शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पायल तडवी आत्महत्येच्या निमित्ताने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:54 IST

नायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे.

- डॉ. अमोल अन्नदातेनायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे. ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. यात पायलला जातिवाचक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले का, यावर अजून चौकशी सुरू आहे. सगळ्या शक्यता गृहीत धरल्या, तरी ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे, तर समाजातील बौद्धिक धुरिणांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.जर पायलच्या मृत्यूत जातीचा संदर्भ असेल, तर या गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे, पण त्याच वेळी दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू असताना आपण सगळ्यांनी याची चर्चा बौद्धिक वर्णभेद भडकणार नाही, अशा दृष्टीने व ‘डोळ्यासाठी डोळाच’ अशा प्रकारे दोन वर्ग एकमेकांसमोर उभे ठाकणार नाहीत, याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत असताना, गेली काही महिने वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच जातीच्या मुद्द्यावरून उभी फूट पडलेली दिसून आली. वैद्यकीय क्षेत्रासारख्या थेट जगण्या- मरण्याशी संबंधित क्षेत्रात अशा प्रकारे बौद्धिक वर्णभेद भडकणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक व अराजकाला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशात आयत्या वेळी होणारे बदल, खुल्या वर्गासाठी राहिलेल्या एक दोनच जागा, आरक्षित वर्गाचा आपल्या हक्कासाठी लढा यातून कधी नव्हे, ते समाज माध्यमांवर वैद्यकीय क्षेत्रात दोन वर्ग एकमेकांना भिडताना दिसत होते.आरक्षण हवे नको, हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला, तरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देत, आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात सहिष्णुता टिकून राहावी, यासाठी प्रत्येकाने आपला विवेक जागा ठेवायला हवा. त्यातच पायल तडवीसारख्या तरुण डॉक्टरचा जीव जातो, तेव्हा आपण सगळे एकाच वैद्यक मातेची मुले आहोत व जात, धर्मापलीकडे डॉक्टर आहोत व रुग्ण आपला पहिला धर्म आहे हे विसरता कामा नये, तसेच कुठलाही बदल आणताना तो अचानक आणला, तर समाज कशा प्रकारे ढवळून निघतो व त्यातून असा बौद्धिक वर्णभेद भडकू शकतो हा धडाही शासनाने घ्यायला हवा.या पलीकडे जाऊन या घटनेमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानसिक व शारीरिक तणावाचा पदव्युत्तर शिक्षणाचा काळ, कमी निवासी डॉक्टरांची संख्या, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण, अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेदभाव, डॉक्टरांचे आपापसातील संबंध हे सगळे कंगोरेही तपासून, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पायलच्या आत्महत्येत जातीचा संदर्भ तिच्या नैराश्यात भर घालणारा सगळ्यात मोठा घटक असला, तरी तिच्यावरील ताणही नाकारला जाऊ शकत नाही, तसेच काहीही कारण असले, तरी सोबत काम करणाऱ्या कनिष्ठ, वरिष्ठांमध्ये तिला निराधारपणाच्या तीव्र भावनाने पछाडले, हा सगळ्या कारणांपलीकडे आपला दोष आहे व व्यवस्थेचेही मोठे अपयश आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आम्हा प्रत्येकाने तीव्र मानसिक, शारीरिक ताणाचा सामना केल्याची प्रत्येक डॉक्टरची कहाणी आहे. दरवर्षी केईएम, सायन, नायर येथील तीन-चार निवासी डॉक्टरांना टी.बी.चा संसर्ग होतोच. सायन अर्थोपेडीक विभागात दरवर्षी एखादा तरी निवासी डॉक्टर ताणापायी पदव्युत्तर शिक्षणच सोडून जातो. मार्डच्या संपातून हा संघर्ष अधूनमधून तात्पुरता उफाळून येत असतो. प्रत्येक विभागात राग, द्वेष, मत्सर, सीनियर-ज्युनिअर संघर्ष, भीती अशा नकारात्मक भावनांचा पूर वाहात असतो. यात रुग्णांना चांगली सेवा मिळावी, ही भावना असली, तरी त्यातून कामाचे व्यवस्थापन व काम करणाºया डॉक्टरांची मानसिकता बिघडत जाते. जातिवाचक शेरे म्हणा किंवा कनिष्ठांना अमानुष त्रास म्हणा, हे सगळे या ताणातून आलेल्या विकृत मानसिकतेतून जन्म घेते व पायलसारख्या निरागस डॉक्टरच्या आत्महत्येतून कधीतरी समाजापुढे येते. वैद्यकीय शिक्षणातून आपल्याला फक्त भल्यामोठ्या डिग्रीची रांग नावामागे असलेले हुशार डॉक्टरच नव्हे, तर चांगला संवेदनशील माणूस, तसेच समाजाला दिशा देऊ शकणारे विवेकी बौद्धिक नेतृत्वही तयार करायचे आहे, हे विसरून कसे चालेल. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामाच्या तासांचे, मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापनही करावे लागणार आहे.
आज वैद्यकीय क्षेत्र मोठ्या नैतिक पेचातून जाते आहे. त्यातच पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्राचा आरक्षण लढा, तीव्र अंतर्गत स्पर्धा, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण अशा अनेक कारणांनी आज सर्वसामान्य डॉक्टर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत पायल तडवीसारखी घटना या क्षेत्राला व पर्यायाने सर्वच बौद्धिक व्यवसायिक क्षेत्रांना मोठा हादरा देणारी ठरते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत अस्वस्थता वाढीला लागतेच, नव्हे तर समाजाचा या क्षेत्राविषयीचा दृष्टिकोनही पणाला लागतो. या सर्व गोष्टींची वैद्यकीय क्षेत्राने व शासनानेही विचारपूर्वक हाताळणी करण्याचा हा क्षण आहे, तसेच यावर केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या नव्हे, तर याच्या मूलभूत कारणांचे समाधान करणे गरजेचे आहे. राज्यातील आरोग्याची दयनीय स्थिती पाहता, मानसिकदृष्ट्या सशक्त डॉक्टर तयार करण्याला प्राधान्य द्यावेच लागेल. पायलच्या आत्महत्येने प्रत्येक घटकाने यावर आत्मचिंतन करावे.(आरोग्यतज्ज्ञ)

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवी