शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

झुंडशाहीचा उन्माद

By admin | Updated: May 20, 2017 03:01 IST

नागपूर-भंडारा रोडवरील पारडी नाक्यावर सिग्नलची वाट बघत आमची एस्टिम उभी होती. तितक्यात बाजूने एक ट्रक सिग्नल तोडून भरधाव वेगात चौक ओलांडून गेला.

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटेनागपूर-भंडारा रोडवरील पारडी नाक्यावर सिग्नलची वाट बघत आमची एस्टिम उभी होती. तितक्यात बाजूने एक ट्रक सिग्नल तोडून भरधाव वेगात चौक ओलांडून गेला. शाळेची भिंत तोडून शाळेच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले हे आम्हाला अंतरामुळे दिसत नव्हते, कळलेही नव्हते. क्षणात सिग्नल मिळाल्यावर आम्ही पुढे निघालो तर कोलाहलात, हातात लोखंडी रॉड्स, काठ्या आणि जे मिळेल ते घेऊन दगडफेक करीत उन्मादाने विध्वंसक थैमान घालणाऱ्या बेफाम झुंडीत आम्ही घेरले गेलो. आम्ही कोणताही नियम तोडला नव्हता की गुन्हा केला नव्हता. समोरच्या बसला अडवून खिडक्या फोडणे, निष्पाप ड्रायव्हरला खाली खेचणे सुरू होते. मागची कार त्यांनी उलटवली होती.आमच्या कारची मागची काच, माझ्या बाजूची खिडकी यांच्या काचेचा चुरा आमच्या अंगावर आणि कारमध्ये विखुरला होता. अभिनेता असणारा माझा देखणा भाचा अजित पेंडसे आणि सुंदर अभिनेत्री श्वेता पेंडसे, लाखनीच्या कॉलेजातील एक प्राध्यापक आणि आमचा महादेव ड्रायव्हर सारेच क्षणभर सुन्न झालो. आम्हाला आश्चर्यात टाकत त्या उग्र, खुनशी जमावातून चार अनोळखी तरुण माझ्या खिडकीशी येऊन घाईने म्हणाले- ‘‘मॅडम! ड्रायव्हरना आमच्या बाजूने कार काढायला सांगा आणि एकदम भंडाऱ्यालाच थांबा.’’ निसटते आभार मानत आम्ही निघालो ते भंडाऱ्याच्या पेट्रोलपंपावरच थांबलो. मोबाइल्समुळे झुंडशाहीची वार्ता त्यांना कळली होती. हातपाय न गाळता आम्ही लाखनी कॉलेजात पोहोचलो. कार पाहून अवाक् झालेल्या विद्यार्थ्यांसमोर अभिवाचनाचा कार्यक्रम रंगला. नागपूर-भंडारा मार्ग बंद झाल्यामुळे अनोळखी आणि आडमार्गाने, झुंडशाहीचा धसका घेतलेले आम्ही सुरक्षित घरी पोहोचलो. दिवसेंदिवस ही झुंडशाही उन्मादाचे उग्र स्वरूप धारण करते आहे. लहानसहान कारणांनी रस्ते अडवणे, रेल्वे बंद पाडणे आणि पापभीरू लोकांना वेठीस धरणे नित्याचे झाले आहे. तोंडाला काळे फासणे, धक्काबुक्की करणे हे करता करता गणपती विसर्जनाला शिस्त लावली म्हणून ड्यूटीवरच्या पोलिसाला तलावात बुडवण्यासाठी झटापट करणे, संशयावरून कुणालाही बेदम मारहाण करणे, निर्घृण हत्या करणे आणि राजरोसपणे समाजात वावरणे या गोष्टी अस्वस्थ करतात. सतत फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडियाच्या जाळ्यात, धुंदीत वावरणाऱ्यांच्या मनाचा आणि बुद्धीचा नव्हे तर विश्वाचा कब्जा जणू या नखाएवढ्या चीपने घेतला आहे. एकामागोमाग एक वेगाने माहितीचे तुकडे त्यांना मिळतात. त्यात स्थिरता, एकाग्रता न येता मन-बुद्धी भरकटत राहते. योग्य-अयोग्य, खरे-खोटे न बघता यांत्रिकपणे मिळाले ते पुढे फॉरवर्ड केले जाते. आजचा बुद्धिमान माणूस केवळ कमांड्स घेणारा, झुंडीने जगणारा यंत्रमानव तर बनला नाही? आता वेगळा यंत्रमानव बनवण्याची गरजच काय?