शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

झुंडशाहीचा उन्माद

By admin | Updated: May 20, 2017 03:01 IST

नागपूर-भंडारा रोडवरील पारडी नाक्यावर सिग्नलची वाट बघत आमची एस्टिम उभी होती. तितक्यात बाजूने एक ट्रक सिग्नल तोडून भरधाव वेगात चौक ओलांडून गेला.

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटेनागपूर-भंडारा रोडवरील पारडी नाक्यावर सिग्नलची वाट बघत आमची एस्टिम उभी होती. तितक्यात बाजूने एक ट्रक सिग्नल तोडून भरधाव वेगात चौक ओलांडून गेला. शाळेची भिंत तोडून शाळेच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले हे आम्हाला अंतरामुळे दिसत नव्हते, कळलेही नव्हते. क्षणात सिग्नल मिळाल्यावर आम्ही पुढे निघालो तर कोलाहलात, हातात लोखंडी रॉड्स, काठ्या आणि जे मिळेल ते घेऊन दगडफेक करीत उन्मादाने विध्वंसक थैमान घालणाऱ्या बेफाम झुंडीत आम्ही घेरले गेलो. आम्ही कोणताही नियम तोडला नव्हता की गुन्हा केला नव्हता. समोरच्या बसला अडवून खिडक्या फोडणे, निष्पाप ड्रायव्हरला खाली खेचणे सुरू होते. मागची कार त्यांनी उलटवली होती.आमच्या कारची मागची काच, माझ्या बाजूची खिडकी यांच्या काचेचा चुरा आमच्या अंगावर आणि कारमध्ये विखुरला होता. अभिनेता असणारा माझा देखणा भाचा अजित पेंडसे आणि सुंदर अभिनेत्री श्वेता पेंडसे, लाखनीच्या कॉलेजातील एक प्राध्यापक आणि आमचा महादेव ड्रायव्हर सारेच क्षणभर सुन्न झालो. आम्हाला आश्चर्यात टाकत त्या उग्र, खुनशी जमावातून चार अनोळखी तरुण माझ्या खिडकीशी येऊन घाईने म्हणाले- ‘‘मॅडम! ड्रायव्हरना आमच्या बाजूने कार काढायला सांगा आणि एकदम भंडाऱ्यालाच थांबा.’’ निसटते आभार मानत आम्ही निघालो ते भंडाऱ्याच्या पेट्रोलपंपावरच थांबलो. मोबाइल्समुळे झुंडशाहीची वार्ता त्यांना कळली होती. हातपाय न गाळता आम्ही लाखनी कॉलेजात पोहोचलो. कार पाहून अवाक् झालेल्या विद्यार्थ्यांसमोर अभिवाचनाचा कार्यक्रम रंगला. नागपूर-भंडारा मार्ग बंद झाल्यामुळे अनोळखी आणि आडमार्गाने, झुंडशाहीचा धसका घेतलेले आम्ही सुरक्षित घरी पोहोचलो. दिवसेंदिवस ही झुंडशाही उन्मादाचे उग्र स्वरूप धारण करते आहे. लहानसहान कारणांनी रस्ते अडवणे, रेल्वे बंद पाडणे आणि पापभीरू लोकांना वेठीस धरणे नित्याचे झाले आहे. तोंडाला काळे फासणे, धक्काबुक्की करणे हे करता करता गणपती विसर्जनाला शिस्त लावली म्हणून ड्यूटीवरच्या पोलिसाला तलावात बुडवण्यासाठी झटापट करणे, संशयावरून कुणालाही बेदम मारहाण करणे, निर्घृण हत्या करणे आणि राजरोसपणे समाजात वावरणे या गोष्टी अस्वस्थ करतात. सतत फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडियाच्या जाळ्यात, धुंदीत वावरणाऱ्यांच्या मनाचा आणि बुद्धीचा नव्हे तर विश्वाचा कब्जा जणू या नखाएवढ्या चीपने घेतला आहे. एकामागोमाग एक वेगाने माहितीचे तुकडे त्यांना मिळतात. त्यात स्थिरता, एकाग्रता न येता मन-बुद्धी भरकटत राहते. योग्य-अयोग्य, खरे-खोटे न बघता यांत्रिकपणे मिळाले ते पुढे फॉरवर्ड केले जाते. आजचा बुद्धिमान माणूस केवळ कमांड्स घेणारा, झुंडीने जगणारा यंत्रमानव तर बनला नाही? आता वेगळा यंत्रमानव बनवण्याची गरजच काय?