शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

... अन्यथा गुंड गव्हर्नन्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:55 IST

नागपूर, अमरावती आणि अकोला ही विदर्भातील तीन सर्वात मोठी शहरे गत आठवड्यात तीन अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांनी हादरली. नागपुरात विदर्भातील सर्वात मोठ्या लॉटरी व्यापा-याची खंडणीसाठी नृशंस हत्या झाली.

नागपूर, अमरावती आणि अकोला ही विदर्भातील तीन सर्वात मोठी शहरे गत आठवड्यात तीन अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांनी हादरली. नागपुरात विदर्भातील सर्वात मोठ्या लॉटरी व्यापा-याची खंडणीसाठी नृशंस हत्या झाली. अमरावतीत एका युवतीचा, तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाºया युवकाने, दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृणपणे जीव घेतला. अकोल्यात, शहरातील सर्वात संवेदनशील भागात, पोलीस चौकीपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर असलेल्या दुकानाचा काही गुंडांनी रात्री ३ वाजता कुलपे तोडून बळजबरीने ताबा घेतला. नागपूर हे गृह खाते सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर, तर अकोला हे गृह खात्याचे राज्यमंत्री असलेल्या डॉ. रणजित पाटील यांचे गृह शहर! अमरावती हे त्या दोन्ही शहरांच्या मधोमध वसलेले शहर! या तीनही शहरांमध्ये पोलिसांचा किती वचक आहे आणि अपराधी किती निर्ढावले आहेत, याची प्रचिती एकाच आठवड्यात आली. सर्वच अपराध टाळणे निव्वळ अशक्य असते, हे अगदी मान्य! युरोप-अमेरिकेतील पोलीस अत्याधुनिक संसाधनांनी सुसज्ज असूनही, त्या देशांमध्येही अपराध घडतातच! त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण शून्यावर येण्याची अपेक्षा कुणीही करणार नाही. मात्र पोलिसांचा वचक, गुन्हा केल्यास पकडले जाण्याची व न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याची धास्ती या बाबीच अपराध्यांना लगाम घालण्यास सहाय्यभूत सिद्ध होत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. दुर्दैवाने अलीकडे पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचे सातत्याने जाणवत आहे. विशेषत: राज्याच्या उपराजधानीत तर गत काही काळापासून गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात तोंड वर काढले आहे. त्यातही गंभीर बाब ही आहे, की संघटित गुन्हेगारी वाढत चालली आहे. दुकानावर बळजबरीने ताबा किंवा लॉटरी व्यापाºयाची हत्या, हे संघटित गुन्हेगारीचेच प्रकार आहेत. व्यक्तिगत पातळीवरील गुन्हेगारीपेक्षा संघटित गुन्हेगारी हा अधिक चिंतेचा विषय आहे. संघटित गुन्हेगारीला वेळीच पायबंद न घातला गेल्यास, त्यामध्ये लिप्त असलेल्या अपराध्यांच्या कारवायांची संख्या व व्याप्ती वाढत जाते. त्यांना पायबंद घालण्यात पोलीस अपयशी ठरले, की अपराधी प्रवृत्तीच्या इतरांनाही प्रेरणा मिळते आणि तेदेखील टोळ्या बनवून अपराध करू लागतात. त्यातूनच पुढे टोळीयुद्धासारखे प्रकार घडतात आणि ‘डॉन’ जन्मास येतात. हे टाळायचे असल्यास अपराध्यांना वेळीच पायबंद घालणे अत्यंत गरजेचे आहे, हे ‘गुड गव्हर्नन्स’चे आश्वासन दिलेल्या सत्ताधाºयांनी लक्षात घ्यावे; अन्यथा ‘गुड गव्हर्नन्स’ऐवजी ‘गुंड गव्हर्नन्स’चे भोग सर्वसामान्यांच्या नशिबी येतील!

टॅग्स :GovernmentसरकारCrimeगुन्हा