शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

भौतिक आणि दिव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:13 IST

हे विश्व पंच महाभूतांपासून बनलेले आहे. हे पंच महाभूत आहेत- पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या पाचही महाभूतांचे आपले-आपले गुण आहेत. पृथ्वीमध्ये गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे पाच गुण आढळतात.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायभा.पो.से.हे विश्व पंच महाभूतांपासून बनलेले आहे. हे पंच महाभूत आहेत- पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या पाचही महाभूतांचे आपले-आपले गुण आहेत. पृथ्वीमध्ये गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे पाच गुण आढळतात. शेवटी पृथ्वी सर्वात जास्त स्थूल आहे. दुसरे महाभूत जल हा पृथ्वीपेक्षा कमी स्थूल आहे, कारण त्याच्यात पृथ्वीपेक्षा एक गुण कमी आहे आणि तो गुण आहे गंध. पाण्यामध्ये चारच गुण आढळतात. या चार गुणांमध्ये रस गुण अग्नी या महाभूतामध्ये आढळत नाही. त्यामध्ये फक्त तीनच गुण आहेत. अग्नीच्या तीन गुणांपैकी रूप गुण वायू या महाभूतामध्ये आढळत नाही. या प्रकारे वायूच्या दोन गुणांपैकी स्पर्श गुण आकाश या महाभूतामध्ये आढळत नाही. आकाश यामध्ये केवळ एकच गुण आढळतो आणि तो आहे शब्द. जेव्हा आपण खालीपासून वरपर्यंत जातो तेव्हा असे समजून येते की गुण हळूहळू कमी होत जातात आणि हे पंच महाभूत हळूहळू स्थूलवरून सूक्ष्म बनत जाते. जर आपण वरून खालीपर्यंत येतो, तेव्हा ही प्रक्रिया उलटी होते आणि गुण वाढत जातात आणि महाभूत देखील सूक्ष्मवरून स्थूल होत जाते.या पंच महाभूतांचा अनुभव घेण्यासाठी निसर्गाने आपल्याला पाच इंद्रिये दिली आहेत. कान हे इंद्रिय आकाश तत्त्वापासून बनलेले आहे. ते केवळ ऐकण्याचे काम करते. ऐकण्याचा संबंध हा शब्दांशी आहे. त्वचा ही वायूच्या स्पर्शगुणातून बनलेली आहे. म्हणून ती स्पर्शाचा अनुभव करते. डोळे हे अग्नीच्या रूप गुणापासून बनलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये चमक आहे आणि ते पाहण्याचे काम करतात. जीभ ही जलच्या रसगुणातून बनलेली आहे. म्हणून ती रसाचा आस्वाद घेत असते. याप्रकारे घाणेंद्रिय म्हणजेच नाक हे पृथ्वीच्या गंधगुणातून बनलेले आहे. जेणेकरून ते गंध/वास घेण्याचे काम करते.आपल्या पाचही इंद्रियांचे कार्य हे निसर्गाद्वारे पूर्णपणे मर्यादित केले गेले आहे. शेवटी एक इंद्रिय दुसºया इंद्रियाचे काम करू शकत नाही. यामुळेच या इंद्रियाद्वारे प्राप्त अर्जित अनुभव मर्यादित असतात. जरी ही इंद्रिये पंच महाभूतांपासून बनलेली असली तरी शेवटी ती मर्त्य आहेत. भारतातील रहस्यवाद्यांनी या भौतिक जगाच्या पलीकडे देखील एका शक्तीचा अनुभव केला जो आपल्या इंद्रियांचा विषय नाही. त्या इंद्रियांच्या पलीकडील शक्तीला आपल्या तत्त्वज्ञांनी दैवी म्हटले आहे. ही दैवी शक्ती निर्माणदेखील होत नाही आणि नष्टदेखील होत नाही. ती पूर्णपणे सर्वव्यापी आहे आणि साºया भेदांपासून वर आहे.

टॅग्स :newsबातम्या