शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भारताच्या मुसंडीमुळे पाकिस्तान हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:45 IST

आंतरराष्ट्रीय दबावापोटी भारत स्वत:हून लाइन आॅफ कंट्रोल (नियंत्रण रेषा) स्वत:हून कधीच ओलांडणार नाही.

आंतरराष्ट्रीय दबावापोटी भारत स्वत:हून लाइन आॅफ कंट्रोल (नियंत्रण रेषा) स्वत:हून कधीच ओलांडणार नाही. भारताचा प्रतिकार केवळ भारत भूमीपुरताच मर्यादित असेल, या भ्रमात पाकिस्तान आजवर होता. कारण १९६५ आणि १९७१चा अपवाद वगळता, त्यानंतर भारताने कधीही नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही. आज मात्र, भारतीय वायुसेनेने मंगळवारी पहाटे खोलवर घुसून हल्ला केला. गाफील पाक सैन्यासाठी हा मोठा दणका आहे. पाकच्या हद्दीत ऐंशी किलोमीटर मुसंडी मारून केलेला हा हल्ला पाकिस्तानला हादरविणारा आहे.

भारताच्या मिराज-२००० या एकूण बारा लढाऊ विमानांनी एलओसी ओलांडून हल्ला केला. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्ताननेही त्याला दुजोरा दिला आहे. बालाकोट हा परिसर पख्तुनिस्तान म्हणजेच सध्याच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. हा आपलाच भाग होता. तिथे तर आपण हल्ला केलाच, पण त्याच्याही पलीकडे पाकिस्तानमध्ये आपल्या विमानांनी घुसून हल्ला केला. पहिल्यांदाच आपण एलओसी क्रॉस केली. त्याचे कारण दहशतवाद्यांचे अड्डे जमिनीवरून हल्ला करण्याच्या मर्यादेबाहेर पाकव्याप्त काश्मिरात आहेत. पाक सैन्याकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा यांची रसद मिळविणे, अशा ठिकाणी त्यांना सुलभ असते. पाक सैन्यालाही त्यांना प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे या दृष्टीने सोईच्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे वसविण्यात आले आहेत. ते उद्ध्वस्त करण्यासाठी केवळ विमानांनीच हल्ला करणे शक्य आहे. कारण आपली कोणतीही हानी होऊ न देता, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून आपल्याला सुरक्षित परतायचे असते. एअरफोर्सने हे काम अगदी अचूक केले आहे.

आजच्या हल्ल्यातही आपण बराच अभ्यास केलेला होता. शत्रूच्या रडार यंत्रणेला गाफील ठेवून आपल्या रडार यंत्रणेकडून शत्रूची बित्तमबातमी मिळवित राहिलो. भारतीय बनावटीची नेत्रा एडब्ल्यूसी ही यंत्रणा हल्ल्यासाठी मदत करत होती. ड्रोन नजर ठेवून होते. हल्ल्याचे सखोल नियोजन झाले होते. महत्त्वाचे म्हणजे एलओसी ओलांडण्यासंदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार एअरफोर्सकडे होते. त्यामुळे मिराज विमानांच्या लेझर गायडेड बॉम्बनी दहा-बारा किलोमीटर दूर अंतरावरून लक्ष्याचा अचूक वेध घेतला. त्यानंतर, ते सुरक्षितपणे मागे वळू शकले.

हल्ल्याची वेळ फार महत्त्वाची असते. पहाटे दोन ते चार ही वेळ त्या दृष्टीने अगदीच महत्त्वाची. कारण त्या वेळी बहुतेक सगळे गाफील असतात. पाकला गाफील ठेवण्यात आपण यशस्वी झालो, यात शंकाच नाही. कारण एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर भारत एलओसी ओलांडणार नाही, असेच पाकिस्तान समजत होता. अगदी कारगील युद्धातसुद्धा, भारताच्या मिराज विमानांनी एलओसीचे उल्लंघन न होऊ देता, टायगर हिलवरून लेझर गायडेड बॉम्बचा हल्ला चढविल्याने विजय समीप आला. आपली जीवितहानी वाचली. सर्जिकल स्ट्राइकसाठी अचूक माहिती असल्याशिवाय धाडस दाखविणे अंगलट येऊ शकते. माहिती गोळा करण्याचे अनेक मार्ग असतात. एअरफोर्सने ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केले, याचा अर्थ असा की, ही सगळी माहिती आधी आपल्याकडे होती. दहशतवादी अड्ड्यावर किती दहशतवादी होते, तिथे शस्त्रास्त्रे, दारूगोळ्याचा साठा किती होता, या सगळ्याबद्दलची खात्री पटल्याखेरीज असा हल्ला केला जात नसतो.

देश स्वतंत्र झाला, तेव्हा १९४७ मधली परिस्थिती वेगळी होती, पण ६५मध्ये ‘आॅपरेशन जिब्रॉल्टर’ म्हणून पाकिस्तानने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. श्रीनगरच्या लाल चौकात आणि पुढे दिल्लीत पाकिस्तानी झेंडा फडकविण्याची भाषा भुट्टोंनी केली. त्या वेळी आपण एलओसीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सीमादेखील ओलांडली होती. ७१च्या युद्धात तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दळांच्या ताकदीचा वापर भारताने केला. लाहोर, सियालकोटपासून आपण फक्त वीस किलोमीटर अंतरावर जाऊन पोहोचलो होतो. त्यानंतर, पहिल्यांदाच आपण पाकिस्तानात घुसलो आहोत.या हल्ल्यासंदर्भात चीनचा अपवाद वगळता जग भारतासोबत आहे. पुलावामा हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी जैशने घेतली होती. जैशचे प्रमुख नेते आणि त्यांचे अड्डे पाकिस्तानात असल्याचे जगापुढे आले आहे. हाफीज सईद पाकिस्तानात उघडपणे फिरतो, हे जगाने पाहिले आहे. त्यामुळे भारताने स्वसंरक्षणासाठी हल्ला केला आहे, हे उघड आहे. उलट यातून चीनलाही योग्य तो संदेश मिळाला आहे. पाकिस्तानने हल्ला केला, तरी भारत त्यांना कडक उत्तर देण्यास तयार असेल, पण मुद्दा हा आहे की, पाकिस्तान हल्ला करण्याची क्षमता राखून आहे का? जनरल मुशर्रफ यांनी स्वत:च कबुली दिल्याप्रमाणे, मोठे युद्ध झाले, तर पाकिस्तान बेचिराख होईल. त्यामुळे आता शहाणपणा दाखवायचा की नाही, हा पाकिस्तानपुढचा प्रश्न आहे. ‘कीप इंडिया ब्लिडिंग’ असे चालणार नसल्याचा कडक इशारा आजच्या हल्ल्याने दिला आहे. ७१च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. यापुढे चांगले वागाल तरच हित आहे, असा सज्जड इशारा आपण दिला आहे. आपला हल्ला अतिरेक्यांवर आहे, पाकिस्तानी नागरिकांवर नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनीही पाक सरकारवरचा दबाव आणला पाहिजे़- भूषण गोखलेमाजी एअर मार्शल