शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

झुंडशाहीचा उन्माद

By admin | Updated: May 20, 2017 03:01 IST

नागपूर-भंडारा रोडवरील पारडी नाक्यावर सिग्नलची वाट बघत आमची एस्टिम उभी होती. तितक्यात बाजूने एक ट्रक सिग्नल तोडून भरधाव वेगात चौक ओलांडून गेला.

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटेनागपूर-भंडारा रोडवरील पारडी नाक्यावर सिग्नलची वाट बघत आमची एस्टिम उभी होती. तितक्यात बाजूने एक ट्रक सिग्नल तोडून भरधाव वेगात चौक ओलांडून गेला. शाळेची भिंत तोडून शाळेच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले हे आम्हाला अंतरामुळे दिसत नव्हते, कळलेही नव्हते. क्षणात सिग्नल मिळाल्यावर आम्ही पुढे निघालो तर कोलाहलात, हातात लोखंडी रॉड्स, काठ्या आणि जे मिळेल ते घेऊन दगडफेक करीत उन्मादाने विध्वंसक थैमान घालणाऱ्या बेफाम झुंडीत आम्ही घेरले गेलो. आम्ही कोणताही नियम तोडला नव्हता की गुन्हा केला नव्हता. समोरच्या बसला अडवून खिडक्या फोडणे, निष्पाप ड्रायव्हरला खाली खेचणे सुरू होते. मागची कार त्यांनी उलटवली होती.आमच्या कारची मागची काच, माझ्या बाजूची खिडकी यांच्या काचेचा चुरा आमच्या अंगावर आणि कारमध्ये विखुरला होता. अभिनेता असणारा माझा देखणा भाचा अजित पेंडसे आणि सुंदर अभिनेत्री श्वेता पेंडसे, लाखनीच्या कॉलेजातील एक प्राध्यापक आणि आमचा महादेव ड्रायव्हर सारेच क्षणभर सुन्न झालो. आम्हाला आश्चर्यात टाकत त्या उग्र, खुनशी जमावातून चार अनोळखी तरुण माझ्या खिडकीशी येऊन घाईने म्हणाले- ‘‘मॅडम! ड्रायव्हरना आमच्या बाजूने कार काढायला सांगा आणि एकदम भंडाऱ्यालाच थांबा.’’ निसटते आभार मानत आम्ही निघालो ते भंडाऱ्याच्या पेट्रोलपंपावरच थांबलो. मोबाइल्समुळे झुंडशाहीची वार्ता त्यांना कळली होती. हातपाय न गाळता आम्ही लाखनी कॉलेजात पोहोचलो. कार पाहून अवाक् झालेल्या विद्यार्थ्यांसमोर अभिवाचनाचा कार्यक्रम रंगला. नागपूर-भंडारा मार्ग बंद झाल्यामुळे अनोळखी आणि आडमार्गाने, झुंडशाहीचा धसका घेतलेले आम्ही सुरक्षित घरी पोहोचलो. दिवसेंदिवस ही झुंडशाही उन्मादाचे उग्र स्वरूप धारण करते आहे. लहानसहान कारणांनी रस्ते अडवणे, रेल्वे बंद पाडणे आणि पापभीरू लोकांना वेठीस धरणे नित्याचे झाले आहे. तोंडाला काळे फासणे, धक्काबुक्की करणे हे करता करता गणपती विसर्जनाला शिस्त लावली म्हणून ड्यूटीवरच्या पोलिसाला तलावात बुडवण्यासाठी झटापट करणे, संशयावरून कुणालाही बेदम मारहाण करणे, निर्घृण हत्या करणे आणि राजरोसपणे समाजात वावरणे या गोष्टी अस्वस्थ करतात. सतत फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडियाच्या जाळ्यात, धुंदीत वावरणाऱ्यांच्या मनाचा आणि बुद्धीचा नव्हे तर विश्वाचा कब्जा जणू या नखाएवढ्या चीपने घेतला आहे. एकामागोमाग एक वेगाने माहितीचे तुकडे त्यांना मिळतात. त्यात स्थिरता, एकाग्रता न येता मन-बुद्धी भरकटत राहते. योग्य-अयोग्य, खरे-खोटे न बघता यांत्रिकपणे मिळाले ते पुढे फॉरवर्ड केले जाते. आजचा बुद्धिमान माणूस केवळ कमांड्स घेणारा, झुंडीने जगणारा यंत्रमानव तर बनला नाही? आता वेगळा यंत्रमानव बनवण्याची गरजच काय?