शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

...अन्यथा विकासाचा उणे दर असंख्य लोकांचा बळी घेईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 20:44 IST

विकासाचा दरच उणे होणार असे ते म्हणतात, तेव्हा आर्थिक विकासाच्या आघाडीवर आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत. थोडा उत्तम पाऊस आणि एक-दोन राज्यांतील कोरोनाची हाताबाहेर गेलेली स्थिती वगळता आलेले यश एवढीच जमेची बाजू आहे.

कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेलाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर पहिल्या सहामाहीत उणे राहणार आहे, इतक्या स्पष्ट शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भूमिका मांडली आहे. वास्तविक, या विवेचनावरून भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती सांगितली गेली असली, तरी ती सुधारण्याची जंत्री त्यांनी स्पष्ट केलेली नाही. उद्योजकांच्या कर्जाची फेररचना, सोन्यावर ९० टक्क्यांपर्यंत कर्ज, गृहनिर्माण क्षेत्रात पाच हजार कोटी रुपयांचा अर्थपुरवठा आणि शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करण्यासाठी ‘नाबार्ड’कडे आणखीन पाच हजार कोटी रुपये देण्याची केलेली तरतूद त्यांनी सांगितली. अत्यंत जुजबी उपाययोजना सांगण्यापलीकडे त्यांच्या हातात काही राहिलेलेच नाही. सर्वकाही हातून सुटले आहे.

विकासाचा दरच उणे होणार असे ते म्हणतात, तेव्हा आर्थिक विकासाच्या आघाडीवर आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत. थोडा उत्तम पाऊस आणि एक-दोन राज्यांतील कोरोनाची हाताबाहेर गेलेली स्थिती वगळता आलेले यश एवढीच जमेची बाजू आहे. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी सारासार विचार झाला नाही. आपला समाज बहुसंख्य असंघटित आहे. किमान वेतनही न मिळणारा मोठा वर्ग आहे. मध्यमवर्गीयांची मदार नोकऱ्यांवर आहे. त्यांच्या मासिक वेतनावर आहे. तेच हातचे गेल्याने भविष्य निर्वाह निधीतून लॉकडाऊनच्या काळात ३३ हजार कोटी रुपयांची उचल नोकरदारवर्गाने केली. ही सर्व लक्षणे विकासदर उणे होण्यास पोषकच होती. अशा परिस्थितीत जनतेच्या हाती पैसा कसा येईल, याचा एकही मार्ग किंवा उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे दुसºया तिमाहीचे पतधोरण जाहीर करताना आपण काहीही करू शकत नाही, हेच जणू जाहीर करण्याची वेळ गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यावर आली.

खंडप्राय देशातील गृहनिर्माण क्षेत्राला केवळ पाच हजार कोटी रुपये आणि शेतकरीवर्गाला पाच हजार कोटी रुपये कोठे पुरणार आहेत? आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जसजसे यशस्वी होत जात होतो, तसतसे पुरेसे संरक्षण घेऊन उद्योग, व्यापार, वाहतूक सुरू करायला परवानगी द्यायला हवी होती. जनतेने खबरदारी घेण्याची मानसिकता केली होतीच. मात्र, त्यांचे लोकशिक्षण करीत व्यवहार चालू करण्यावर भर द्यायला हवा होता. जी शहरे किंवा विभाग हॉटस्पॉट ठरली होती, ती वगळून इतर भागात व्यवहार, उद्योग, व्यापार चालू झाला असता, तर अर्थव्यवस्था रुळावर यायला मदत झाली असती. लॉकडाऊन हाच एकमेव मार्ग आहे, असा गैरसमज करून घेऊन सर्वकाही बळाच्या जोरावर बंद करण्याची जंत्री महागात पडली आहे.

आपली आरोग्यव्यवस्था इतकी दुबळी आहे की, ती या संसर्गाला तोंड देऊ शकणार नाही, या भीतीनेच हा लॉकडाऊनचा उपाय करण्यात आला. अनेक राज्यांत यश आल्यानंतरही उपाय शोधले गेले नाहीत. चीनच्या संदर्भात कडक धोरण घेण्याच्या नादात आपण त्यांच्याबरोबरच्या व्यापारावर किती अवलंबून आहोत, याचेही भान आपल्याला राहिलेले नाही. केवळ आत्मनिर्भरची घोषणा करून निर्भर होता येत नाही. त्यासाठी तळातून काम करावे लागणार आहे. किंबहुना या लॉकडाऊनने आपले वस्त्रहरण झाल्याचे दिसले आहे. राष्ट्रवाद हा तोंडी लावण्यासाठी असून चालत नाही. त्यासाठीचा आर्थिक, सार्वत्रिक व्यवस्था, आरोग्य, उत्पादनवृद्धी आदींचा पाया मजबूत असावा लागतो. दास म्हणतात त्यानुसार, पुढील सहामाहीत अर्थव्यवस्था उणे मार्गावरून हटवायची असेल, तर लोकांवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे.

लोकशिक्षण व लोकसहभाग वाढविला पाहिजे. हस्तिदंती मनोºयात बसणाºयांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि हातावरचे पोट असणारे काळजी घेत काम करीत राहिले. त्यापैकी बहुसंख्याकांना कोरोना झाला नाही, हे तरी ध्यानी घ्यायला हवे. सर्वकाही बंद करण्याची किंवा तसा निर्णय घेण्याची क्षमता असणाºयांना आर्थिक विवंचना नाहीत. काम करणाºयांना त्या आहेत. रिझर्व्ह बँकेचे पोकळ पतधोरण हेच सांगते आहे की, लोकसहभागातून उपाययोजना करा. दक्षता घ्या आणि कामाला लागा, अन्यथा विकासाचा उणे दर असंख्य लोकांचा बळी घेईल. ती संख्या कोरोनाच्या मृतांपेक्षा अधिक असेल. रिझर्व्ह बँकेच्या तिमाही पतधोरणाचा काहीही उपयोग होणार नाही. त्यात फक्त टरफलेच आहेत.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक