शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अवयवदानाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:15 IST

दान ही संकल्पना परमार्थाचे सर्वोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते.

दान ही संकल्पना परमार्थाचे सर्वोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते. परंतु यासंदर्भातील जागरुकतेचा अभाव, अज्ञान आणि विविध गैरसमजांमुळे या महान कार्यात लोकांचा अपेक्षित सहभाग अजूनही नाही. त्यामुळे अवयवदानाची वाढती गरज आणि दात्यांची तुटपुंजी संख्या यामधील वाढत चालेली तफावत ही फार मोठी समस्या आहे. ही तफावत दूर करण्याकरिता लोकांमध्ये जागरुकतेसोबतच रुग्णालयांमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा असणेही तेवढेच गरजेचे आहे. कारण बरेचदा अवयवदात्यांना रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा मार्गच मिळत नसल्याने अडचण होते. त्याअनुषंगाने नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला (मेयो) मेंदुमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला मंजुरी देण्याबाबत झालेला निर्णय अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारा आहे. या नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायव्हल सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पुढाकारास यश मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मेडिकलमध्ये दोन महिन्यांपूर्वीच हे केंद्र सुरू झाले आहे. याशिवाय नागपुरातील पाच खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणाची व्यवस्था आहे. आता अवयवदाते कसे वाढतील यासाठी प्रयत्नांना वेग द्यावा लागणार आहे. नागपुरात २०० वर हॉस्पिटल्स आहेत आणि येथे दररोज दोन ब्रेनडेड रुग्ण असतात. महिनाभरात किमान १५ अवयवदान व्हायला पाहिजेत. पण गेल्या तीन वर्षांचा आकडा बघितला तर या कालावधीत केवळ २४ ब्रेनडेड लोकांचेच अवयवदान होऊ शकले. देशभरातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने देशात दरवर्षी सुमारेचार चार लाख लोक मृत्युमुखी पडतात. कारण आजही आपल्या येथे अवयवदानाचे प्रमाण दहा लाख लोकांमागे केवळ ०.५ टक्केच आहे. एकट्या महाराष्टÑात हजारो रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. या सर्व लोकांनी अवयवदान केल्यास अवयवांची गरज पूर्ण होऊ शकते आणि अवयवांचा जो काळाधंदा केला जातो त्यालाही आळा बसेल. गरज आहे ती जनजागृती आणि प्रत्यारोपणास आवश्यक तत्पर यंत्रणेची. राज्य शासनाने दीडदोन वर्षांपूर्वी अवयवदान महाभियानास प्रारंभ केला होता. परंतु अवयवदानाची ही लोकचळवळ अधिक व्यापक व्हावी लागणार आहे.