शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

शारीरिक क्षमता आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:02 IST

- विनायक पात्रुडकर सध्या सर्वत्र भेसळ केली जाते. त्यामुळे पोषक अन्न मिळणे कठीणच झाले आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेला उतरणारा खेळाडू शारीरीकदृष्ट्या ...

- विनायक पात्रुडकर

सध्या सर्वत्र भेसळ केली जाते. त्यामुळे पोषक अन्न मिळणे कठीणच झाले आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेला उतरणारा खेळाडू शारीरीकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, असा दावा कोणीच करू शकणार नाही. त्यातूनच खेळाडूंचा आकस्मित मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. घाटकोपर येथील सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच स्पर्धेत १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईलच, मात्र याआधीही खेळाडूंचा स्पर्धेदरम्यान अथवा सराव करताना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ काही घटनांमध्ये खेळाडूची शारीरीक क्षमता कमी असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. परिणामी अशा मृत्यूमागची कारणे आता गंभीरपणे शोधायला हवीत. यातील प्रमुख कारण हे पोषक आहार न मिळणे आहे, असे नमूद केले तर वावगे ठरणार नाही. कारण सध्या बाजारात मिळणा-या बहुतांश अन्नात भेसळ केली जाते. फळ, भाज्या पिकवताना रसायनांचा अधिक वापर केला जाता. ही रसायने गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ठरतात. असे असताना पोषक आहाराचा दावा करणे नक्कीच चुकीचे ठरेल. किमान अन्न तरी भेसळ युक्त  मिळणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. शेतीवर फवारणी केली जाणारी रसायने घातक नसतील, यासाठी ठोस नियमावली तयार करायला हवी. तात्काळ उत्पादनासाठी पिकांवर प्रयोग होणार नाही, याकडेही लक्ष द्यायला हवे. तरच पोषक अन्न सर्वांना मिळू शकेल़  यासोबतच सध्या बाजारात शक्ती देणारे अनेक उत्पादने उपलब्ध आहेत़ ही उत्पादनेही तितकीच घातक आहेत. या उत्पादनांच्या अतिसेवनामुळेही खेळाडूंचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ अशा उत्पादनांच्या जाहिरातांवरही कोणाचेच निर्बंध नसते़ शक्तीवर्धक पावडर घेतल्याने शरीरसौष्ठव स्पर्धा खेळणा-या खेळाडूचा मध्यंतरी मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत संबंधित कंपनीला अन्न व औषध प्रशासनाने नोटीसही पाठवली होती. पण या प्रकरणाची दखल मर्यादीतच राहिली. पुढे व्यापक स्वरूपात यासंदर्भात कारवाई होणे आवश्यक होते. तसे घडले नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंचा पोषक आहार व दर्जेदार शक्तीवर्धक उत्पादन मिळतील, याची हम्मी देता येणार नाही. त्यामुळे खेळाडूंचे असे मृत्यू वांरवार घडतच राहतील. त्याला निर्बंध घालणे आवश्यक आहे. तरच दर्जेदार खेळाडू तयार होऊ शकतील. आता जे उत्तम कामगिरी खेळाडू आहेत, त्यांनाही अधिक सक्षम करता येईल. तेव्हा घाटकोपर येथील १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर तरी सरकारने यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.

टॅग्स :Mumbaiमुंबई