शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

सापत्नपणाचे दु:ख वेदनादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:46 IST

मिलिंद कुलकर्णी लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वात स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत आहे. दोन पर्वातील कोरोना युध्दातील यशस्वी कामगिरीनंतर स्थलांतरितांच्या ...

मिलिंद कुलकर्णीलॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वात स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत आहे. दोन पर्वातील कोरोना युध्दातील यशस्वी कामगिरीनंतर स्थलांतरितांच्या विषयावर केंद्र व राज्य सरकार, राज्य सरकार विरुध्द राज्य सरकार, स्थलांतरित विरुध्द प्रशासन, प्रशासन विरुध्द संघटना आमने सामने आल्याचे पहायला मिळत आहे.कोरोनाच्या जागतिक संकटाची चाहूल जानेवारी महिन्याच्या शेवटी केरळ राज्यातील पहिल्या रुग्णाच्या निमित्ताने लागली होती. शेजारील चिनमधून सुरुवात झालेल्या या महामारीने युरोप आणि अमेरिकेत थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर अनेकांनी लॉक डाऊनचा पर्याय स्विकारला. भारतात २३ मार्चचा ‘जनता कर्फ्यू’ ही त्याचीच नांदी होती. २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’चे पहिले पर्व सुरु झाले. मात्र या लॉकडाऊनपूर्वी किंवा या लॉकडाऊन काळात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले विद्यार्थी, यात्रेकरु यांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासंबंधी विचार व्हायला हवा होता. उद्योग-व्यापार संपूर्ण बंद झाल्यानंतर तेथे काम करणाºया मजूर, कामगारांचे पुढे काय, याचाही विचार करायला हवा होता. केंद्र सरकारने तीन महिन्यांचे रेशनचे धान्य देण्याचा निर्णय घेतला. आस्थापनांनी लॉकडाऊन काळातील वेतन कापू नये तसेच घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावू नये, असे आवाहन खुद्द पंतप्रधान व केंद्र सरकारने केले होते. याचा अर्थ कामगारांच्या परिस्थितीची कल्पना सरकारला होती. लॉकडाऊनचे तिसरे पर्व सुरु होणार हे निश्चित झाल्यानंतर कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली. उद्योग व व्यापार सुरु होण्याची शाश्वती नाही. मग याठिकाणी थांबण्यात काय हशील, हा विचार मनात येणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला जिवाची पर्वा आहे, कोरोनाने थैमान घातले असताना परक्या शहरात उपाशीपोटी राहण्यापेक्षा गावाकडे गेलेले बरे, असा विचार करुन कामगार, मजूर पायदळ गावाकडे निघाले.कार्यस्थळ ते गाव असा वेदनादायी प्रवास हजारो मजूर करीत आहेत. आपल्याच देशात परक्यासारखी, गुन्हेगारासारखी वागणूक देशवासीयांना मिळत आहे, यासारखी लाजीरवाणी बाब कोणतीही नाही. शासकीय निवारागृहात व्यवस्था करण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु, भविष्याची चिंता, कुटुंबियांपासून दूर राहिलेल्या जिवांना रोजचा घास तरी गोड लागेल काय, याचा माणूस म्हणून कोणी विचार केलेला नाही. निवारागृहातून पलायनाची ही कारणे आहेत. कोरोनाच्या दहशतीपायी माणुसकीसुध्दा विसरली गेल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. स्वत:चे राज्य, स्वत:चा गावदेखील या मंडळींना सामावून घ्यायला तयार नाही. अनेक खेड्यांमध्ये परत येणाºया मजुरांना कुटुंबासह वेशीबाहेर, शेतामध्ये १४ दिवस राहण्याची सक्ती गावाकडून केली जात आहे. वैद्यकीय तपासणी प्रत्येक जिल्ह्याची सीमा ओलांडल्यानंतर केल्यावरही ही अवस्था आहे.कोरोनाच्या या संकटातही देशातील ‘इंडिया’ विरुध्द ‘भारत’ हे चित्र अधोरेखित होत आहे. पासपोर्टवाल्यांनी आणलेला हा संसर्गजन्य आजार रेशनकार्डवाल्यांचे जीवन उध्वस्त करतोय, हे वास्तव ठळकपणे समोर आले आहे. जगातील अनेक देश हे भारतात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था करुन परत आणत आहे. तसेच भारतदेखील आखाती राष्टÑांसह इतर देशातील भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोटा, दिल्लीहून विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र निराधार मजुरांच्या व्यवस्थेसाठी ४० दिवसांत सर्वमान्य तोडगा काढता आलेला नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्टÑ या दोन्ही सरकारांमध्ये मजुरांच्या घरवापसीवरुन वाद सुरु आहे. शिरपूर तालुक्यातील बिजासन घाटात उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील मजूर सीमा ओलांडण्यासाठी चार दिवस प्रतिक्षा करीत थांबले. मध्य प्रदेश सरकार परवानगी देत नसल्याने अखेर त्यांचा संयम सुटला आणि दगडफेक झाली. तेव्हा कुठे सरकार नरमले.कोरोनाने मरण आले तर ते एकदा येईल. पण पोटासाठी गाव सोडून परप्रांतात आलेल्या आणि आता कोरोनाने हा प्रांतदेखील सोडून घरवापसी करणाºया मजुरांना पदोपदी आपल्याच लोकांकडून अवहेलना, अपमान, सापत्न वागणुकीने मरणयातना भोगाव्या लागत आहे, यापेक्षा दुर्देव ते कोणते? 

टॅग्स :Jalgaonजळगाव