शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पटेल-पटोले : जुन्या संघर्षाची नवी नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:36 IST

या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असला तरी ही निवडणूक सर्वस्वी नाना पटोले यांच्या प्रतिष्ठेची होती.

- गजानन जानभोर

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव भारतीय जनता पक्षाला चिंतेत आणि आत्मचिंतनात टाकणारा आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असला तरी ही निवडणूक सर्वस्वी नाना पटोले यांच्या प्रतिष्ठेची होती. केवळ पंतप्रधानांनी आपले म्हणणे ऐकून न घेतल्याच्या रागात पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ही निवडणूक लोकांवर लादली. तटस्थपणे विचार केला तर आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात पटोलेंनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी किती कामे केली, किती निधी आणला हा संशोधनाचा विषय आहे. प्रचंड ऊर्जा आणि उत्तम संघटनकौशल्य असलेला हा लोकनेता वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने इतका ग्रासलेला आहे की स्वत:च्या अहमगंडालाच तो लोकल्याण मानू लागला आहे. पटोले आणि नारायण राणे सारखेच आहेत. ते कुठेच स्थिरावत नाहीत. आपल्या मनासारखे झाले नाही तर चवताळून उठतात आणि कुठला तरी आत्मघातकी निर्णय घेऊन आपल्यामागे कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही फरफटत नेतात.प्रफुल पटेल आणि नाना पटोले या दोघांच्या परिश्रमामुळेच राकाँचे उमेदवार मधुकर कुकडे निवडून आले खरे. परंतु श्रेयाच्या लढाईत पटोलेच सध्या आघाडीवर आहेत. ‘हा विजय संपूर्ण आघाडीचाच’ अशी सावरासावर पटोलेंनी आता सुरू केली असली तरी पटेल-पटोले यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाहीत. पुढच्या काळात ते अधिक तीव्र होणार आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश घेताना पटोलेंना राहुल गांधींनी काही आश्वासने दिली आहेत, असे म्हणतात. पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर ती पूर्ण झाली नाहीत तर पटोले पुन्हा नवा घरठाव करतील. निवडणुकीतील विजय हा त्या नेत्याला अधिक आत्मविश्वास देणारा पण तेवढाच विनयशील बनविणारा असतो. पटोलेंच्या बाबतीत नेमके उलट घडत आहे. ते दिवसेंदिवस आक्रस्ताळे होत आहेत. पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या काळात त्यांनी फडणवीस-गडकरींवर केलेली वैयक्तिक टीका अत्यंत हीन दर्जाची होती. अशी घाणेरडी टीका करणाऱ्या नेत्याच्या भोवतालचे चाटूगार कार्यकर्ते जेव्हा टाळ््या वाजवून ‘खूप छान भाऊ’, असा लाळघोटेपणा करतात तेव्हा तो नेता अधिक चेकाळत जातो. पुढच्या काळात या लोकनेत्याचे असेच अध:पतन होणार आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून खूप काही बोध घेण्याची गरज आहे. ‘जातीच्या समीकरणात आम्ही कमी पडलो, मतविभाजन होऊ शकले नाही’ ही भाजप नेत्यांची सबब पराभूत मनाला तात्पुरती मलमपट्टी करणारी आहे. पण साक्षेपी विश्लेषण केले तर या दोन्ही जिल्ह्यातील भाजपची संघटनव्यवस्था कमालीची सडलेली असल्याचे लक्षात येईल. या पक्षाचे काही आमदार जेवढे ओरबाडता येईल तेवढे ओरबडायचे, पुन्हा संधी मिळाली नाही तर? या हावरट वृत्तीने वागतात. एका आमदाराला तर लोकहितापेक्षा रेतीमाफियांचाच अधिक कळवळा आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील कार्यकारिणी तातडीने बरखास्त करावी, एवढी दयनीय अवस्था भाजपची इथे आहे.प्रफुल पटेल यांनी मधुकर कुकडे यांना उमेदवारी देत एका दगडात अनेक पक्षी मारले. परंतु, त्याच दगडाने पुढच्या वर्षी होणाºया लोकसभा निवडणुकीत आपला कपाळमोक्ष तर होणार नाही ना? याची काळजी प्रफुलभार्इंना घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक स्वत: प्रफुलभाई किंवा पत्नी वर्षाबेन लढणार आहेत. तसे त्यांनी जाहीरही केले आहे. त्यावेळी कुकडेंचे पुनर्वसन कसे करणार? त्यांना डावलल्यामुळे जातीय अस्मिता टोकदार तर होणार नाही? त्या अस्मितांना नाना पटोले खतपाणी तर घालणार नाहीत? असे अनेक प्रश्न पटेलांसमोर उभे राहणार आहेत. कुणाला पटेल न पटेल! पण पुढच्या काळात नाना पटोले विरुद्ध प्रफुल पटेल असा जुनाच संघर्ष झाडीपट्टीत नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल