालले आहे. पीक विम्यासाठी बँकांसमोरच्या रांगा संपत नाही. मशागत बाजूला ठेवून शेतकरी रांगेत उभे आहेत. दोन-दिवस चार दिवस अर्ज भरायला शेकडो अडचणी. १५ पानाचा अर्ज दोन पानांचा केला. बँकेच्या खात्याला आधारची जोड पाहिजे. मोबाईल नंबरही. आता पुन्हा तुमची जात कोणती हेही लिहावे लागते. एक ना अनेक कटकटी. सगळ्यांकडेच मोबाईल आहेत असा समज सरकारने करून घेतलेला दिसतो.       विम्याच्या अडचणी इथेच संपत नाहीत. सगळी तयारी पूर्ण करून रांगेत उभे राहिले तर ‘सर्व्हर डाऊन’ असतो तर कधी वीजच नसते. याची वाट पाहात रांगेत दोन-दोन दिवस तिष्ठत उभे राहण्यावाचून पर्याय नसतो. ३१ जुलै हा विमा भरण्याचा शेवटचा दिवस होता; पण अखेर ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली. सरकारने या वर्षी या विमा प्रकारात अनेक तडजोडी केल्या. शेतकºयांच्या याद्याच सरकारकडे नाहीत. कारण राज्यातील गटसचिव संपावर गेलेले आहेत. कर्ज, पीक पेरा आदीचा उल्लेखच विम्याच्या अर्जात नाही. पीक पेºयाची नोंद तलाठी करतो; पण तलाठी कधी शेतावर जातात हा संशोधनाचा विषय आहे. एवढी उठाठेव करुनही अर्ज केला तरी विम्याची रक्कम मिळणार असेल तर तेथे पीक पेरा पाहिला जात नाही. प्रत्येक शेतकºयाला स्वतंत्र अर्ज दाखल करावा लागतो; पण विम्याची रक्कम द्यायची वेळ कंपनीवर आली तर तरी शेतकºयाची वैयक्तिक पीक पहाणी करीत नाही. गटानुसार नुकसान ठरवतात हे चुकीचे आहे. नुकसानीचा विचार सुद्धा वैयक्तिक पातळीवरच व्हायला पाहिजे. कारण प्रत्येकाची मशागतीची वेगळी पद्धत आणि प्राधान्यक्रम असतो; पण एकगठ्ठा निकष लावून विमा कंपन्या वाटाण्याच्या अक्षता लावतात. सरकारने १९९९-२००० मध्ये राष्ट्रीय पीक कृषी विमा योजना सुरू केली. परंतु प्रारंभी शेतकºयांचा प्रतिसाद नव्हता. पुढे सरकारने जनजागृती केली आणि सततचा दुष्काळ, शेतमालाचे पडलेले भाव यामुळे त्रस्त झालेला शेतकरी इकडे वळायला प्रारंभ झाला. शेतीच्या जुगारात सर्व काही गमावण्याची वेळ आली तरी काही तरी मदतीचा हात मिळेल ही अपेक्षा होती. गेल्या वर्षी महाराष्ट्रात १ कोटी शेतकºयांनी विमा काढला आणि ३९४७ कोटी रुपये विम्याच्या पोटी भरले होते. मराठवाड्यात या योजनेला चांगला प्रतिसाद दिसतो. कारण येथील पावसाचा लहरीपणा.मराठवाड्यात यावर्षी विम्यासाठी मोठमोठ्या रांगा दिसतात. नांदेडमध्ये तर रांगेमध्ये एका शेतकºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही ठळक घटना असली तरी इतरांच्या अडचणी काही कमी नाहीत. रविवारी बँका सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने काढले होते; पण जिल्हा मध्यवर्ती बँका वगळता राष्ट्रीयीकृत बँकांनी त्या आदेशाला फारसा प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. आता पावसाने ओढ दिल्याने शेतकरी धास्तावला आहे. मराठवाड्यात पावसाने अजूनही सरासरी गाठली नाही, म्हणून चिंता वाढली आहे. अजूनही जवळपास २० लाख शेतकºयांनी विमा काढला नाही चार दिवसात त्यांना काढता येईल. औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती वाईट आहे. पैठणमध्ये १६ टक्केच पाऊस झाला. वैजापूर २०, तर सिल्लोडमध्ये ४० टक्के पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात विमा काढण्यात शेतकºयांमध्ये निरुत्साह आहे. गेल्या वर्षी मिळालेला कमी मोबदला. किचकट प्रक्रिया म्हणून शेतकºयांनी पाठ फिरवली. काय तर विम्याच्या फेºयात शेतकरी अडकला आहे. - सुधीर महाजन