शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

शारीरिक क्षमता आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:02 IST

- विनायक पात्रुडकर सध्या सर्वत्र भेसळ केली जाते. त्यामुळे पोषक अन्न मिळणे कठीणच झाले आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेला उतरणारा खेळाडू शारीरीकदृष्ट्या ...

- विनायक पात्रुडकर

सध्या सर्वत्र भेसळ केली जाते. त्यामुळे पोषक अन्न मिळणे कठीणच झाले आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेला उतरणारा खेळाडू शारीरीकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, असा दावा कोणीच करू शकणार नाही. त्यातूनच खेळाडूंचा आकस्मित मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. घाटकोपर येथील सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच स्पर्धेत १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईलच, मात्र याआधीही खेळाडूंचा स्पर्धेदरम्यान अथवा सराव करताना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ काही घटनांमध्ये खेळाडूची शारीरीक क्षमता कमी असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. परिणामी अशा मृत्यूमागची कारणे आता गंभीरपणे शोधायला हवीत. यातील प्रमुख कारण हे पोषक आहार न मिळणे आहे, असे नमूद केले तर वावगे ठरणार नाही. कारण सध्या बाजारात मिळणा-या बहुतांश अन्नात भेसळ केली जाते. फळ, भाज्या पिकवताना रसायनांचा अधिक वापर केला जाता. ही रसायने गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ठरतात. असे असताना पोषक आहाराचा दावा करणे नक्कीच चुकीचे ठरेल. किमान अन्न तरी भेसळ युक्त  मिळणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. शेतीवर फवारणी केली जाणारी रसायने घातक नसतील, यासाठी ठोस नियमावली तयार करायला हवी. तात्काळ उत्पादनासाठी पिकांवर प्रयोग होणार नाही, याकडेही लक्ष द्यायला हवे. तरच पोषक अन्न सर्वांना मिळू शकेल़  यासोबतच सध्या बाजारात शक्ती देणारे अनेक उत्पादने उपलब्ध आहेत़ ही उत्पादनेही तितकीच घातक आहेत. या उत्पादनांच्या अतिसेवनामुळेही खेळाडूंचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ अशा उत्पादनांच्या जाहिरातांवरही कोणाचेच निर्बंध नसते़ शक्तीवर्धक पावडर घेतल्याने शरीरसौष्ठव स्पर्धा खेळणा-या खेळाडूचा मध्यंतरी मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत संबंधित कंपनीला अन्न व औषध प्रशासनाने नोटीसही पाठवली होती. पण या प्रकरणाची दखल मर्यादीतच राहिली. पुढे व्यापक स्वरूपात यासंदर्भात कारवाई होणे आवश्यक होते. तसे घडले नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंचा पोषक आहार व दर्जेदार शक्तीवर्धक उत्पादन मिळतील, याची हम्मी देता येणार नाही. त्यामुळे खेळाडूंचे असे मृत्यू वांरवार घडतच राहतील. त्याला निर्बंध घालणे आवश्यक आहे. तरच दर्जेदार खेळाडू तयार होऊ शकतील. आता जे उत्तम कामगिरी खेळाडू आहेत, त्यांनाही अधिक सक्षम करता येईल. तेव्हा घाटकोपर येथील १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर तरी सरकारने यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.

टॅग्स :Mumbaiमुंबई