शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पवारांचे प्रशस्तीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 00:34 IST

शरद पवार हे सहजासहजी कोणाची प्रशंसा करणारे नेते नाहीत. हातचे राखून व बरेचसे मनात ठेवून बोलणाºयांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा खुल्या मनाने केलेली पाहणे काहीसे

शरद पवार हे सहजासहजी कोणाची प्रशंसा करणारे नेते नाहीत. हातचे राखून व बरेचसे मनात ठेवून बोलणाºयांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा खुल्या मनाने केलेली पाहणे काहीसे अचंब्याचे तर काहीसे त्यांच्या उमदेपणाचे मानले पाहिजे. गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. पवारांचा पक्ष त्यात आपले उमेदवार उभे करीत आहे. तरीही त्यांनी राहुल गांधींच्या तेथील सभांना होत असलेल्या अलोट गर्दीविषयी, त्यातील त्यांच्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागलेल्या भाषणांविषयी आणि श्रोतृवर्गात उमटत असलेल्या त्याच्या प्रतिक्रियांविषयी ते कमालीच्या आस्थेने व कौतुकाने बोलले आहेत. पवारांचा पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीत आहे आणि ते सेक्युलर वृत्तीचे नेते आहेत, एवढेच त्या प्रशंसेचे कारण नाही. याआधी ते राहुल गांधींविषयी फारशा आस्थेने बोलताना कधी दिसलेही नाहीत. मात्र गेल्या सबंध वर्षात मोदींच्या सरकारने जनतेवर लादलेली नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी आणि नुसतीच उद्दाम व बेफाट भाषणे या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची सामान्य जनतेपर्यंत पोहचणारी उपरोधिक शैली फार परिणामकारक ठरू लागली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पवारांचे हे प्रशस्तीपत्र एका पार्श्वभूमीवर आणखीही महत्त्वाचे आहे. २०१४ च्या निवडणुकीतील मोदींच्या जोरकस भाषणांपुढे राहुल गांधी, त्यांचे वय व अनुभवाचे तोकडेपण यामुळे फारच उथळ वाटत. त्यांच्यावर तोंडसुख घेणारी भाजपची माणसे त्यांना ‘पप्पू’ म्हणून हिणवीत. आता ती भाषा मागे पडली आहे. भाजपचे प्रवक्ते आणि जेटली व अगदी मोदीसुद्धा त्यांना गंभीरपणे घेऊ लागले आहेत. काँग्रेसलाही त्यांचे नेतृत्व आता आशादायी व फलदायी वाटू लागले आहे. त्यातून मोदींना लोक ‘फेकू’ म्हणू लागल्यापासून तर राहुल गांधींचे व्यक्तिमत्त्व जास्तीचे दमदार ठरताना दिसले आहे. आर्थिक क्षेत्रात अपयश, विकासाची भाषा जोरकस पण वेग मंदावलेला, तरुणाईत निराशा, प्रत्येक राज्यात कुठे शेतकºयांचे, कुठे विद्यार्थ्यांचे, कुठे पाटीदारांचे तर कुठे गुज्जरांचे आंदोलन आणि त्यावर आश्वासनांचा नुसताच पाऊस. सामान्य माणसाला काय डाचते याची फारशी कदर कोणी करीत नाही, उलट त्याला देशभक्तीचा उपदेश ऐकविला जातो. या साºयांना राष्ट्रीय पातळीवर उत्तर देऊ शकेल असा राहुल गांधींखेरीज दुसरा नेताही विरोधकांकडे नाही. नितीशकुमार भाजपजवळ गेले आणि ममता बॅनर्जी बंगालबाहेर पडत नाहीत. प्रत्यक्ष पवारही एवढा काळ महाराष्ट्राचेच नेते राहिले. लालू, मुलायम, चंद्राबाबू, स्टॅलिन या साºयांनाच त्यांच्या प्रादेशिक मर्यादा आहेत. ही स्थिती राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींचे नेतृत्व उभे करणारी व त्यांना तरुणांचे प्रवक्ते बनविणारी ठरली तर त्याचे नवल करण्याचे कारण नाही. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणाने गुजरातमध्ये काँग्रेसला बहुमत देऊ केले. त्याच सर्वेक्षणाने हिमाचल प्रदेशातही भाजपचा पराभव होत असल्याचे दाखविले. ते सर्वेक्षण कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. मात्र गुजरातमध्ये भाजपला सारेच काही अनुकूल राहिले आहे असे नाही. तेथील व्यापाºयांनी सरकारविरुद्ध केलेले विराट आंदोलन अजून शमले नाही. अर्थात मोदी केंद्रात व राज्यातही सत्तेत आहेत आणि सत्तेला कोणतीही किमया अखेरच्या क्षणीही घडविता येणे अशक्य नसते. त्यामुळे त्यांच्या विजयाविषयीची आशाही अनेकजण बाळगून आहेत. एक गोष्ट मात्र येथे नव्याने पुढे आलेली. ती म्हणजे, राहुल गांधी यांचे राष्ट्रीय स्तरावर उभे होत असलेले नेतृत्व. त्याची भरधाव वाटचाल व भरारी आता कुठवर जाते ते यापुढे पहायचे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार