शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

लोकांच्या मनातले

By admin | Updated: November 22, 2015 23:27 IST

संदर्भ भले वेगळाच असेल, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अगदी लोकांच्या मनातलाच प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे.

संदर्भ भले वेगळाच असेल, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अगदी लोकांच्या मनातलाच प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे. राज्यकर्ता पक्ष कोणताही असो, ‘सरकार अमुक तमुकसाठी पैसा कमी पडू देणार नाही’ अशा वल्गना प्रत्यही केल्या जात असतात. त्यांच्यातील भंपकपणा जसा जनतेला कळत असतो, तसाच तो राज्यकर्त्यांना आणि अशा घोषणा करणाऱ्यांनाही कळत असतो. पण तरीही त्या थांबत नसल्याने न्यायालयाने अगदी थेटपणेच सरकारला विचारले आहे की, ‘ज्या बाबींवर खर्च करणे अत्यावश्यक असते, त्यांच्यासाठी सरकारकडे पैसा नसतो, तर मग स्मारकांसाठीच्या योजनांसाठी तो कोठून येतो?’ खरे तर तोही येतच नसतो. सारा खेळ म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ यासारखा असतो. नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या ‘पांडगो इलो रे इलो’ या नाटकात पांडगोच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘मी नव्याने निर्माण काहीही करू शकत नाही. फक्त इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करू शकतो!’ सरकारचा कारभारदेखील या पांडगोसारखाच असतो. ज्या कामांची खरी गरज आहे, त्या कामांसाठी निर्धारित पैसा केवळ राजकारणाने प्रेरित अनुत्पादक कामांवर खर्च करायचा. त्याचे साधे कारण म्हणजे ज्या कामांसाठी पैसा खर्च करणे गरजेचे असते आणि त्यामधून ज्यांचा लाभ होणे अपेक्षित असते, असे लोक सामान्यत: ‘नाहीरे’ वर्गातले असतात. त्याउलट स्मारकासारख्या योजनांची सांगड अस्मिता नावाच्या गारुडाशी घातली जाते. अशी अस्मिता जोपासणे नेहमीच भरल्या पोटी करावयाचे ‘सत्कृत्य’ असते. त्यामध्ये विशिष्ट वर्गाच्या बोलभांड पुढाऱ्यांचा स्वार्थ असतो आणि त्यांना त्यामधून अनायासेच मिरवून घेण्याची व स्वत:ला त्या विशिष्ट वर्गाचे नेते म्हणून घोषित करवून घेण्याची संधी असते. याच विशिष्ट वर्गातील सामान्यांना मात्र अशा पोषाखी कार्यक्रमांमध्ये काडीमात्र स्वारस्य नसते. परंतु हे वास्तव समाजासमोर मांडण्याचे जो कोणी धाडस करील, त्याची तत्काळ गठडी वळविली जाते. नशिबाने न्यायालयांबाबत आणि न्यायालयांच्या निवाड्यांबाबत अजून तरी कोणी तशी हिंमत दाखविलेली नाही. त्यामुळे नागपूर खंडपीठाने जनसामान्यांच्या मनातील बात उघडपणे बोलून दाखविण्याला एक वेगळे महत्त्व आहे. पण म्हणून सरकार त्यापासून काही धडा शिकेल असे निदान आज तरी म्हणता येत नाही. कारण जमानाच मुळी चमकोगिरीचा आला आहे.