शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पायल तडवी आत्महत्येच्या निमित्ताने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:54 IST

नायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे.

- डॉ. अमोल अन्नदातेनायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे. ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. यात पायलला जातिवाचक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले का, यावर अजून चौकशी सुरू आहे. सगळ्या शक्यता गृहीत धरल्या, तरी ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे, तर समाजातील बौद्धिक धुरिणांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.जर पायलच्या मृत्यूत जातीचा संदर्भ असेल, तर या गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे, पण त्याच वेळी दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू असताना आपण सगळ्यांनी याची चर्चा बौद्धिक वर्णभेद भडकणार नाही, अशा दृष्टीने व ‘डोळ्यासाठी डोळाच’ अशा प्रकारे दोन वर्ग एकमेकांसमोर उभे ठाकणार नाहीत, याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत असताना, गेली काही महिने वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच जातीच्या मुद्द्यावरून उभी फूट पडलेली दिसून आली. वैद्यकीय क्षेत्रासारख्या थेट जगण्या- मरण्याशी संबंधित क्षेत्रात अशा प्रकारे बौद्धिक वर्णभेद भडकणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक व अराजकाला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशात आयत्या वेळी होणारे बदल, खुल्या वर्गासाठी राहिलेल्या एक दोनच जागा, आरक्षित वर्गाचा आपल्या हक्कासाठी लढा यातून कधी नव्हे, ते समाज माध्यमांवर वैद्यकीय क्षेत्रात दोन वर्ग एकमेकांना भिडताना दिसत होते.आरक्षण हवे नको, हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला, तरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देत, आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात सहिष्णुता टिकून राहावी, यासाठी प्रत्येकाने आपला विवेक जागा ठेवायला हवा. त्यातच पायल तडवीसारख्या तरुण डॉक्टरचा जीव जातो, तेव्हा आपण सगळे एकाच वैद्यक मातेची मुले आहोत व जात, धर्मापलीकडे डॉक्टर आहोत व रुग्ण आपला पहिला धर्म आहे हे विसरता कामा नये, तसेच कुठलाही बदल आणताना तो अचानक आणला, तर समाज कशा प्रकारे ढवळून निघतो व त्यातून असा बौद्धिक वर्णभेद भडकू शकतो हा धडाही शासनाने घ्यायला हवा.या पलीकडे जाऊन या घटनेमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानसिक व शारीरिक तणावाचा पदव्युत्तर शिक्षणाचा काळ, कमी निवासी डॉक्टरांची संख्या, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण, अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेदभाव, डॉक्टरांचे आपापसातील संबंध हे सगळे कंगोरेही तपासून, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पायलच्या आत्महत्येत जातीचा संदर्भ तिच्या नैराश्यात भर घालणारा सगळ्यात मोठा घटक असला, तरी तिच्यावरील ताणही नाकारला जाऊ शकत नाही, तसेच काहीही कारण असले, तरी सोबत काम करणाऱ्या कनिष्ठ, वरिष्ठांमध्ये तिला निराधारपणाच्या तीव्र भावनाने पछाडले, हा सगळ्या कारणांपलीकडे आपला दोष आहे व व्यवस्थेचेही मोठे अपयश आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आम्हा प्रत्येकाने तीव्र मानसिक, शारीरिक ताणाचा सामना केल्याची प्रत्येक डॉक्टरची कहाणी आहे. दरवर्षी केईएम, सायन, नायर येथील तीन-चार निवासी डॉक्टरांना टी.बी.चा संसर्ग होतोच. सायन अर्थोपेडीक विभागात दरवर्षी एखादा तरी निवासी डॉक्टर ताणापायी पदव्युत्तर शिक्षणच सोडून जातो. मार्डच्या संपातून हा संघर्ष अधूनमधून तात्पुरता उफाळून येत असतो. प्रत्येक विभागात राग, द्वेष, मत्सर, सीनियर-ज्युनिअर संघर्ष, भीती अशा नकारात्मक भावनांचा पूर वाहात असतो. यात रुग्णांना चांगली सेवा मिळावी, ही भावना असली, तरी त्यातून कामाचे व्यवस्थापन व काम करणाºया डॉक्टरांची मानसिकता बिघडत जाते. जातिवाचक शेरे म्हणा किंवा कनिष्ठांना अमानुष त्रास म्हणा, हे सगळे या ताणातून आलेल्या विकृत मानसिकतेतून जन्म घेते व पायलसारख्या निरागस डॉक्टरच्या आत्महत्येतून कधीतरी समाजापुढे येते. वैद्यकीय शिक्षणातून आपल्याला फक्त भल्यामोठ्या डिग्रीची रांग नावामागे असलेले हुशार डॉक्टरच नव्हे, तर चांगला संवेदनशील माणूस, तसेच समाजाला दिशा देऊ शकणारे विवेकी बौद्धिक नेतृत्वही तयार करायचे आहे, हे विसरून कसे चालेल. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामाच्या तासांचे, मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापनही करावे लागणार आहे.
आज वैद्यकीय क्षेत्र मोठ्या नैतिक पेचातून जाते आहे. त्यातच पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्राचा आरक्षण लढा, तीव्र अंतर्गत स्पर्धा, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण अशा अनेक कारणांनी आज सर्वसामान्य डॉक्टर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत पायल तडवीसारखी घटना या क्षेत्राला व पर्यायाने सर्वच बौद्धिक व्यवसायिक क्षेत्रांना मोठा हादरा देणारी ठरते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत अस्वस्थता वाढीला लागतेच, नव्हे तर समाजाचा या क्षेत्राविषयीचा दृष्टिकोनही पणाला लागतो. या सर्व गोष्टींची वैद्यकीय क्षेत्राने व शासनानेही विचारपूर्वक हाताळणी करण्याचा हा क्षण आहे, तसेच यावर केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या नव्हे, तर याच्या मूलभूत कारणांचे समाधान करणे गरजेचे आहे. राज्यातील आरोग्याची दयनीय स्थिती पाहता, मानसिकदृष्ट्या सशक्त डॉक्टर तयार करण्याला प्राधान्य द्यावेच लागेल. पायलच्या आत्महत्येने प्रत्येक घटकाने यावर आत्मचिंतन करावे.(आरोग्यतज्ज्ञ)

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवी