शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

भौतिक आणि दिव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:13 IST

हे विश्व पंच महाभूतांपासून बनलेले आहे. हे पंच महाभूत आहेत- पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या पाचही महाभूतांचे आपले-आपले गुण आहेत. पृथ्वीमध्ये गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे पाच गुण आढळतात.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायभा.पो.से.हे विश्व पंच महाभूतांपासून बनलेले आहे. हे पंच महाभूत आहेत- पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या पाचही महाभूतांचे आपले-आपले गुण आहेत. पृथ्वीमध्ये गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे पाच गुण आढळतात. शेवटी पृथ्वी सर्वात जास्त स्थूल आहे. दुसरे महाभूत जल हा पृथ्वीपेक्षा कमी स्थूल आहे, कारण त्याच्यात पृथ्वीपेक्षा एक गुण कमी आहे आणि तो गुण आहे गंध. पाण्यामध्ये चारच गुण आढळतात. या चार गुणांमध्ये रस गुण अग्नी या महाभूतामध्ये आढळत नाही. त्यामध्ये फक्त तीनच गुण आहेत. अग्नीच्या तीन गुणांपैकी रूप गुण वायू या महाभूतामध्ये आढळत नाही. या प्रकारे वायूच्या दोन गुणांपैकी स्पर्श गुण आकाश या महाभूतामध्ये आढळत नाही. आकाश यामध्ये केवळ एकच गुण आढळतो आणि तो आहे शब्द. जेव्हा आपण खालीपासून वरपर्यंत जातो तेव्हा असे समजून येते की गुण हळूहळू कमी होत जातात आणि हे पंच महाभूत हळूहळू स्थूलवरून सूक्ष्म बनत जाते. जर आपण वरून खालीपर्यंत येतो, तेव्हा ही प्रक्रिया उलटी होते आणि गुण वाढत जातात आणि महाभूत देखील सूक्ष्मवरून स्थूल होत जाते.या पंच महाभूतांचा अनुभव घेण्यासाठी निसर्गाने आपल्याला पाच इंद्रिये दिली आहेत. कान हे इंद्रिय आकाश तत्त्वापासून बनलेले आहे. ते केवळ ऐकण्याचे काम करते. ऐकण्याचा संबंध हा शब्दांशी आहे. त्वचा ही वायूच्या स्पर्शगुणातून बनलेली आहे. म्हणून ती स्पर्शाचा अनुभव करते. डोळे हे अग्नीच्या रूप गुणापासून बनलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये चमक आहे आणि ते पाहण्याचे काम करतात. जीभ ही जलच्या रसगुणातून बनलेली आहे. म्हणून ती रसाचा आस्वाद घेत असते. याप्रकारे घाणेंद्रिय म्हणजेच नाक हे पृथ्वीच्या गंधगुणातून बनलेले आहे. जेणेकरून ते गंध/वास घेण्याचे काम करते.आपल्या पाचही इंद्रियांचे कार्य हे निसर्गाद्वारे पूर्णपणे मर्यादित केले गेले आहे. शेवटी एक इंद्रिय दुसºया इंद्रियाचे काम करू शकत नाही. यामुळेच या इंद्रियाद्वारे प्राप्त अर्जित अनुभव मर्यादित असतात. जरी ही इंद्रिये पंच महाभूतांपासून बनलेली असली तरी शेवटी ती मर्त्य आहेत. भारतातील रहस्यवाद्यांनी या भौतिक जगाच्या पलीकडे देखील एका शक्तीचा अनुभव केला जो आपल्या इंद्रियांचा विषय नाही. त्या इंद्रियांच्या पलीकडील शक्तीला आपल्या तत्त्वज्ञांनी दैवी म्हटले आहे. ही दैवी शक्ती निर्माणदेखील होत नाही आणि नष्टदेखील होत नाही. ती पूर्णपणे सर्वव्यापी आहे आणि साºया भेदांपासून वर आहे.

टॅग्स :newsबातम्या