शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

पेट्रोलचा भडका, ढिम्म सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 18:53 IST

पेट्रोलचा दर प्रतिबॅरल ७० डॉलरवरून १४ डॉलरवर आला होता.

पेट्रोल व डिझेलच्या दराने देशातील काही शहरांत शंभरी ओलांडली आहे. गेले दोन महिने इंधनाचे दर सतत वाढत आहेत. कोविड कमी होताच आर्थिक व्यवहार वाढत असतानाच इंधनाची दरवाढही झाली. हे टाळता आले असते, पण केंद्र व राज्य सरकार त्यासाठी राजी नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे त्या प्रमाणात भारतात दरवाढ होते. बाजारपेठीय अर्थशास्त्रानुसार हे म्हणणे खरे आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत हाच युक्तिवाद केला. मात्र याच न्यायाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलचे दर कमी असताना भारतात ते का कमी केले गेले नाहीत याचे उत्तर प्रधानांकडे नाही. कोविडने जगाला विळखा घातल्यानंतर जगभर लॉकडाऊन झाला व इंधनाची मागणी एकदम घसरली.

पेट्रोलचा दर प्रतिबॅरल ७० डॉलरवरून १४ डॉलरवर आला होता. बाजारपेठीय अर्थशास्त्रानुसार तेव्हा भारतात दर कमी व्हायला हवे होते. सप्टेंबरपासून जगातील आर्थिक व्यवहार सुरू झाले व इंधनाची मागणी वाढली. तेव्हापासून जगाच्या बाजारपेठेत इंधनाचे दर वाढत राहिले आहेत. मात्र भारतातील दरवाढ ही जगाच्या बाजारपेठेमुळे नसून केंद्र व राज्य सरकारच्या करवाढीमुळे आहे. इंधनावर सरकारने जबर कर लावले आहेत. यामध्ये केंद्राचा कर राज्यापेक्षा दुपटीने अधिक आहे. आज जेथे पेट्रोलचा दर १०० रुपये आहे, तेथे त्यातील ६२ रुपये केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत कररूपाने जातात. डिझेलवरील कर ५७ टक्के आहे. धमेंद्र प्रधान ज्याला बाजारपेठीय नियोजन म्हणतात ते पेट्रोलच्या बाबत १०० रुपयांपैकी ३८ रुपयांना लागू आहे. उर्वरित ६२ रुपयांबाबत केंद्र व राज्य सरकार सवलत देऊ शकते की नाही, या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकार सोयीस्कर मौन पाळते. या ६२ रुपयांबाबत सरकार हस्तक्षेप करू शकते.

डिसेंबरमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. त्याआधी ५९ दिवस हे दर स्थिर होते. जगाच्या बाजारपेठेत इंधनाचे भाव वाढत असताना हे ५९ दिवस दर स्थिर राहिले. कारण बाजारपेठेच्या यंत्रणेला बाजूला ठेऊन सरकारने दर नियंत्रण केले. सरकारने असे औदार्य दाखविले, कारण त्यावेळी बिहारमध्ये निवडणुका होत्या आणि त्या चुरशीच्या होणार होत्या. प्रचारात इंधन भाववाढीचा मुद्दा येऊ नये म्हणून ५९ दिवस दर स्थिर ठेवण्याचे चातुर्य केंद्र सरकारने दाखविले. आता कुठेही निवडणुका नाहीत.

दरवाढीमुळे जनता त्रस्त असली तरी राग व्यक्त करायला मतपेटी नाही. निवडणूक नसल्याची ‘सुविधा’ केंद्र सरकार वापरीत आहे व जेथे निवडणूक नाही तेथील राज्य सरकारेही तेच करीत आहेत. सरकारला असे करावे लागत आहे कारण आपली अर्थव्यवस्था नीट मार्गी लागलेली नाही. खरे दुखणे ते आहे. आज सरकारसाठी इंधनावरील कर हे हमखास उत्पन्नाचे साधन झाले आहे. अर्थव्यवस्था बलवान नसल्यामुळे अन्य मार्गांतून येणारे उत्पन्न रोडावले. कोविडमुळे ते अधिकच रोडावले. काही लोकप्रिय व काही लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी पैशाची गरज सतत असते.

पैसे मिळविण्याचा हमखास मार्ग म्हणजे इंधन दरवाढ आणि मध्यमवर्गावरील करभार. नोकरशाहीवरील खर्चही यातूनच उचलला जातो. उद्योगक्षेत्र, सेवा क्षेत्र अशा अन्य विविध क्षेत्रांतून उत्पन्नाचे स्त्रोत वाहात असते तर पेट्रोलवर इतके भरमसाठ कर लावण्याची गरज पडली नसती. मोदी सरकारने याबाबत आधीच्या सरकारांवर ताण केली. २०१४ मध्ये इंधनावरील करातून एक लाख ७२ हजार कोटी जनतेकडून उचलले गेले. तो आकडा २०१८ मध्ये तीन लाख ३६ हजार कोटींवर पोहोचला. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारेही याच चक्रव्यूहात अडकली आहेत. महाराष्ट्र सरकार व्हॅट कमी करून इंधनाचे दर कमी करू शकते. पण महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होत आहे. म्हणून जीएसटीचा परतावा द्या, मग इंधनावरील कर कमी करू असे राज्य सरकार म्हणते.

उद्या जीएसटीचा परतावा संपूर्ण मिळाला तरी इंधनावरील कर कमी होणार नाहीत, कारण महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही सक्षम नाही. मात्र अर्थव्यवस्थेला उभारी द्यायची असेल तर इंधनावरील कर कमी करणे अत्यावश्यक आहे. कारण इंधनावर अधिक खर्च होत गेला तर अन्य वस्तुंची खरेदी मध्यमवर्गाकडून कमी होईल. म्हणजे बाजारपेठेतील मागणी घटेल. मागणी घटली की उत्पादन घटेल. परिणामी कराचे उत्पन्नही कमी होईल. हे दुष्टचक्र भेदायचे असेल तर सरकारला ढिम्म बसून चालणार नाही. निवडणूक नसली तरी हस्तक्षेप करून दर कमी करावे लागतील. कोविडमधून सावरताना पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चटका नागरिकांना असह्य होत चालला आहे. याचे भान केंद्र व राज्याने ठेवावे.

टॅग्स :Petrolपेट्रोलCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी