शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

अवयवदानाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:15 IST

दान ही संकल्पना परमार्थाचे सर्वोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते.

दान ही संकल्पना परमार्थाचे सर्वोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते. परंतु यासंदर्भातील जागरुकतेचा अभाव, अज्ञान आणि विविध गैरसमजांमुळे या महान कार्यात लोकांचा अपेक्षित सहभाग अजूनही नाही. त्यामुळे अवयवदानाची वाढती गरज आणि दात्यांची तुटपुंजी संख्या यामधील वाढत चालेली तफावत ही फार मोठी समस्या आहे. ही तफावत दूर करण्याकरिता लोकांमध्ये जागरुकतेसोबतच रुग्णालयांमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा असणेही तेवढेच गरजेचे आहे. कारण बरेचदा अवयवदात्यांना रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा मार्गच मिळत नसल्याने अडचण होते. त्याअनुषंगाने नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला (मेयो) मेंदुमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला मंजुरी देण्याबाबत झालेला निर्णय अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारा आहे. या नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायव्हल सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पुढाकारास यश मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मेडिकलमध्ये दोन महिन्यांपूर्वीच हे केंद्र सुरू झाले आहे. याशिवाय नागपुरातील पाच खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणाची व्यवस्था आहे. आता अवयवदाते कसे वाढतील यासाठी प्रयत्नांना वेग द्यावा लागणार आहे. नागपुरात २०० वर हॉस्पिटल्स आहेत आणि येथे दररोज दोन ब्रेनडेड रुग्ण असतात. महिनाभरात किमान १५ अवयवदान व्हायला पाहिजेत. पण गेल्या तीन वर्षांचा आकडा बघितला तर या कालावधीत केवळ २४ ब्रेनडेड लोकांचेच अवयवदान होऊ शकले. देशभरातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने देशात दरवर्षी सुमारेचार चार लाख लोक मृत्युमुखी पडतात. कारण आजही आपल्या येथे अवयवदानाचे प्रमाण दहा लाख लोकांमागे केवळ ०.५ टक्केच आहे. एकट्या महाराष्टÑात हजारो रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. या सर्व लोकांनी अवयवदान केल्यास अवयवांची गरज पूर्ण होऊ शकते आणि अवयवांचा जो काळाधंदा केला जातो त्यालाही आळा बसेल. गरज आहे ती जनजागृती आणि प्रत्यारोपणास आवश्यक तत्पर यंत्रणेची. राज्य शासनाने दीडदोन वर्षांपूर्वी अवयवदान महाभियानास प्रारंभ केला होता. परंतु अवयवदानाची ही लोकचळवळ अधिक व्यापक व्हावी लागणार आहे.