शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

पाकची वाटचाल अस्थिरतेकडे

By admin | Updated: December 10, 2014 01:09 IST

पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले नवाज शरीफ सरकार कोणत्याही ब:या-वाईट मार्गाने उखडून टाकण्याचे प्रयत्न पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी चालविले आहेत.

पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले नवाज शरीफ सरकार कोणत्याही ब:या-वाईट मार्गाने उखडून टाकण्याचे प्रयत्न पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी चालविले आहेत.  त्यांना या कामात अदय़ाप यश आलेले नाही आणि ते मिळण्याची शक्यताही कमीच आहे. आपल्या या कामासाठी लष्कराची मदत मिळेल, असे इम्रान खान यांना  वाटते; पण आपले जे काही छुपे हेतू आहेत, ते पूर्ण करण्याची क्षमता इम्रान खान यांच्यात नाही, याची लष्कराला जाणीव आहे. शिवाय, इम्रान खान यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संदिग्ध असे आहे. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून राहण्यात अर्थ नाही, हेही पाकिस्तानी लष्कराला कळून चुकलेले आहे. असे असले तरी लष्कर सध्या एक प्यादे म्हणून त्यांचा वापर करीत आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही.
लोकशाही मार्गाने आलेले सरकार अस्थिर करण्यात सध्या काहीच अर्थ नाही, याची लष्कराला जाणीव आहे. कारण, हे सरकार लष्कराने आखून दिलेल्या मार्गाने सत्तेवर आले आहे. अशा परिस्थितीत फक्त जिहादी शक्तींच्या पाठिंब्यावरच इम्रान खान सत्ता हस्तगत करण्याचा खेळ खेळू शकतात; पण सध्या तरी नवाज शरीफ सरकार जिहादी शक्तींच्या इच्छेनुसार वागत आहेत. त्यामुळे इम्रान खान यांना पाठिंबा देण्यात जिहादी शक्तींनाही फारसा रस वाटत नाही.
नवाज शरीफ यांचा उदय ङिाया उल् हक् यांच्या आशीर्वादाने झाला आहे. ङिाया यांनी पाकिस्तानच्या राजकारणात धर्म आणला, हे शरीफ यांना विसरता येणार नाही. अशा स्थितीत सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी काही ना काही उपद्व्याप इम्रान खान यांना करीत राहावे लागणार आहेत. त्यामुळेच त्यांनी आता 16 डिसेंबरला पाकिस्तान बंदचे आयोजन केले आहे. त्याला कितपत यश मिळते, ते आता पाहावे लागेल.
इम्रान खान यांनी 30 नोव्हेंबरला इस्लामाबादेत झालेल्या आपल्या पक्षाच्या जाहीर सभेत पुढील रणनीतीची घोषणा केली होती. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग 16 डिसेंबरच्या बंदचा होता. या दिवशी लाहोर, फैसलाबाद आणि कराचीत हरताळ पाळला जाणार आहे. 16 डिसेंबरलाच पाकिस्तानातून बांगलादेश फुटला होता. हा पाकिस्तानच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस आहे. या निमित्ताने इम्रान खान पाकिस्तानच्या जुन्या जखमेवरची खपली उकरून काढत आहेत. थोडक्यात आता इम्रान खान सत्ता मिळविण्यासाठी पाकिस्तानी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण देशाची सध्याची स्थिती आणि 43 वर्षापूर्वीची पाकिस्तानच्या विभाजनाची घटना यांचा ताळमेळ ते कसा घालणार आहेत, हे समजत नाही. 
इम्रान खान एकीकडे सिस्टीम बदलण्याची भाषा करीत आहेत; पण ती कशी बदलायची, याबद्दल काहीच बोलत नाहीत आणि दुसरीकडे आम जनतेच्या भावनेला आवाहन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची दिशाच समजत नाही. परिणामी, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक दोघेही संभ्रमित झाले आहेत.
एकंदरच सध्याचे पाकिस्तानी राजकारण दिशाहीन झाले आहे. नवाज शरीफ सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. झरदारी व भुत्ताे यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी सत्ता गेल्यानंतर फारशी सक्रिय दिसत नाही आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व राजकारण येनकेन प्रकारे सत्ता कशी मिळेल यासाठी चाललेले आहे. त्यातच लष्कर सत्तेतले आपले वर्चस्व वाढवत आहे. ही सर्व चिन्हे पाकिस्तानला पुन्हा एकदा दीर्घ काळच्या अस्थिरतेकडे नेणारी आहेत.
 
रहीस सिंह
 ज्येष्ठ पत्रकार