शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

थकबाकीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:36 IST

आपण लोकप्रतिधी झालो म्हणजे आपल्याला सर्वकाही माफ असते, अशी प्रवृत्ती येत्या काळात वाढीस लागली आहे. काल-परवा नागपुरात वीज बिल थकबाकीसाठी पुढाकार घेणा-या एसएनडीएलच्या कार्यालयात माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात...

आपण लोकप्रतिधी झालो म्हणजे आपल्याला सर्वकाही माफ असते, अशी प्रवृत्ती येत्या काळात वाढीस लागली आहे. काल-परवा नागपुरात वीज बिल थकबाकीसाठी पुढाकार घेणा-या एसएनडीएलच्या कार्यालयात माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी घातलेला धुडगूस व युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांच्या कुटुंबीयांनी एसएनडीएलच्या पथकाला केलेली मारहाण ही याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. महावितरणतर्फे ‘शून्य थकबाकी’ मोहीम राबवून पहिल्या दोन दिवसातच नागपूर परिक्षेत्रातील १५ हजार ७०२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आला. या सामान्य नागरिकांनी ओरड केली नाही. उलट सोय नसतानाही थकीत बिल भरण्यासाठी पुढाकार घेतला. तर दुसरीकडे नगरसेवकांकडे थकबाकी असल्यामुळे वीज कापण्यास गेलेल्या पथकाला विरोध करीत हल्ले करण्यात आले. पंतप्रधान मोदी जनतेची कशी फसवणूक करीत आहेत हे सांगण्यासाठी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके वाराणशी पर्यंत बाईक रॅली काढतात. तर दुसरीकडे त्यांचेच कुटुंबीय वीज बिल थकवितात व वसुलीसाठी येणाºया पथकावर हल्ला चढवतात. व्यक्तिगत हितापेक्षा सार्वजनिकहिताला प्राधान्य द्या, असे गडकरी, फडणवीस वारंवार सांगतात. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आपल्या नगरसेवकांची थकबाकी वाचविण्यासाठी यंत्रणेवर दबाव टाकताना दिसतात. हा विरोधाभास न पटण्यासारखा आहे. वीज बिल आकारणीवर कुणाचाही आक्षेप असू शकतो. मात्र, तो आक्षेप कायदेशीर मार्गाने नोंदवायला हवा. त्या विरोधात न्यायालयीन लढा द्यायला हवा. मात्र, आलेले बिल आपल्याला मान्य नाही असे सांगून ते भरणारच नाही, अशी उद्दाम भूमिका घेणे लोकशाहीच्या संस्कारात बसत नाही. लोकहिताची कामे करण्यासाठी आपण राजकारणात आलो, असा कांगावा करणारे नगरसेवक जर स्वत:ची देणी थकविण्यासाठी आपल्याचा राजकीय प्राबल्याचा वापर करीत असतील तर त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का, याचे आत्मचिंतन त्या ‘सेवकांनी’ करण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांकडे हजार रुपयांचे बिल थकीत असले तरी एसएनडीएल लगेच कारवाई करते. सामान्यांच्या विनंतीला काही तासांचीही मुदत दिली जात नाही. तर दुसरीकडे नगरसेवक म्हणून वावरणाºयांकडे तब्बल १० हजारापासून ते ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी होईपर्यंत मीटरला हातही लावला जात नाही. एसएनडीएलने सुरुवातीलाच दिलेली सवलत नंतर मग अशी त्यांच्याच अंगावर येते. यापासून यंत्रणेनेही धडा घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र