शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

शिर्डी विमानतळाच्या निमित्ताने नगर जिल्ह्याच्या विकासाच्या टेकआॅफला संधी

By सुधीर लंके | Updated: September 28, 2017 03:17 IST

एखाद्या राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले असा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याअर्थाने राज्य सरकारचे कौतुक केले पाहिजे.

शिर्डीत विमानाची ट्रायल लँडिंग यशस्वी झाली. नगर जिल्ह्यात पहिले विमान उतरले. १ आॅक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते या विमानतळाचे आता लोकार्पण होईल. एखाद्या राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले असा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याअर्थाने राज्य सरकारचे कौतुक केले पाहिजे.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना या विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला. त्यांनी या विमानतळाचे स्वप्न पाहिले होते. नंतर अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात २०१० मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. सुरुवातीला दोनशे कोटींचा खर्च झाल्यानंतर मध्यंतरी निधीअभावी काम बंद पडले होते. निधीसाठी आंतरराष्टÑीय स्तरावरील भागीदाराचा शोध सुरू झाला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारने आणखी शंभर कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काम पूर्णत्वास गेले. या विमानतळासाठी साई संस्थाननेही पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून दिले.नगर हा मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणारा जिल्हा. पण, येथे विमान पोहोचायला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे लागली. कोल्हापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या शहरांत विमानतळ आहे. अर्थात तेथे विमाने किती उतरतात? हा भाग वेगळा. पण, निदान सुविधा निर्माण झालेली आहे. नगर जिल्ह्यात तीही सुविधा नव्हती. शिर्डीचे विमानतळ झाले त्याचे श्रेय जिल्ह्यातील राजकारण्यांपेक्षा साईबाबांना द्यावे लागेल. कारण शिर्डीला गर्दी जमते म्हणून विमानतळ करणे अपरिहार्य बनले. नगरपेक्षाही जिल्ह्याबाहेरच्या नागरिकांना या विमानतळाची जास्त आवश्यकता होती. शिर्डीत रेल्वे यापूर्वीच पोहोचलेली आहे. आता विमान उतरले. शिर्डीतून सुरुवातीला देशांतर्गत विमानसेवा सुरू होईल. भविष्यात आंतरराष्टÑीय उड्डाणे होणार आहेत. त्यादृष्टीने धावपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे. या विमानतळासाठी कार्गो टर्मिनलची मंजुरीही घेण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात शिर्डीसोबतच नगर जिल्ह्याच्या टेकआॅफसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.विमानतळ आले, पण शिर्डी व जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणखी काही सुविधा निर्माण कराव्या लागतील. खुद्द शिर्डीतील हॉटेल व्यवसाय सध्या अडचणीत आहे. शिर्डीत मंदिराव्यतिरिक्त पर्यटनाच्या सुविधा नसल्याने अनेक भाविक साईसमाधीचे दर्शन घेऊन लगेचच परततात. त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. ग्राहकच नसल्याने आमच्या हॉटेल्सच्या खोल्या संस्थानने भाडेतत्त्वावर चालवायला घ्याव्यात असा आग्रह त्यातूनच स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शिर्डीत लेझर शोची निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी याबाबतच्या कल्पना मांडलेल्या आहेत. मात्र, त्यादृष्टीने अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. साईबाबांच्या समाधीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हा शताब्दी महोत्सव १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वीच शिर्डीचा कायापालट अपेक्षित होता. पण तसे घडलेले नाही. विमानतळ आल्याने नगर जिल्हा विभाजनानंतर जिल्ह्याचे नवीन मुख्यालय कोणते राहणार? यादृष्टीनेही शिर्डीकडे लक्ष केंद्रित होऊ शकते.

टॅग्स :Airportविमानतळ