शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पटेल-पटोले : जुन्या संघर्षाची नवी नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:36 IST

या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असला तरी ही निवडणूक सर्वस्वी नाना पटोले यांच्या प्रतिष्ठेची होती.

- गजानन जानभोर

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव भारतीय जनता पक्षाला चिंतेत आणि आत्मचिंतनात टाकणारा आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असला तरी ही निवडणूक सर्वस्वी नाना पटोले यांच्या प्रतिष्ठेची होती. केवळ पंतप्रधानांनी आपले म्हणणे ऐकून न घेतल्याच्या रागात पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ही निवडणूक लोकांवर लादली. तटस्थपणे विचार केला तर आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात पटोलेंनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी किती कामे केली, किती निधी आणला हा संशोधनाचा विषय आहे. प्रचंड ऊर्जा आणि उत्तम संघटनकौशल्य असलेला हा लोकनेता वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने इतका ग्रासलेला आहे की स्वत:च्या अहमगंडालाच तो लोकल्याण मानू लागला आहे. पटोले आणि नारायण राणे सारखेच आहेत. ते कुठेच स्थिरावत नाहीत. आपल्या मनासारखे झाले नाही तर चवताळून उठतात आणि कुठला तरी आत्मघातकी निर्णय घेऊन आपल्यामागे कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही फरफटत नेतात.प्रफुल पटेल आणि नाना पटोले या दोघांच्या परिश्रमामुळेच राकाँचे उमेदवार मधुकर कुकडे निवडून आले खरे. परंतु श्रेयाच्या लढाईत पटोलेच सध्या आघाडीवर आहेत. ‘हा विजय संपूर्ण आघाडीचाच’ अशी सावरासावर पटोलेंनी आता सुरू केली असली तरी पटेल-पटोले यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाहीत. पुढच्या काळात ते अधिक तीव्र होणार आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश घेताना पटोलेंना राहुल गांधींनी काही आश्वासने दिली आहेत, असे म्हणतात. पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर ती पूर्ण झाली नाहीत तर पटोले पुन्हा नवा घरठाव करतील. निवडणुकीतील विजय हा त्या नेत्याला अधिक आत्मविश्वास देणारा पण तेवढाच विनयशील बनविणारा असतो. पटोलेंच्या बाबतीत नेमके उलट घडत आहे. ते दिवसेंदिवस आक्रस्ताळे होत आहेत. पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या काळात त्यांनी फडणवीस-गडकरींवर केलेली वैयक्तिक टीका अत्यंत हीन दर्जाची होती. अशी घाणेरडी टीका करणाऱ्या नेत्याच्या भोवतालचे चाटूगार कार्यकर्ते जेव्हा टाळ््या वाजवून ‘खूप छान भाऊ’, असा लाळघोटेपणा करतात तेव्हा तो नेता अधिक चेकाळत जातो. पुढच्या काळात या लोकनेत्याचे असेच अध:पतन होणार आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून खूप काही बोध घेण्याची गरज आहे. ‘जातीच्या समीकरणात आम्ही कमी पडलो, मतविभाजन होऊ शकले नाही’ ही भाजप नेत्यांची सबब पराभूत मनाला तात्पुरती मलमपट्टी करणारी आहे. पण साक्षेपी विश्लेषण केले तर या दोन्ही जिल्ह्यातील भाजपची संघटनव्यवस्था कमालीची सडलेली असल्याचे लक्षात येईल. या पक्षाचे काही आमदार जेवढे ओरबाडता येईल तेवढे ओरबडायचे, पुन्हा संधी मिळाली नाही तर? या हावरट वृत्तीने वागतात. एका आमदाराला तर लोकहितापेक्षा रेतीमाफियांचाच अधिक कळवळा आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील कार्यकारिणी तातडीने बरखास्त करावी, एवढी दयनीय अवस्था भाजपची इथे आहे.प्रफुल पटेल यांनी मधुकर कुकडे यांना उमेदवारी देत एका दगडात अनेक पक्षी मारले. परंतु, त्याच दगडाने पुढच्या वर्षी होणाºया लोकसभा निवडणुकीत आपला कपाळमोक्ष तर होणार नाही ना? याची काळजी प्रफुलभार्इंना घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक स्वत: प्रफुलभाई किंवा पत्नी वर्षाबेन लढणार आहेत. तसे त्यांनी जाहीरही केले आहे. त्यावेळी कुकडेंचे पुनर्वसन कसे करणार? त्यांना डावलल्यामुळे जातीय अस्मिता टोकदार तर होणार नाही? त्या अस्मितांना नाना पटोले खतपाणी तर घालणार नाहीत? असे अनेक प्रश्न पटेलांसमोर उभे राहणार आहेत. कुणाला पटेल न पटेल! पण पुढच्या काळात नाना पटोले विरुद्ध प्रफुल पटेल असा जुनाच संघर्ष झाडीपट्टीत नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल