शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पवारांचे प्रशस्तीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 00:34 IST

शरद पवार हे सहजासहजी कोणाची प्रशंसा करणारे नेते नाहीत. हातचे राखून व बरेचसे मनात ठेवून बोलणाºयांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा खुल्या मनाने केलेली पाहणे काहीसे

शरद पवार हे सहजासहजी कोणाची प्रशंसा करणारे नेते नाहीत. हातचे राखून व बरेचसे मनात ठेवून बोलणाºयांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा खुल्या मनाने केलेली पाहणे काहीसे अचंब्याचे तर काहीसे त्यांच्या उमदेपणाचे मानले पाहिजे. गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. पवारांचा पक्ष त्यात आपले उमेदवार उभे करीत आहे. तरीही त्यांनी राहुल गांधींच्या तेथील सभांना होत असलेल्या अलोट गर्दीविषयी, त्यातील त्यांच्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागलेल्या भाषणांविषयी आणि श्रोतृवर्गात उमटत असलेल्या त्याच्या प्रतिक्रियांविषयी ते कमालीच्या आस्थेने व कौतुकाने बोलले आहेत. पवारांचा पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीत आहे आणि ते सेक्युलर वृत्तीचे नेते आहेत, एवढेच त्या प्रशंसेचे कारण नाही. याआधी ते राहुल गांधींविषयी फारशा आस्थेने बोलताना कधी दिसलेही नाहीत. मात्र गेल्या सबंध वर्षात मोदींच्या सरकारने जनतेवर लादलेली नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी आणि नुसतीच उद्दाम व बेफाट भाषणे या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची सामान्य जनतेपर्यंत पोहचणारी उपरोधिक शैली फार परिणामकारक ठरू लागली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पवारांचे हे प्रशस्तीपत्र एका पार्श्वभूमीवर आणखीही महत्त्वाचे आहे. २०१४ च्या निवडणुकीतील मोदींच्या जोरकस भाषणांपुढे राहुल गांधी, त्यांचे वय व अनुभवाचे तोकडेपण यामुळे फारच उथळ वाटत. त्यांच्यावर तोंडसुख घेणारी भाजपची माणसे त्यांना ‘पप्पू’ म्हणून हिणवीत. आता ती भाषा मागे पडली आहे. भाजपचे प्रवक्ते आणि जेटली व अगदी मोदीसुद्धा त्यांना गंभीरपणे घेऊ लागले आहेत. काँग्रेसलाही त्यांचे नेतृत्व आता आशादायी व फलदायी वाटू लागले आहे. त्यातून मोदींना लोक ‘फेकू’ म्हणू लागल्यापासून तर राहुल गांधींचे व्यक्तिमत्त्व जास्तीचे दमदार ठरताना दिसले आहे. आर्थिक क्षेत्रात अपयश, विकासाची भाषा जोरकस पण वेग मंदावलेला, तरुणाईत निराशा, प्रत्येक राज्यात कुठे शेतकºयांचे, कुठे विद्यार्थ्यांचे, कुठे पाटीदारांचे तर कुठे गुज्जरांचे आंदोलन आणि त्यावर आश्वासनांचा नुसताच पाऊस. सामान्य माणसाला काय डाचते याची फारशी कदर कोणी करीत नाही, उलट त्याला देशभक्तीचा उपदेश ऐकविला जातो. या साºयांना राष्ट्रीय पातळीवर उत्तर देऊ शकेल असा राहुल गांधींखेरीज दुसरा नेताही विरोधकांकडे नाही. नितीशकुमार भाजपजवळ गेले आणि ममता बॅनर्जी बंगालबाहेर पडत नाहीत. प्रत्यक्ष पवारही एवढा काळ महाराष्ट्राचेच नेते राहिले. लालू, मुलायम, चंद्राबाबू, स्टॅलिन या साºयांनाच त्यांच्या प्रादेशिक मर्यादा आहेत. ही स्थिती राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींचे नेतृत्व उभे करणारी व त्यांना तरुणांचे प्रवक्ते बनविणारी ठरली तर त्याचे नवल करण्याचे कारण नाही. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणाने गुजरातमध्ये काँग्रेसला बहुमत देऊ केले. त्याच सर्वेक्षणाने हिमाचल प्रदेशातही भाजपचा पराभव होत असल्याचे दाखविले. ते सर्वेक्षण कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. मात्र गुजरातमध्ये भाजपला सारेच काही अनुकूल राहिले आहे असे नाही. तेथील व्यापाºयांनी सरकारविरुद्ध केलेले विराट आंदोलन अजून शमले नाही. अर्थात मोदी केंद्रात व राज्यातही सत्तेत आहेत आणि सत्तेला कोणतीही किमया अखेरच्या क्षणीही घडविता येणे अशक्य नसते. त्यामुळे त्यांच्या विजयाविषयीची आशाही अनेकजण बाळगून आहेत. एक गोष्ट मात्र येथे नव्याने पुढे आलेली. ती म्हणजे, राहुल गांधी यांचे राष्ट्रीय स्तरावर उभे होत असलेले नेतृत्व. त्याची भरधाव वाटचाल व भरारी आता कुठवर जाते ते यापुढे पहायचे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार