शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

हे विघ्नहर्त्या, कोकणची बिकट वाट तूच थोडी सुसह्य कर बाबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 07:52 IST

गौरी-गणपतीसाठी घरी जायला न मिळालेल्या कोकणी माणसाची उलघाल समजून घ्यायची तर तुमचे कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातल्या वाडीत घर हवे, हेच खरे !

दरवर्षीच गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटेत नानाविध विघ्ने येऊन त्यांची वाट बिकट का होते? गणेशोत्सवाच्या सहा महिने अगोदरच एस. टी. बस व रेल्वेगाड्यांचे आरक्षण संपूनही जादा एस. टी. व रेल्वे गाड्या का सोडल्या जात नाहीत? याचाच गैरफायदा घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांची लूटमार करत आहेत. एस. टी.च्या तिकिटापेक्षा पाच ते सातपट भाडे आकारणाऱ्या खासगी वाहतूकदारांवर आर.टी.ओ. पोलीस वा तत्सम यंत्रणांकडून कडक कारवाई का होत नाही? त्यांचे या खासगी वाहतूकदारांना अभय का आहे? आणि ही लूटमार काही यंदाचीच नाही. गेली अनेक वर्षे ती बिनबोभाट सुरू आहे. 

उदरनिर्वाहासाठी म्हणून मुंबई आणि घाटमाथ्यावर स्थिरावलेली कोकणातील कुटुंबे गणपतीच्या स्वागतासाठी आपापल्या गावी जायला निघतात. गणपती हा कोकणातला मोठा सण ! अगदी दिवाळीपेक्षाही मोठा ! या काळात घरी जायला न मिळालेल्या कोकणी माणसाची उलघाल समजून घ्यायची तर तुमचे कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातल्या वाडीत घर हवे, तिथे गणपतीची आरास करून त्याच्याबरोबरच तुमचीही वाट पाहणारे कुटुंब हवे, प्रसादाच्या निमित्ताने घरोघरी जाऊन भेटीगाठी घेता येतील, असे जीवाभावाचे गणगोत हवे! - ज्याच्याजवळ हे नाही, त्याला एवढे हाल सोसून हे कोकणातले चाकरमानी दर गणपतीला घरी जायला का निघतात, हे समजणे केवळ मुश्कील आहे !

गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करणार हे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आश्वासन मुंबई - गोवा महामार्गावरील धुळीसोबत हवेतच विरले आहे ! पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, माणगाव या भागांतील मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे’ जैसे थे’ च आहेत ! (खात्री नसेल तर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी एकदा आपल्या ताफ्यासह/काफिल्यासह या मार्गावर अवश्य प्रवास करावा!) रस्त्यांवरील खड्डे, एकच मार्गिका व महामार्गाची दुरवस्था यामुळे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पाच ते दहा तासांच्या प्रवासाला दहा ते वीस तास लागत आहेत. मोठ्या हौसेने गौरी-गणपतीसाठी निघालेल्या कोकणवासीयांचे या महामार्गावरील हाल कुत्रेही खात नाही !

बरे कोकण रेल्वेने जावे तर आरक्षण संपले आहे. कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई, ठाणे, दिवा व पनवेल या रेल्वेस्थानकांतील गर्दी पाहून ‘कोकण रेल्वे’ने कोकणवासीयांना काय दिले? असाच प्रश्न पडतो ! नाव नुसते ‘कोकण रेल्वे’ ! पण या रेल्वेमार्गावर धावणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या दक्षिण व उत्तर भारताकडे जाणाऱ्या ! सरकार कोणतेही असो-राज्य सरकार वा केंद्र सरकार किंवा कोणत्याही पक्षाचे असो ! ते फक्त कोकणवासीयांना विकासाचे गाजर दाखविते. पण प्रत्यक्षात कोकणवासीयांच्या पदरी पडते ती घोर निराशाच व अपेक्षाभंग ! निवडणूक प्रचारांत, कोकण महोत्सवात कोकणच्या निसर्गसौंदर्याचे, कोकणच्या संस्कृतीचे, कोकणी माणसाच्या स्वभावाचे गोडवे गायले जातात. पण या सर्व भूलथापाच आहेत हे आता सिद्ध झाले आहे. 

कोकणात जाणारी वाट बिकट होत असताना, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात नानाविध विघ्ने येत असताना त्याची सोडवणूक करण्यासाठी स्वतःला कोकणचे कैवारी व कोकणचे भाग्यविधाते म्हणवून घेणारे सर्वच पक्षांचे राजकीय पुढारी पुढे का येत नाहीत? की ते कोकणी माणसाच्या सहनशीलता आणि संयम संपण्याची वाट पाहत आहेत?  हे विघ्नहर्त्या गणेशा, कोकणचा शाश्वत विकास करण्याची सुबुद्धी निदान कोकणातील पुढाऱ्यांना तरी मिळू दे !

- टिळक उमाजी खाडे, नागोठणे, जि. रायगड

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव