शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
4
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
5
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
6
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
7
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
8
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
9
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
10
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
11
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
12
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
13
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
14
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
15
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
16
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
17
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
18
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
19
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
20
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी

पाकिस्तान घेतंय ‘बदला’ : जनतेकडूनच खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 10:16 IST

Pakistan News: पाकिस्ताननं आपला रडीचा डाव कधीच सोडला नाही. प्रत्येक गोष्टीत काहीतरी खुसपट काढत राहायचं आणि आपलं रडगाणं गात राहायचं हा पाकिस्तानचा नेहमीचा फंडा आहे. विशेषत: भारताच्या बाबतीत तर पाकिस्ताननं आपल्या खोड्या कधीच सोडल्या नाहीत.

पाकिस्ताननं आपला रडीचा डाव कधीच सोडला नाही. प्रत्येक गोष्टीत काहीतरी खुसपट काढत राहायचं आणि आपलं रडगाणं गात राहायचं हा पाकिस्तानचा नेहमीचा फंडा आहे. विशेषत: भारताच्या बाबतीत तर पाकिस्ताननं आपल्या खोड्या कधीच सोडल्या नाहीत. भारतानं पाकिस्तानला आजवर प्रत्येक बाबतीत मात दिली आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात याचा मोठा राग आहे. त्यामुळे भारताची नस कुठे दाबता येईल, भारतीयांना कुठे, कसा त्रास देता येईल याचा कायमच ते शोध घेत असतात. आता त्यांनी काय करावं? इतक्या क्षुद्र गोष्टी ते करीत असतात, की त्यानं हसावं की रडावं हेच कळत नाही. मुळात त्यामुळे जगात आपलीच नाचक्की होते हेदेखील त्यांना कळत नाही.

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानाचं जगात नाक ठेचलं गेलं. त्याचा ‘बदला’ आता ते कसा घेताहेत?- तर पाकिस्तानातील भारतीय मुत्सद्यांच्या घरातील गॅसचा पुरवठा त्यांनी थांबवला. भारतीय मुत्सद्यांना गॅस सिलिंडर न देण्याचे आदेश त्यांनी स्थानिक विक्रेत्यांना दिले आहेत. एवढंच नाही, त्यांच्याकडची मिनरल वॉटर आणि वर्तमानपत्रांची सेवाही त्यांनी बंद केली. पाकिस्तान सरकारच्या या कृतीची खुद्द पाकिस्तानी जनतेनंच खिल्ली उडवली आहे. भारताला जर नमवायचंच असेल तर भारतापेक्षा जास्त प्रगती करा, भारताला युद्धात पराभूत करा, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.पाकिस्ताननं इस्लामाबादमधील भारतीय मुत्सद्यांच्या घरांतील गॅस पुरवठा बंद करण्याचे आदेश स्थानिक गॅस सिलिंडर विक्रेत्यांना दिले आहेत. इस्लामाबादमध्ये मिनरल वॉटर आणि वर्तमानपत्रांचा पुरवठाही थांबवण्यात आला. भारतानं नुकत्याच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने ही कारवाई ‘सूड’ म्हणून केल्याचं सांगितलं जात आहे.

अहवालानुसार, हा निर्णय पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या योजनेचा एक भाग आहे. या अंतर्गत पाकिस्तान सूड घेण्याच्या लहानसहान कारवाया करत आहे. खरं तर याला ‘सूड’ तरी कसं म्हणावं? देशाच्या पातळीवर एखादी कृती करत असताना, सर्वसामान्य माणसांना किंवा काही मोजक्या लोाकंना लक्ष्य करुन त्यांना त्रास देण्यात काय हशील आहे? पण हे कळलं तर तो पाकिस्तान कुठला! या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून नाइलाजानं भारतानंही दिल्लीत कार्यरत पाकिस्तानी मुत्सद्यांना वर्तमानपत्र पोहोचवणं थांबवलं.

अशा खुसपटी काढण्याचा पाकिस्तानचा हा पहिलाच प्रयत्न नाही. पाकिस्ताननं यापूर्वीही अनेकदा असे रडीचे डाव खेळले आहेत. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतरही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय मुत्सद्यांना अशाच प्रकारे त्रास दिला होता. त्या काळात, भारताच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रासदायक वागणुकीला सामोरे जावे लागले होते. या घटनांमध्ये सातत्यानं पाठलाग करणं, सुरक्षा रक्षकांकडून मुद्दाम प्रश्नांची सरबत्ती करणं आणि खोटे फोन कॉल करणं यासारख्या गोष्टींचा समावेश होता. असा रडीचा डाव खेळू नका आणि आमच्या अधिकाऱ्यांना, नागरिकांना त्रास देऊ नका, असं सांगत भारतीय उच्चायुक्तानं हे प्रकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोरही मांडलं होतं. वास्तविक कोणत्याही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना त्रास न देणं हे अंतरराष्ट्रीय संकेत आहेत, पण पाकिस्तानला त्याचीही चाड नाही.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय