शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

पाकची नवी खोडी

By admin | Updated: January 29, 2016 03:59 IST

पाकिस्तानच्या उत्तरेकडील गिलगीट-बाल्टीस्तान हा स्वायत्त आणि स्वयंशासित प्रदेश पाकिस्तानशी जोडून घेऊन त्याला पाकच्या पाचव्या राज्याचा दर्जा देण्याचा जो मनसुबा

पाकिस्तानच्या उत्तरेकडील गिलगीट-बाल्टीस्तान हा स्वायत्त आणि स्वयंशासित प्रदेश पाकिस्तानशी जोडून घेऊन त्याला पाकच्या पाचव्या राज्याचा दर्जा देण्याचा जो मनसुबा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी रचला आहे, त्याला काश्मीरातील हुरियत कॉन्फरन्सचे फुटीरतावादी जहाल नेते सैय्यद अलि शाह गिलानी यांनी अत्यंत कडवा विरोध केला असून पाकने तसे केले तर जम्मू-काश्मीरसंबंधीचा वादच संपुष्टात येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. पाकच्या उत्तरेकडील हा डोंगराळ भूप्रदेश गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून स्वयंशासन करीत आहे. त्याचे प्रशासकीय नियंत्रण भले पाकिस्तान करीत असला तरी या भूप्रदेशावर पाकिस्तान, चीन आणि भारत या तिन्ही राष्ट्रांनी स्वत:चा हक्क सांगितला आहे. काश्मीरातील गिलानी आणि अन्य अलगाववादी नेते आणि संघटना यांना पाकव्याप्त काश्मीर, गिलगीट-बाल्टीस्तान आणि जम्मू-काश्मीर यांचे मिळून तयार होणाऱ्या आझाद काश्मीरची आस लागून राहिली आहे व तिथे त्यांना स्वयंशासनाचा हक्क हवा आहे. अशातच शरीफ यांनी गिलगीट-बाल्टीस्तानला आपल्या पंखाखाली घेण्याचा विचार करणे याला पाकची नवीन खोडी असेही म्हणता येईल. पण सध्या प्रकृतीच्या कारणास्तव अत्यंत अस्वस्थ असतानाही गिलानी यांनी शरीफ यांना पत्र लिहून आपला विरोध व्यक्त करावा याचा अर्थ गिलानी यांच्यासारख्या जहालांना भारताचे तर नव्हेच पण पाकिस्तानचेही वर्चस्व नको आहे असा होऊ शकेल काय हे आता पाहावे लागेल. सामान्यत: काश्मीरातील फुटीर नेते पाकधार्जिणे असल्याचे मानले जाते आणि पाकिस्तानदेखील नेहमी त्यांना कुरवाळण्याचीच भूमिका घेत आला आहे. पाकच्या या भूमिकेपायीच भारताबरोबरच्या याआधीच्या काही चर्चा ऐनवेळी रद्द करणे भारताला भाग पडले होते. काश्मीरसंबंधीची चर्चा द्विपक्षीय म्हणजे केवळ उभय देशांदरम्यान होईल त्यात तिसऱ्या पक्षाला म्हणजे हुरियत कॉन्फरन्सला काही स्थान नाही ही भारताची प्रथमपासूनची स्वच्छ भूमिका आहे. पण पाकने प्रत्येक वेळी हुरियतचे कोडकौतुक केले आहे. आता त्याच हुरियतच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या गिलगीट-बाल्टीस्तानसंबंधी निर्णयास विरोध दर्शविल्यानंतर तेच कोडकौतुक केले जाते की गिलानी यांचा विरोध डावलला जातो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यात योगायोग असा असेल की पाकच्या या प्रस्तावीत खेळीच्या विरोधात कदाचित भारत आणि हुरीयत एका पातळीवर आलेले दिसू शकतील. अर्थात चीनदेखील बघ्याची भूमिका घेणे शक्य नाही. वास्तविक पाहाता अगदी अलीकडे म्हणजे सातच वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने गिलगीट-बाल्टीस्तानच्या स्वायत्तता आणि स्वयंशासनाचा प्रस्ताव मंजूर करुन त्यावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असिफ अलि झरदारी यांनी स्वाक्षरीदेखील केली होती. आता तोच प्रस्ताव शरीफ बाजूला सारायला सिद्ध झाले असतील तर त्यामागे या शरीफांच्या जागी लष्कर प्रमुख असलेले राहील शरीफ यांचा साहसवाद कारणीभूत नसेलच असे नाही.