शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हे विघ्नहर्त्या, कोकणची बिकट वाट तूच थोडी सुसह्य कर बाबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 07:52 IST

गौरी-गणपतीसाठी घरी जायला न मिळालेल्या कोकणी माणसाची उलघाल समजून घ्यायची तर तुमचे कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातल्या वाडीत घर हवे, हेच खरे !

दरवर्षीच गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटेत नानाविध विघ्ने येऊन त्यांची वाट बिकट का होते? गणेशोत्सवाच्या सहा महिने अगोदरच एस. टी. बस व रेल्वेगाड्यांचे आरक्षण संपूनही जादा एस. टी. व रेल्वे गाड्या का सोडल्या जात नाहीत? याचाच गैरफायदा घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांची लूटमार करत आहेत. एस. टी.च्या तिकिटापेक्षा पाच ते सातपट भाडे आकारणाऱ्या खासगी वाहतूकदारांवर आर.टी.ओ. पोलीस वा तत्सम यंत्रणांकडून कडक कारवाई का होत नाही? त्यांचे या खासगी वाहतूकदारांना अभय का आहे? आणि ही लूटमार काही यंदाचीच नाही. गेली अनेक वर्षे ती बिनबोभाट सुरू आहे. 

उदरनिर्वाहासाठी म्हणून मुंबई आणि घाटमाथ्यावर स्थिरावलेली कोकणातील कुटुंबे गणपतीच्या स्वागतासाठी आपापल्या गावी जायला निघतात. गणपती हा कोकणातला मोठा सण ! अगदी दिवाळीपेक्षाही मोठा ! या काळात घरी जायला न मिळालेल्या कोकणी माणसाची उलघाल समजून घ्यायची तर तुमचे कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातल्या वाडीत घर हवे, तिथे गणपतीची आरास करून त्याच्याबरोबरच तुमचीही वाट पाहणारे कुटुंब हवे, प्रसादाच्या निमित्ताने घरोघरी जाऊन भेटीगाठी घेता येतील, असे जीवाभावाचे गणगोत हवे! - ज्याच्याजवळ हे नाही, त्याला एवढे हाल सोसून हे कोकणातले चाकरमानी दर गणपतीला घरी जायला का निघतात, हे समजणे केवळ मुश्कील आहे !

गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करणार हे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आश्वासन मुंबई - गोवा महामार्गावरील धुळीसोबत हवेतच विरले आहे ! पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, माणगाव या भागांतील मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे’ जैसे थे’ च आहेत ! (खात्री नसेल तर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी एकदा आपल्या ताफ्यासह/काफिल्यासह या मार्गावर अवश्य प्रवास करावा!) रस्त्यांवरील खड्डे, एकच मार्गिका व महामार्गाची दुरवस्था यामुळे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पाच ते दहा तासांच्या प्रवासाला दहा ते वीस तास लागत आहेत. मोठ्या हौसेने गौरी-गणपतीसाठी निघालेल्या कोकणवासीयांचे या महामार्गावरील हाल कुत्रेही खात नाही !

बरे कोकण रेल्वेने जावे तर आरक्षण संपले आहे. कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई, ठाणे, दिवा व पनवेल या रेल्वेस्थानकांतील गर्दी पाहून ‘कोकण रेल्वे’ने कोकणवासीयांना काय दिले? असाच प्रश्न पडतो ! नाव नुसते ‘कोकण रेल्वे’ ! पण या रेल्वेमार्गावर धावणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या दक्षिण व उत्तर भारताकडे जाणाऱ्या ! सरकार कोणतेही असो-राज्य सरकार वा केंद्र सरकार किंवा कोणत्याही पक्षाचे असो ! ते फक्त कोकणवासीयांना विकासाचे गाजर दाखविते. पण प्रत्यक्षात कोकणवासीयांच्या पदरी पडते ती घोर निराशाच व अपेक्षाभंग ! निवडणूक प्रचारांत, कोकण महोत्सवात कोकणच्या निसर्गसौंदर्याचे, कोकणच्या संस्कृतीचे, कोकणी माणसाच्या स्वभावाचे गोडवे गायले जातात. पण या सर्व भूलथापाच आहेत हे आता सिद्ध झाले आहे. 

कोकणात जाणारी वाट बिकट होत असताना, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात नानाविध विघ्ने येत असताना त्याची सोडवणूक करण्यासाठी स्वतःला कोकणचे कैवारी व कोकणचे भाग्यविधाते म्हणवून घेणारे सर्वच पक्षांचे राजकीय पुढारी पुढे का येत नाहीत? की ते कोकणी माणसाच्या सहनशीलता आणि संयम संपण्याची वाट पाहत आहेत?  हे विघ्नहर्त्या गणेशा, कोकणचा शाश्वत विकास करण्याची सुबुद्धी निदान कोकणातील पुढाऱ्यांना तरी मिळू दे !

- टिळक उमाजी खाडे, नागोठणे, जि. रायगड

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव