शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

लोकसहभागातून टँकरमुक्ती

By किरण अग्रवाल | Updated: May 31, 2018 08:40 IST

काही प्रश्न असे असतात, जे सरकारने सोडविणे अपेक्षित असले तरी केवळ सरकारभरोसे राहून ते सुटत नसतात. पाणीटंचाईचा विषयदेखील त्यातलाच. कारण पाण्याची गावनिहाय समस्या वेगवेगळी असते.

काही प्रश्न असे असतात, जे सरकारने सोडविणे अपेक्षित असले तरी केवळ सरकारभरोसे राहून ते सुटत नसतात. पाणीटंचाईचा विषयदेखील त्यातलाच. कारण पाण्याची गावनिहाय समस्या वेगवेगळी असते. शिवाय, सरकारी मदतीची थिगळं लावून लावून किती लावणार? आणि त्यातून कायमस्वरूपी तोडगा कसा निघणार? परंतु गावकऱ्यांनी पुढाकार घेत या टंचाईतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर त्यातून प्रासंगिक स्वरूपाचीच नव्हे तर कायमस्वरूपी समस्यामुक्ती कशी साधता येते हे अनेक गावांनी दाखवून दिले आहे.मान्सून केरळमध्ये येऊन दाखल झाला आहे. लवकरच तो आपल्याही वेशीवर येईल. म्हणजे उन्हाच्या चटक्यातून मुक्ती लाभेल. यंदाचा चटका तसा तीव्रच होता. त्यामुळे कधी एकदा पाऊस येईल आणि चटक्यातून सुटका होईल असे साºयांना झाले आहे. दरवर्षी मे महिन्यात वळवाचा म्हणजे अकाली पाऊस हमखास यायचा, त्याने नुकसान व्हायचे खरे; परंतु भाजून निघणाºया कायेला काहीसा गारवा अनुभवायला मिळायचा. यंदा तसेही फारसे झाले नाही. काही ठिकाणी वळवाचा पाऊस झाला; पण तो दखलपात्र अथवा उत्पातकारी ठरल्याची वृत्ते नाहीत. अनेक ठिकाणी तर तो झालाच नाही. त्यामुळे आता थेट मान्सूनचीच प्रतीक्षा आहे. ती करताना व पावसासाठी आसुसले असताना यंदा एक बाब लक्षात राहणारी ठरावी ती म्हणजे, चटका तीव्र असूनही त्या तुलनेत पाणीटंचाई जाणवल्याची किंवा टँकरच्या मागणीसाठी संघर्ष करावा लागल्याची, हंडामोर्चे-आंदोलने झाल्याची फारशी उदाहरणे समोर आली नाहीत. शासनाने गेल्यावेळी कोट्यवधी रुपये खर्च करून राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील गावांमध्येच टँकर सुरू करावे लागल्याचे चित्र एकीकडे असताना, दुसरीकडे अनेक गावात लोकसहभागातून व सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने टँकरमुक्ती साधली गेल्याचे दिसून आले. शासकीय यंत्रणेद्वारे केल्या जाणाºया उपाययोजनेवर विसंबून न राहता लोकसहभागातून बंधाºयांचे खोलीकरण, तेथील गाळाचा उपसा किंवा लहान-मोठ्या नाल्यांचे पुनर्जीवितीकरण आदी कामे करून ठेवली गेल्याने दुष्काळासाठी ख्यातकीर्त असणाºया गावांतही टंचाईमुक्ती साधली गेल्याचे पहावयास मिळाले. चटक्याची तीव्रता यंदा कमी झाली ती या लोकसहभागातून साकारल्या गेलेल्या जलबचतीच्या कामांमुळे.सोशल मीडियावरील तरुण पिढीच्या गुरफटलेपणावर सर्वच थरातून टीका होत असते; पण याच मीडियाचा वापर करून घेत सोशल नेटवर्किंग फोरम या संघटनेने नाशिक जिल्ह्यातील पेठ व त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यांमधील नऊ गावे गेल्या दोन वर्षात टँकरमुक्त केली आहेत. पेठच्या वाजवड या अतिदुर्गम वाड्यावरील सुमारे ७० वर्षांपासूनचा पाणीप्रश्नही या फोरमने यंदा निकाली काढण्यात यश मिळवले आहे. महत्त्वाचे म्हणजे, नदीजोड प्रकल्पाची मोठी चर्चा केली जाते. त्यादृष्टीने शासनाचे आपल्यास्तरावर प्रयत्नही सुरू आहेत; पण याअगोदर ग्रामस्तरावर लोकसहभागातून नालाजोड साकारून पाण्याच्या टंचाईपासून मुक्ती मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न बागलाण तालुक्यात घडून आला आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या पुढाकाराने भिवरी नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी लगतच्या उत्राणे, तळवाडे, खामलोण परिसरात वळविण्यासाठी लोकसहभाग मिळवून नालाजोड प्रकल्प यशस्वी केला गेला. या प्रयत्नातून श्रीपूरवडे साखळी बंधाºयांची मालिका आता आकारास येऊ पाहात असून, त्यामुळे १६ गावांचा पाणीप्रश्न तर सुटला आहेच; शिवाय करंजाडी नदी बारमाही होण्याची आशा बळावली आहे. सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथे जय हरी ज्येष्ठ नागरिक संघ, तर निफाड तालुक्यातील भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर आदी गावांमध्ये पिंपळगाव बाजार समिती व सुला वाईन कंपनीच्या सहकार्याने लोकसहभागातून पाणी अडविण्याची कामे केली गेल्याने टँकरमुक्ती साधली गेली. ही झाली प्रातिनिधिक गावांची उदाहरणे, अन्यही अनेक गावांत ग्रामस्थांनी पुढे येत पाणीटंचाईवर मात केल्याचे दिसून आले आहे.विशेष म्हणजे, प्रख्यात अभिनेता आमीर खान यांच्या पानी फाउण्डेशन व समाजसेवी शांतिलाल मुथा यांच्या नेतृत्वातील भारतीय जैन संघटनेतर्फे गेल्यावर्षी राज्यातील ३० तालुक्यात जलसंधारणाची कामे केली गेली होती. यंदा २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यात अशी कामे केली गेली. अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी व ग्रामस्थांचा यात हिरीरीने सहभाग राहिल्याचे दिसून आले. जनतेत आपल्या उत्तरदायित्वाप्रतिची जाणीव जागृती असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट व्हावे, विविध उद्योगसमूहांच्या मदतीने केल्या जाणाºया जलसंधारणाच्या कामांमुळे ख-या अर्थाने शाश्वत विकासाचे प्रत्यंतर येत आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा हिनेदेखील सिन्नर तालुक्यातील निºहाळे या गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मदत केली आहे. तारे-तारकांची ही सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव लोकसहभागाला बळ देऊन गेली. राजेंंद्र पोटे यांच्या नेतृत्वातील ‘युवामित्र’ संस्थेने तर महाराष्ट्राखेरीज पंजाब, हरियाणा या राज्यातही यासंदर्भात काम चालविले आहे. लोकमत माध्यमसमूहानेदेखील ‘रिन’च्या माध्यमातून राज्यभर ‘जल उत्सव’ अभियान राबवून जनजागरणाद्वारे जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्याचे प्रयत्न चालविले आहेत व त्याला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत आहे. शासकीय प्रयत्नांखेरीज व्यक्ती व संस्थांचे असे प्रयत्न व लोकसहभागातूनच टँकरमुक्ती साधली गेली आहे. यंदा उन्हाळा तीव्र असूनही त्याचा चटका काहीसा सुसह्य ठरला आहे तो त्यामुळेच.

टॅग्स :WaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा