शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कृष्णाकाठचे औदुंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:47 IST

कृष्णेचं पात्र जलानं काठोकाठ भरलेलं. अवघा परिसर भाव भक्तीनं भारलेला! दूरवर निळंशार आकाश पसरलेलं! पैलतीर हिरव्यागार शेतीनं तरारलेलं! ऐलतीरावर भगवान दत्तात्रयांचं वसतिस्थान. मनोहर पादुका भक्तांना भावणा-या. दगडी पाय-यांचा देखणा घाट.

- कौमुदी गोडबोलेकृष्णेचं पात्र जलानं काठोकाठ भरलेलं. अवघा परिसर भाव भक्तीनं भारलेला! दूरवर निळंशार आकाश पसरलेलं! पैलतीर हिरव्यागार शेतीनं तरारलेलं! ऐलतीरावर भगवान दत्तात्रयांचं वसतिस्थान. मनोहर पादुका भक्तांना भावणा-या. दगडी पाय-यांचा देखणा घाट. औदुंबर मोठा भाग्यवान! या वृक्षाच्या तळवटी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी म्हणजेच दत्तगुरूंचा नित्य वास! त्यामुळे औदुंबर वृक्ष पूजनीय ठरला. शेकडो भक्तांच्या भावपूर्ण सहवासात रमलेला औदुंबर आणि कृष्णा नदीचं पवित्र पात्र दत्तगुरूंच्या शक्तीनं संपन्न झालेलं.शांतता, स्वच्छता याचा सुरेख संगम झालेलं सुंदर स्थान! श्री गुरूंवर दृढ-श्रद्धा असलेला वर्ग! कृष्णेच्या जलाप्रमाणे प्रवाहित होणारी भक्ती सर्वदूर पोचलेली! प्रखर निष्ठेनं, नेमस्तपणानं, नि:स्पृहतेनं या स्थानाला आगळं वेगळं महत्त्व लाभलेलं! सदैव सतेजपणाचं वरदान लाभलेली!सुमारे सात-साडेसात शतकांपासून शक्तिसंपन्न असलेलं वाडी हे स्थान! निवांतपणानं कृष्णाकाठी साधना करण्यास सुयोग्य असलेलं क्षेत्रं. हल्ली अशी स्थानं, क्षेत्रं दुर्मिळ झालेली आहेत. सगळीकडे व्यवसाय, व्यवहाराचा कोरडेपणा आलेला आहे. सर्वत्र गोंधळ दिसून येतो. कृष्णेचं जल स्वच्छ सुंदर असून संथपणानं लोककल्याणाची आस बाळगून समस्त समाजाला सामावून घेण्याच्या क्षमतेनं संपन्न आहे.साडेसातशे वर्षांपूर्वी ज्या घराण्यावर दत्तगुरूंनी कृपा केली त्यांचे वंशज आजही श्रद्धा, निष्ठा ठेवून श्रीगुरू दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये रममाण झालेले दिसून येतात. कृपेचा चांदण वर्षाव झालेल्या भक्तांमुळे हल्लीच्या काळातही भक्तीमधील शक्तीचा प्रत्यय येत आहेत. दत्तभक्ती, नृसिंह सरस्वती स्वामींच्या कथा या काल्पनिक नसून खºया आहेत याची साक्ष देणारी घराणी, त्यांचे वंशज उभे आहेत. नितांत नितळ असणारी भक्ती हल्लीच्या धकाधकीच्या, तणावाच्या स्पर्धेच्या काळातही माणसाला उभं राहण्याचं बळ प्रदान करते.कृष्णा, पंचगंगा नद्यांचा आणि दत्तगुरूंचा जवळचा संबंध! समृद्ध परिसर, दत्तगुरूंच्या चरणाचा परिसस्पर्श लाभलेलं स्थान! पवित्र स्पंदनांची अनुभूती प्राप्त झाल्यानं चैतन्याचा परिमल मना-मनाभोवती दरवळत राहतो. चंदन उगाळलं की सुगंध येणारच! हा सुगंध जीवनाला लाभला की अवघं जीवन ऊर्जेनं उजळून उठणार यात शंका नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र