शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सुभाषबापूंच्या टप्प्यात......

By admin | Updated: June 20, 2017 13:37 IST

शर्यत असो वा शिकार त्यात ‘टप्पा’ अत्यंत महत्त्वाचा असतो. राजकारण-समाजकारणाच्या वाटचालीत ‘लोकमंगल’च्या कासवाची ख्याती जतन करत राज्याचे सहकारमंत्री यांनी प्रत्येक टप्प्यावर यशच गाठले.

- राजा माने  
शर्यत असो वा शिकार त्यात ‘टप्पा’ अत्यंत महत्त्वाचा असतो. राजकारण-समाजकारणाच्या वाटचालीत ‘लोकमंगल’च्या कासवाची ख्याती जतन करत राज्याचे सहकारमंत्री यांनी प्रत्येक टप्प्यावर यशच गाठले. आता सहकारखाते अन् निकषाच्या वळणावर अनेकजण टप्प्यात आले आहेत... 
 
महाराष्ट्रात मान्सूनच्या बरसातीने तसे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले तरी शेतक-यांची कर्जमाफी आणि त्यासाठीचे निकष यावरून मात्र राज्यातील वातावरण तापतच आहे. सरसकट कर्जमाफीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे शिलेदार महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाषबापू देशमुख, जलसंपदामंत्री गिरीष महाजन आदींना अनेक किल्ल्यांवर लढावे लागत असल्याचे दिसते. त्यात महसूलमंत्री म्हणून चंद्रकांतदादा आणि सहकारमंत्री म्हणून सुभाषबापू तसे तोफेच्याच तोंडावर आहेत असेच म्हणावे लागेल. 
 
राज्यातील प्रत्येक विभाग आणि जिल्ह्याचे राजकारण कर्जमाफीच्या निकषांभोवतीच फिरणार आहे. सर्वसामान्य माणसाला मात्र धनदांडग्या शेतकºयांना कर्जमाफी मिळू नये असेच वाटते. अजितदादा असो वा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सर्वच पक्षाचे नेतेही सर्वसामान्य माणसाच्या मताशी अनुकूल अशीच भूमिका मांडताहेत. दहा हजार रुपयांच्या कर्जाचे निकष आणि ते कर्ज देणा-या बँकांची भूमिका व अवस्था हे खरे वादाचे विषय आहेत. त्या वादांचे स्वरूपही जिल्ह्याची सीमा ओलांडली की बदलते. राज्यातील सहकारक्षेत्र आणि विशेषत: जिल्हा सहकारी बँका हा जसा शेतकºयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तसाच राजकारण्यांच्या अस्तित्वाला आव्हान देणारा देखील आहे. 
 
त्यामुळे एकीकडे सहकारी व खाजगी साखर कारखानदार अडचणीत आल्याचे दिसते तर दुसरीकडे तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा विषय निकाली निघत नसल्याने राज्यातील जिल्हा बँकाही लटकल्या आहेत. बुडित होऊ पाहणारी कर्जे आणि घोटाळ्यांच्या जाचाने राज्यातील अनेक जिल्हा बँका अक्षरश: खंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाषबापू बँका आणि शेतकरी या दोहोंचे हित कसे साधणार, हे मोठे आव्हान ठरू शकले असते. सुभाषबापूंनी मात्र शेतकºयांचेही हित साधून हे आव्हानच आपल्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा ठरविल्याचे दिसून येते. या आव्हानांमुळे जिल्ह्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज त्यांच्या ‘टप्प्यात’ आले आहेत. 
 
ज्याचा सात-बारा त्याला सोसायटीचे सदस्यत्व आणि आता बाजार समित्यांच्या निवडणुकीतही मतदानाच्या अधिकारासाठी अवलंबिलेले मुक्त धोरण यामुळे अनेकांचे धाबे दणाणलेले असताना दहा लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असणाºया जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जदारांची यादीच जाहीर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. वाणगीदाखल सोलापूर जिल्ह्याचेच उदाहरण घेऊ या. जिल्हा सहकारी बँकेचे आज ५७६ कोटी रुपये थकीत आहेत. त्यात २४ कोटी ३३ लाख रुपये थकलेले कर्ज केवळ १७३ तथाकथित शेतकºयांकडे आहे. ‘त्या’ शेतकºयांमध्ये बहुसंख्य पुढारी आणि त्यांच्या ‘उजव्या-डाव्यांचा’ समावेश आहे.
 
जुन्या नोटांच्या वादात सोलापूर जिल्हा बँकेचेही १०२ कोटी रुपये लटकलेले आहेत. कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेले धनाढ्य, कर्जमाफी आणि नव्या कर्जाची गरज असलेला गरीब शेतकरी व शासनाचा निकषांसंदर्भात निघालेला अध्यादेश या कोंडीतून महाराष्ट्रातील शेतक-यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावे लागणार आहे. ती कोंडी फोडताना राजकारणातील गणिताची मांडणी चुकू नये यासाठी कर्जमाफी अन् नव्या कर्जाच्या सुलभ धोरणास विलंब होत आहे हे उघडच आहे. 
 
राज्यातल्या १४ जिल्हा सहकारी बँका शेतकºयांना कर्ज देण्यास असमर्थ ठरताहेत हे दिसताच सहकारमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांवर कर्ज न दिल्यास कारवाईचा बडगा उगारला तेही बरे झाले. त्या बँका आणि शेतकरी यांच्यामध्ये सोसायट्यांना ‘एजन्सी’ बनविण्याची कल्पना स्वागतार्ह आहे. शेतकºयांच्या कर्जाना राज्य शासनाचीच हमी असल्याने राष्ट्रीयकृत बँकांनी आता सकारात्मक भूमिका घेऊन कर्जवाटपाला गती दिली पाहिजे. 
कर्जमाफीचे सर्वमान्य निकष आणि सहकार कायदा या सर्वांचाच परिणाम राज्यातील सहकार आणि साखर सम्राटांवर ठळकपणे होणार हे स्पष्ट आहे. आजतरी सहकारमंत्री सुभाषबापूंच्या ‘टप्प्यात’ अनेक पुढारी आल्याचे दिसते. या टप्प्याचा निकाल काळच देईल ! 
 
 
 
लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत