शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

पाकची वाटचाल अस्थिरतेकडे

By admin | Updated: December 10, 2014 01:09 IST

पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले नवाज शरीफ सरकार कोणत्याही ब:या-वाईट मार्गाने उखडून टाकण्याचे प्रयत्न पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी चालविले आहेत.

पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले नवाज शरीफ सरकार कोणत्याही ब:या-वाईट मार्गाने उखडून टाकण्याचे प्रयत्न पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी चालविले आहेत.  त्यांना या कामात अदय़ाप यश आलेले नाही आणि ते मिळण्याची शक्यताही कमीच आहे. आपल्या या कामासाठी लष्कराची मदत मिळेल, असे इम्रान खान यांना  वाटते; पण आपले जे काही छुपे हेतू आहेत, ते पूर्ण करण्याची क्षमता इम्रान खान यांच्यात नाही, याची लष्कराला जाणीव आहे. शिवाय, इम्रान खान यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संदिग्ध असे आहे. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून राहण्यात अर्थ नाही, हेही पाकिस्तानी लष्कराला कळून चुकलेले आहे. असे असले तरी लष्कर सध्या एक प्यादे म्हणून त्यांचा वापर करीत आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही.
लोकशाही मार्गाने आलेले सरकार अस्थिर करण्यात सध्या काहीच अर्थ नाही, याची लष्कराला जाणीव आहे. कारण, हे सरकार लष्कराने आखून दिलेल्या मार्गाने सत्तेवर आले आहे. अशा परिस्थितीत फक्त जिहादी शक्तींच्या पाठिंब्यावरच इम्रान खान सत्ता हस्तगत करण्याचा खेळ खेळू शकतात; पण सध्या तरी नवाज शरीफ सरकार जिहादी शक्तींच्या इच्छेनुसार वागत आहेत. त्यामुळे इम्रान खान यांना पाठिंबा देण्यात जिहादी शक्तींनाही फारसा रस वाटत नाही.
नवाज शरीफ यांचा उदय ङिाया उल् हक् यांच्या आशीर्वादाने झाला आहे. ङिाया यांनी पाकिस्तानच्या राजकारणात धर्म आणला, हे शरीफ यांना विसरता येणार नाही. अशा स्थितीत सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी काही ना काही उपद्व्याप इम्रान खान यांना करीत राहावे लागणार आहेत. त्यामुळेच त्यांनी आता 16 डिसेंबरला पाकिस्तान बंदचे आयोजन केले आहे. त्याला कितपत यश मिळते, ते आता पाहावे लागेल.
इम्रान खान यांनी 30 नोव्हेंबरला इस्लामाबादेत झालेल्या आपल्या पक्षाच्या जाहीर सभेत पुढील रणनीतीची घोषणा केली होती. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग 16 डिसेंबरच्या बंदचा होता. या दिवशी लाहोर, फैसलाबाद आणि कराचीत हरताळ पाळला जाणार आहे. 16 डिसेंबरलाच पाकिस्तानातून बांगलादेश फुटला होता. हा पाकिस्तानच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस आहे. या निमित्ताने इम्रान खान पाकिस्तानच्या जुन्या जखमेवरची खपली उकरून काढत आहेत. थोडक्यात आता इम्रान खान सत्ता मिळविण्यासाठी पाकिस्तानी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण देशाची सध्याची स्थिती आणि 43 वर्षापूर्वीची पाकिस्तानच्या विभाजनाची घटना यांचा ताळमेळ ते कसा घालणार आहेत, हे समजत नाही. 
इम्रान खान एकीकडे सिस्टीम बदलण्याची भाषा करीत आहेत; पण ती कशी बदलायची, याबद्दल काहीच बोलत नाहीत आणि दुसरीकडे आम जनतेच्या भावनेला आवाहन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची दिशाच समजत नाही. परिणामी, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक दोघेही संभ्रमित झाले आहेत.
एकंदरच सध्याचे पाकिस्तानी राजकारण दिशाहीन झाले आहे. नवाज शरीफ सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. झरदारी व भुत्ताे यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी सत्ता गेल्यानंतर फारशी सक्रिय दिसत नाही आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व राजकारण येनकेन प्रकारे सत्ता कशी मिळेल यासाठी चाललेले आहे. त्यातच लष्कर सत्तेतले आपले वर्चस्व वाढवत आहे. ही सर्व चिन्हे पाकिस्तानला पुन्हा एकदा दीर्घ काळच्या अस्थिरतेकडे नेणारी आहेत.
 
रहीस सिंह
 ज्येष्ठ पत्रकार