शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

लोकहो, चंद्रावर पोचलो, आतातरी ‘पत्रिका’ बघणे थांबवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 08:53 IST

वैवाहिक जीवन सुखी व्हायचे, तर जोडीदारांचा परस्परांवरचा विश्वास, प्रेम हवे, तिथे चंद्र आणि मंगळ यांचे खरे म्हणजे काय काम आहे?

- श्यामसुंदर झळके, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

नुकतीच भारताने अंतराळ क्षेत्रात गरुडझेप घेऊन २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग करून जगात दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश म्हणून वाहवा मिळवली व त्या ठिकाणी तिरंगा फडकावून देशाचे नाव उज्ज्वल केले. यात इस्रोच्या वैज्ञानिकांचे अलौकिक योगदान आहे. त्यामुळे चंद्राविषयी असणाऱ्या अनेक समजुती, गैरसमजुती याला आळा बसेल, अशी आशा करूया ! या आधीच भारताचे मंगळयान मंगळावरही पोहचले आहे.

याचा उल्लेख मुद्दाम अशासाठी केला, की विवाह जमवताना मंगळ व चंद्र या ग्रहांना आपल्याकडे विशेष महत्त्व दिले जाते. मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर अशी अडचण येते, की काही विचारुच नका! असे म्हणतात, की मंगळाची मुलगी असेल तर मंगळाचाच मुलगा असावा लागतो तरच लग्न जमते. आणि अशीही समजुत आहे की लग्नाची मुलगी आणि मुलगी या दोघांनाही चंद्रबळ चांगले असेल तर सर्व काही ठीक होते. त्यांचा भावी संसार सुखाचा व्हायचा असेल, तर पत्रिकेत मंगळ नसणे आणि दोघांनाही उत्तम चंद्रबळ असणे, ही आपल्या समाजात जणू पूर्वअटच आहे!

आता आपला भारत देश मंगळावर, चंद्रावर  पोहचला तरी या मंगळाचे आणि चंद्राचे पत्रिकेतील स्थान मात्र अढळ आहे. - खरेतर या ग्रहताऱ्यांचा आपल्या जीवनात  काडीचा संबंध नाही. लाखो किलोमीटरवरील ग्रह आपल्या जीवनात काय लुडबुड करणार ? ही शुद्ध अंधश्रद्धा आहे, याबद्दल वारंवार सांगीतले गेले आहे, तरी अगदी एरवी शास्त्रावर विश्वास ठेवणारी जाणती माणसेसुध्दा लग्नाचा विषय आला की "पत्रिका बघुया जुळते का, नंतर उगीच त्रास कशाला?"- अशी सोयीस्कर भुमिका घेतात.

खरेतर आपल्या विवेकाची कसोटी अशा प्रसंगीच लागत असते, पण कोण कुणाला सांगणार? वैज्ञानिक युगात असूनही कर्मकांडात आपण कुठपर्यंत अडकणार याचा डोळसपणे विचार करायला हवा. जोपर्यंत विवेकी विचार व वैज्ञानिक जाणीव होणार नाही तोपर्यंत आपण असेच चाचपडत राहणार का, हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. विज्ञानाने सर्व गोष्टी सिद्ध करूनही आपण फलज्योतिषाला कवटाळून बसणार का याचाही जाणत्या जनांनी विचार करावा. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी दोन्ही जोडीदारांचा परस्परांवरचा विश्वास, प्रेम आणि जुळवून घेण्याची तयारी याची गरज असते, हे कुणीही सांगेल. तिथे ग्रहतारे काय करणार? - याचे भान ठेऊन आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

एकतर विविध कारणांमुळे सध्या विवाह जुळणे हेच अवघड होऊन बसलेले आहे. त्यात हजारो मुलामुलींची लग्ने या ग्रहदशेमुळे जमत नाहीत, ही शोकांतिका आहे. कळते पण वळत नाही अशी समाजाची स्थिती आहे. विज्ञानाची पदवीधर मुले-मुलीसुद्धा पालकांच्या आग्रहास्तव पत्रिका बघतात व लग्न करण्या / न करण्याचा निर्णय घेतात. तेव्हा आपसातील नातीगोती, स्वभाव, एकमेकांची पसंती, समविचारी व कुटुंबाला विश्वासात घेऊन विवाह करण्याची गरज निर्माण झाली आहे.