शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाकची वाटचाल अस्थिरतेकडे

By admin | Updated: December 10, 2014 01:09 IST

पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले नवाज शरीफ सरकार कोणत्याही ब:या-वाईट मार्गाने उखडून टाकण्याचे प्रयत्न पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी चालविले आहेत.

पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले नवाज शरीफ सरकार कोणत्याही ब:या-वाईट मार्गाने उखडून टाकण्याचे प्रयत्न पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी चालविले आहेत.  त्यांना या कामात अदय़ाप यश आलेले नाही आणि ते मिळण्याची शक्यताही कमीच आहे. आपल्या या कामासाठी लष्कराची मदत मिळेल, असे इम्रान खान यांना  वाटते; पण आपले जे काही छुपे हेतू आहेत, ते पूर्ण करण्याची क्षमता इम्रान खान यांच्यात नाही, याची लष्कराला जाणीव आहे. शिवाय, इम्रान खान यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संदिग्ध असे आहे. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून राहण्यात अर्थ नाही, हेही पाकिस्तानी लष्कराला कळून चुकलेले आहे. असे असले तरी लष्कर सध्या एक प्यादे म्हणून त्यांचा वापर करीत आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही.
लोकशाही मार्गाने आलेले सरकार अस्थिर करण्यात सध्या काहीच अर्थ नाही, याची लष्कराला जाणीव आहे. कारण, हे सरकार लष्कराने आखून दिलेल्या मार्गाने सत्तेवर आले आहे. अशा परिस्थितीत फक्त जिहादी शक्तींच्या पाठिंब्यावरच इम्रान खान सत्ता हस्तगत करण्याचा खेळ खेळू शकतात; पण सध्या तरी नवाज शरीफ सरकार जिहादी शक्तींच्या इच्छेनुसार वागत आहेत. त्यामुळे इम्रान खान यांना पाठिंबा देण्यात जिहादी शक्तींनाही फारसा रस वाटत नाही.
नवाज शरीफ यांचा उदय ङिाया उल् हक् यांच्या आशीर्वादाने झाला आहे. ङिाया यांनी पाकिस्तानच्या राजकारणात धर्म आणला, हे शरीफ यांना विसरता येणार नाही. अशा स्थितीत सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी काही ना काही उपद्व्याप इम्रान खान यांना करीत राहावे लागणार आहेत. त्यामुळेच त्यांनी आता 16 डिसेंबरला पाकिस्तान बंदचे आयोजन केले आहे. त्याला कितपत यश मिळते, ते आता पाहावे लागेल.
इम्रान खान यांनी 30 नोव्हेंबरला इस्लामाबादेत झालेल्या आपल्या पक्षाच्या जाहीर सभेत पुढील रणनीतीची घोषणा केली होती. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग 16 डिसेंबरच्या बंदचा होता. या दिवशी लाहोर, फैसलाबाद आणि कराचीत हरताळ पाळला जाणार आहे. 16 डिसेंबरलाच पाकिस्तानातून बांगलादेश फुटला होता. हा पाकिस्तानच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस आहे. या निमित्ताने इम्रान खान पाकिस्तानच्या जुन्या जखमेवरची खपली उकरून काढत आहेत. थोडक्यात आता इम्रान खान सत्ता मिळविण्यासाठी पाकिस्तानी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण देशाची सध्याची स्थिती आणि 43 वर्षापूर्वीची पाकिस्तानच्या विभाजनाची घटना यांचा ताळमेळ ते कसा घालणार आहेत, हे समजत नाही. 
इम्रान खान एकीकडे सिस्टीम बदलण्याची भाषा करीत आहेत; पण ती कशी बदलायची, याबद्दल काहीच बोलत नाहीत आणि दुसरीकडे आम जनतेच्या भावनेला आवाहन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची दिशाच समजत नाही. परिणामी, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक दोघेही संभ्रमित झाले आहेत.
एकंदरच सध्याचे पाकिस्तानी राजकारण दिशाहीन झाले आहे. नवाज शरीफ सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. झरदारी व भुत्ताे यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी सत्ता गेल्यानंतर फारशी सक्रिय दिसत नाही आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व राजकारण येनकेन प्रकारे सत्ता कशी मिळेल यासाठी चाललेले आहे. त्यातच लष्कर सत्तेतले आपले वर्चस्व वाढवत आहे. ही सर्व चिन्हे पाकिस्तानला पुन्हा एकदा दीर्घ काळच्या अस्थिरतेकडे नेणारी आहेत.
 
रहीस सिंह
 ज्येष्ठ पत्रकार