शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जैन धर्माने वाढवावा विश्वशांतीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 05:11 IST

विजयकुमार चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंसाचार आणि दहशतवाद जितक्या जवळून अनुभवला आणि त्याची किंमत मोजली, तेवढी या देशात खूप कमी कुटुंबांनी मोजली असेल.

काही दिवसांपूर्वी पंजाब केसरी वृत्तपत्र समूहाचे सर्वेसर्वा विजयकुमार चोप्रा पुण्यात एका कार्यक्र मासाठी आले होते. तेव्हा म्हणाले की, जैन धर्माचे आचार्य शिवमुनी पंजाबच्याच फरीदकोटचे आहेत. ते पंजाबी तर आहेतच. मात्र, केवळ जैन धर्मीयच नाहीत, तर जगभरच्या शांतता, अहिंसा या तत्त्वांवर विश्वास असणाऱ्या सर्व धर्मियांमध्ये त्यांचा मोठा सन्मान आहे. त्यांना भेटले पाहिजे. फाळणीची सर्वात जास्त झळ पंजाब आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना बसली. मात्र, कोठेही गेलो, तेथे धर्म वेगळा जरी असला, तरी भाषा एकत्र आणण्याचे माध्यम आहे, याची जाणीव झाली. आम्ही पंजाबी असलेल्या आचार्य सम्राट शिवमुनी यांची पुण्यात चातुर्मासस्थळी प्रत्यक्ष भेट घेतली.

विजयकुमार चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंसाचार आणि दहशतवाद जितक्या जवळून अनुभवला आणि त्याची किंमत मोजली, तेवढी या देशात खूप कमी कुटुंबांनी मोजली असेल. वडील लाला जगतनारायण, भाऊ रमेशचंद्र यांच्यासह या समूहाचे साठपेक्षा अधिक लोक दहशतवाद्यांकडून मारले गेले. ज्यांनी रक्ताचे पाट वाहताना पाहिले, बॉम्बस्फोटापासून गोळीबाराच्या आवाजात आणि बातम्यांमध्ये ज्यांचा दिनक्रम आजही सुरू होतो, ज्यांनी आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना हिंसाचाराचे बळी ठरताना पाहिले, त्यांच्या मनात हे युद्ध आणि संघर्ष पाकिस्तानला धडा शिकवेपर्यंत नेहमी चालला पाहिजे, अशी भावना असेल, असे मला वाटायचे आणि अशी भावना असणे ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. मात्र, एकीकडे दहशतवादाविरोधात भूमिका घेताना शहीद रमेशचंद्र यांनी स्थापन केलेल्या शहीद परिवार फंडद्वारा विजयकुमार चोप्रा यांनी हजारो परिवारांचे, विधवांचे आणि अनाथांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न केले.

विजयकुमार चोप्रा आणि आचार्य शिवमुनी यांची बराच वेळ चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा हे आचार्य शिवमुनी यांचे आशीर्वाद घ्यायला आले होते. त्याचा धागा पकडून विजयजी म्हणाले की, त्यांना आणि पंतप्रधानांना आता फक्त तुमच्यासारखे संतच काही सांगू शकतील. द्वेष आणि शत्रुत्व कायमस्वरूपी असू नये. सध्या एकूणच जगामध्ये महत्त्वाचे देश दहशतवादाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत, ती घेतलीच पाहिजे. मात्र, हळूहळू ती भूमिका दहशतवादाच्या विरोधात न राहता, विविध धर्म आणि जातींच्या विरोधात होऊ लागली आहे, हे मात्र काळजी वाटावी असेच आहे. ३४0 वे कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती किंवा या प्रश्नावरून पाकिस्तानात निर्माण झालेली परिस्थिती, एनआरसीच्या मुद्द्यावरून आसामात निर्माण झालेली परिस्थिती आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न अशा विषयांकडे पाहताना एक वेगळीच अस्वस्थता देशात आहे. नक्की आपण कोणत्यादिशेने चाललो आहोत? याच्यातून आपण जगातल्या शस्त्रांत्रांच्या व्यापाऱ्यांच्या हातात तर जाणार नाही ना?

आम्ही जगाला बुद्ध दिला आहे आणि आम्हाला युद्ध नको, असे पंतप्रधान जाहीरपणे म्हणतात. मात्र, त्याच वेळी हा नवा भारत आहे. घुसून मारेल, अशीही घोषणा करतात. देश चालविताना सामर्थ्यवान राहावेच लागते. मात्र, युद्ध अथवा प्रतिशोध हे सरकारचे धोरण होऊ नये, यासाठी जैन धर्मीयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण शांतता आणि विकासाची भूमिका मांडणाºया जैन तत्त्वज्ञानाला सर्व धर्मीयांमध्ये मान्यता आहे, असे जेव्हा विजयकुमार चोप्रा म्हणाले, तेव्हा आचार्य शिवमुनी महाराज उत्तरले, खरेच ही आज जगाची गरज आहे. मात्र, यासाठी माध्यमांनीही पुढाकार घ्यायला हवा. यावर वृत्तपत्रसृष्टीचे भीष्माचार्य समजले जाणारे विजयकुमार चोप्रा यांनी सद्यस्थितीत माध्यमांना अशा भूमिका घेणे अवघड असल्यानेच, जैन धर्मीयांनी विशेषत: जैनांमधील सर्व गटतटांनी व संतांनी ठामपणे आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत, असे सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘जैन धर्म हा देशाच्या आणि जगाच्या राजकारणावर, तसेच अर्थकारणावर प्रभाव टाकणारा आहे. त्याच वेळी वैदिक धर्माच्या अथवा इतर कुठल्याही धर्माच्या विरोधात न जाता आपल्या धर्मातील विश्वशांतीच्या मूळ तत्त्वाची जपणूक करीत जैन धर्मीयांनी आपली वाटचाल केली आहे.’ आज अर्थव्यवस्था संकटाकडे वाटचाल करीत आहे. उद्योगधंदे मोडकळीस येत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. अशा काळात समन्वयाची भूमिका मांडणाºया शक्ती शिल्लक राहिलेल्या नाहीत. समाजासाठी समर्पितपणे काम करण्याची भावना जैनांच्या रक्तातच आहे. मी माझ्या पंजाबमधील अनुभवानंतर सांगतो की, या देशातील सौहार्द, शांतता आणि बंधुभाव टिकला असेल, तर त्यात जैन धर्मीयांचे सर्वात मोठे योगदान आहे.

विजयकुमार चोप्रा यांची जैन धर्माचे श्वेतांबर स्थानकवासी आचार्य शिवमुनी यांच्याशी झालेली चर्चा आणि बैठक म्हणजे केवळ विश्वशांतीचा इव्हेंट नव्हता. आज भारतात जागतिक शांततेसाठी दरमहा दोनशेहून अधिक इव्हेंट होतात, पण अशा इव्हेंटमधून शांतता निर्माण होत नसते. आता शांततेच्या विचारांची पुन्हा एक वैश्विक चळवळ होणे आवश्यक आहे आणि ती क्षमता जैन धर्मीयांमध्ये निश्चित आहे. म्हणूनच जागतिक शांततेसाठी जैन धर्मीयांनी सर्व धर्मीयांना सोबत घेऊन घेतलेला पुढाकार हा बुद्ध आणि महावीरांच्या देशाने जगाला पुन्हा एकदा दिलेली देणगीच ठरणार आहे. ही देणगी दुर्बलतेचे नाही, तर सामर्थ्याचे प्रतीक असेल.

- संजय नहारसंस्थापक अध्यक्ष, सरहद