शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

...अन्यथा विकासाचा उणे दर असंख्य लोकांचा बळी घेईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 20:44 IST

विकासाचा दरच उणे होणार असे ते म्हणतात, तेव्हा आर्थिक विकासाच्या आघाडीवर आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत. थोडा उत्तम पाऊस आणि एक-दोन राज्यांतील कोरोनाची हाताबाहेर गेलेली स्थिती वगळता आलेले यश एवढीच जमेची बाजू आहे.

कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेलाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर पहिल्या सहामाहीत उणे राहणार आहे, इतक्या स्पष्ट शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भूमिका मांडली आहे. वास्तविक, या विवेचनावरून भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती सांगितली गेली असली, तरी ती सुधारण्याची जंत्री त्यांनी स्पष्ट केलेली नाही. उद्योजकांच्या कर्जाची फेररचना, सोन्यावर ९० टक्क्यांपर्यंत कर्ज, गृहनिर्माण क्षेत्रात पाच हजार कोटी रुपयांचा अर्थपुरवठा आणि शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करण्यासाठी ‘नाबार्ड’कडे आणखीन पाच हजार कोटी रुपये देण्याची केलेली तरतूद त्यांनी सांगितली. अत्यंत जुजबी उपाययोजना सांगण्यापलीकडे त्यांच्या हातात काही राहिलेलेच नाही. सर्वकाही हातून सुटले आहे.

विकासाचा दरच उणे होणार असे ते म्हणतात, तेव्हा आर्थिक विकासाच्या आघाडीवर आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत. थोडा उत्तम पाऊस आणि एक-दोन राज्यांतील कोरोनाची हाताबाहेर गेलेली स्थिती वगळता आलेले यश एवढीच जमेची बाजू आहे. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी सारासार विचार झाला नाही. आपला समाज बहुसंख्य असंघटित आहे. किमान वेतनही न मिळणारा मोठा वर्ग आहे. मध्यमवर्गीयांची मदार नोकऱ्यांवर आहे. त्यांच्या मासिक वेतनावर आहे. तेच हातचे गेल्याने भविष्य निर्वाह निधीतून लॉकडाऊनच्या काळात ३३ हजार कोटी रुपयांची उचल नोकरदारवर्गाने केली. ही सर्व लक्षणे विकासदर उणे होण्यास पोषकच होती. अशा परिस्थितीत जनतेच्या हाती पैसा कसा येईल, याचा एकही मार्ग किंवा उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे दुसºया तिमाहीचे पतधोरण जाहीर करताना आपण काहीही करू शकत नाही, हेच जणू जाहीर करण्याची वेळ गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यावर आली.

खंडप्राय देशातील गृहनिर्माण क्षेत्राला केवळ पाच हजार कोटी रुपये आणि शेतकरीवर्गाला पाच हजार कोटी रुपये कोठे पुरणार आहेत? आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जसजसे यशस्वी होत जात होतो, तसतसे पुरेसे संरक्षण घेऊन उद्योग, व्यापार, वाहतूक सुरू करायला परवानगी द्यायला हवी होती. जनतेने खबरदारी घेण्याची मानसिकता केली होतीच. मात्र, त्यांचे लोकशिक्षण करीत व्यवहार चालू करण्यावर भर द्यायला हवा होता. जी शहरे किंवा विभाग हॉटस्पॉट ठरली होती, ती वगळून इतर भागात व्यवहार, उद्योग, व्यापार चालू झाला असता, तर अर्थव्यवस्था रुळावर यायला मदत झाली असती. लॉकडाऊन हाच एकमेव मार्ग आहे, असा गैरसमज करून घेऊन सर्वकाही बळाच्या जोरावर बंद करण्याची जंत्री महागात पडली आहे.

आपली आरोग्यव्यवस्था इतकी दुबळी आहे की, ती या संसर्गाला तोंड देऊ शकणार नाही, या भीतीनेच हा लॉकडाऊनचा उपाय करण्यात आला. अनेक राज्यांत यश आल्यानंतरही उपाय शोधले गेले नाहीत. चीनच्या संदर्भात कडक धोरण घेण्याच्या नादात आपण त्यांच्याबरोबरच्या व्यापारावर किती अवलंबून आहोत, याचेही भान आपल्याला राहिलेले नाही. केवळ आत्मनिर्भरची घोषणा करून निर्भर होता येत नाही. त्यासाठी तळातून काम करावे लागणार आहे. किंबहुना या लॉकडाऊनने आपले वस्त्रहरण झाल्याचे दिसले आहे. राष्ट्रवाद हा तोंडी लावण्यासाठी असून चालत नाही. त्यासाठीचा आर्थिक, सार्वत्रिक व्यवस्था, आरोग्य, उत्पादनवृद्धी आदींचा पाया मजबूत असावा लागतो. दास म्हणतात त्यानुसार, पुढील सहामाहीत अर्थव्यवस्था उणे मार्गावरून हटवायची असेल, तर लोकांवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे.

लोकशिक्षण व लोकसहभाग वाढविला पाहिजे. हस्तिदंती मनोºयात बसणाºयांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि हातावरचे पोट असणारे काळजी घेत काम करीत राहिले. त्यापैकी बहुसंख्याकांना कोरोना झाला नाही, हे तरी ध्यानी घ्यायला हवे. सर्वकाही बंद करण्याची किंवा तसा निर्णय घेण्याची क्षमता असणाºयांना आर्थिक विवंचना नाहीत. काम करणाºयांना त्या आहेत. रिझर्व्ह बँकेचे पोकळ पतधोरण हेच सांगते आहे की, लोकसहभागातून उपाययोजना करा. दक्षता घ्या आणि कामाला लागा, अन्यथा विकासाचा उणे दर असंख्य लोकांचा बळी घेईल. ती संख्या कोरोनाच्या मृतांपेक्षा अधिक असेल. रिझर्व्ह बँकेच्या तिमाही पतधोरणाचा काहीही उपयोग होणार नाही. त्यात फक्त टरफलेच आहेत.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक