शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

अवयवदानाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:15 AM

दान ही संकल्पना परमार्थाचे सर्वोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते.

दान ही संकल्पना परमार्थाचे सर्वोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते. परंतु यासंदर्भातील जागरुकतेचा अभाव, अज्ञान आणि विविध गैरसमजांमुळे या महान कार्यात लोकांचा अपेक्षित सहभाग अजूनही नाही. त्यामुळे अवयवदानाची वाढती गरज आणि दात्यांची तुटपुंजी संख्या यामधील वाढत चालेली तफावत ही फार मोठी समस्या आहे. ही तफावत दूर करण्याकरिता लोकांमध्ये जागरुकतेसोबतच रुग्णालयांमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा असणेही तेवढेच गरजेचे आहे. कारण बरेचदा अवयवदात्यांना रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा मार्गच मिळत नसल्याने अडचण होते. त्याअनुषंगाने नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला (मेयो) मेंदुमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला मंजुरी देण्याबाबत झालेला निर्णय अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारा आहे. या नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायव्हल सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पुढाकारास यश मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मेडिकलमध्ये दोन महिन्यांपूर्वीच हे केंद्र सुरू झाले आहे. याशिवाय नागपुरातील पाच खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणाची व्यवस्था आहे. आता अवयवदाते कसे वाढतील यासाठी प्रयत्नांना वेग द्यावा लागणार आहे. नागपुरात २०० वर हॉस्पिटल्स आहेत आणि येथे दररोज दोन ब्रेनडेड रुग्ण असतात. महिनाभरात किमान १५ अवयवदान व्हायला पाहिजेत. पण गेल्या तीन वर्षांचा आकडा बघितला तर या कालावधीत केवळ २४ ब्रेनडेड लोकांचेच अवयवदान होऊ शकले. देशभरातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने देशात दरवर्षी सुमारेचार चार लाख लोक मृत्युमुखी पडतात. कारण आजही आपल्या येथे अवयवदानाचे प्रमाण दहा लाख लोकांमागे केवळ ०.५ टक्केच आहे. एकट्या महाराष्टÑात हजारो रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. या सर्व लोकांनी अवयवदान केल्यास अवयवांची गरज पूर्ण होऊ शकते आणि अवयवांचा जो काळाधंदा केला जातो त्यालाही आळा बसेल. गरज आहे ती जनजागृती आणि प्रत्यारोपणास आवश्यक तत्पर यंत्रणेची. राज्य शासनाने दीडदोन वर्षांपूर्वी अवयवदान महाभियानास प्रारंभ केला होता. परंतु अवयवदानाची ही लोकचळवळ अधिक व्यापक व्हावी लागणार आहे.