शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या मनातले

By admin | Updated: November 22, 2015 23:27 IST

संदर्भ भले वेगळाच असेल, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अगदी लोकांच्या मनातलाच प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे.

संदर्भ भले वेगळाच असेल, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अगदी लोकांच्या मनातलाच प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे. राज्यकर्ता पक्ष कोणताही असो, ‘सरकार अमुक तमुकसाठी पैसा कमी पडू देणार नाही’ अशा वल्गना प्रत्यही केल्या जात असतात. त्यांच्यातील भंपकपणा जसा जनतेला कळत असतो, तसाच तो राज्यकर्त्यांना आणि अशा घोषणा करणाऱ्यांनाही कळत असतो. पण तरीही त्या थांबत नसल्याने न्यायालयाने अगदी थेटपणेच सरकारला विचारले आहे की, ‘ज्या बाबींवर खर्च करणे अत्यावश्यक असते, त्यांच्यासाठी सरकारकडे पैसा नसतो, तर मग स्मारकांसाठीच्या योजनांसाठी तो कोठून येतो?’ खरे तर तोही येतच नसतो. सारा खेळ म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ यासारखा असतो. नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या ‘पांडगो इलो रे इलो’ या नाटकात पांडगोच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘मी नव्याने निर्माण काहीही करू शकत नाही. फक्त इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करू शकतो!’ सरकारचा कारभारदेखील या पांडगोसारखाच असतो. ज्या कामांची खरी गरज आहे, त्या कामांसाठी निर्धारित पैसा केवळ राजकारणाने प्रेरित अनुत्पादक कामांवर खर्च करायचा. त्याचे साधे कारण म्हणजे ज्या कामांसाठी पैसा खर्च करणे गरजेचे असते आणि त्यामधून ज्यांचा लाभ होणे अपेक्षित असते, असे लोक सामान्यत: ‘नाहीरे’ वर्गातले असतात. त्याउलट स्मारकासारख्या योजनांची सांगड अस्मिता नावाच्या गारुडाशी घातली जाते. अशी अस्मिता जोपासणे नेहमीच भरल्या पोटी करावयाचे ‘सत्कृत्य’ असते. त्यामध्ये विशिष्ट वर्गाच्या बोलभांड पुढाऱ्यांचा स्वार्थ असतो आणि त्यांना त्यामधून अनायासेच मिरवून घेण्याची व स्वत:ला त्या विशिष्ट वर्गाचे नेते म्हणून घोषित करवून घेण्याची संधी असते. याच विशिष्ट वर्गातील सामान्यांना मात्र अशा पोषाखी कार्यक्रमांमध्ये काडीमात्र स्वारस्य नसते. परंतु हे वास्तव समाजासमोर मांडण्याचे जो कोणी धाडस करील, त्याची तत्काळ गठडी वळविली जाते. नशिबाने न्यायालयांबाबत आणि न्यायालयांच्या निवाड्यांबाबत अजून तरी कोणी तशी हिंमत दाखविलेली नाही. त्यामुळे नागपूर खंडपीठाने जनसामान्यांच्या मनातील बात उघडपणे बोलून दाखविण्याला एक वेगळे महत्त्व आहे. पण म्हणून सरकार त्यापासून काही धडा शिकेल असे निदान आज तरी म्हणता येत नाही. कारण जमानाच मुळी चमकोगिरीचा आला आहे.