शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाकाठचे औदुंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:47 IST

कृष्णेचं पात्र जलानं काठोकाठ भरलेलं. अवघा परिसर भाव भक्तीनं भारलेला! दूरवर निळंशार आकाश पसरलेलं! पैलतीर हिरव्यागार शेतीनं तरारलेलं! ऐलतीरावर भगवान दत्तात्रयांचं वसतिस्थान. मनोहर पादुका भक्तांना भावणा-या. दगडी पाय-यांचा देखणा घाट.

- कौमुदी गोडबोलेकृष्णेचं पात्र जलानं काठोकाठ भरलेलं. अवघा परिसर भाव भक्तीनं भारलेला! दूरवर निळंशार आकाश पसरलेलं! पैलतीर हिरव्यागार शेतीनं तरारलेलं! ऐलतीरावर भगवान दत्तात्रयांचं वसतिस्थान. मनोहर पादुका भक्तांना भावणा-या. दगडी पाय-यांचा देखणा घाट. औदुंबर मोठा भाग्यवान! या वृक्षाच्या तळवटी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी म्हणजेच दत्तगुरूंचा नित्य वास! त्यामुळे औदुंबर वृक्ष पूजनीय ठरला. शेकडो भक्तांच्या भावपूर्ण सहवासात रमलेला औदुंबर आणि कृष्णा नदीचं पवित्र पात्र दत्तगुरूंच्या शक्तीनं संपन्न झालेलं.शांतता, स्वच्छता याचा सुरेख संगम झालेलं सुंदर स्थान! श्री गुरूंवर दृढ-श्रद्धा असलेला वर्ग! कृष्णेच्या जलाप्रमाणे प्रवाहित होणारी भक्ती सर्वदूर पोचलेली! प्रखर निष्ठेनं, नेमस्तपणानं, नि:स्पृहतेनं या स्थानाला आगळं वेगळं महत्त्व लाभलेलं! सदैव सतेजपणाचं वरदान लाभलेली!सुमारे सात-साडेसात शतकांपासून शक्तिसंपन्न असलेलं वाडी हे स्थान! निवांतपणानं कृष्णाकाठी साधना करण्यास सुयोग्य असलेलं क्षेत्रं. हल्ली अशी स्थानं, क्षेत्रं दुर्मिळ झालेली आहेत. सगळीकडे व्यवसाय, व्यवहाराचा कोरडेपणा आलेला आहे. सर्वत्र गोंधळ दिसून येतो. कृष्णेचं जल स्वच्छ सुंदर असून संथपणानं लोककल्याणाची आस बाळगून समस्त समाजाला सामावून घेण्याच्या क्षमतेनं संपन्न आहे.साडेसातशे वर्षांपूर्वी ज्या घराण्यावर दत्तगुरूंनी कृपा केली त्यांचे वंशज आजही श्रद्धा, निष्ठा ठेवून श्रीगुरू दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये रममाण झालेले दिसून येतात. कृपेचा चांदण वर्षाव झालेल्या भक्तांमुळे हल्लीच्या काळातही भक्तीमधील शक्तीचा प्रत्यय येत आहेत. दत्तभक्ती, नृसिंह सरस्वती स्वामींच्या कथा या काल्पनिक नसून खºया आहेत याची साक्ष देणारी घराणी, त्यांचे वंशज उभे आहेत. नितांत नितळ असणारी भक्ती हल्लीच्या धकाधकीच्या, तणावाच्या स्पर्धेच्या काळातही माणसाला उभं राहण्याचं बळ प्रदान करते.कृष्णा, पंचगंगा नद्यांचा आणि दत्तगुरूंचा जवळचा संबंध! समृद्ध परिसर, दत्तगुरूंच्या चरणाचा परिसस्पर्श लाभलेलं स्थान! पवित्र स्पंदनांची अनुभूती प्राप्त झाल्यानं चैतन्याचा परिमल मना-मनाभोवती दरवळत राहतो. चंदन उगाळलं की सुगंध येणारच! हा सुगंध जीवनाला लाभला की अवघं जीवन ऊर्जेनं उजळून उठणार यात शंका नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र