शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

ब्रेक्झिटचा मार्ग मोकळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 05:30 IST

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर भारतविरोधी भूमिका घेतलेल्या मजूर पक्षाचा विजय भारतासाठी डोकेदुखी ठरला असता, त्यामुळे भारताने तरी हुजूर पक्षाच्या विजयाचे स्वागतच करायला हवे!

एखादा नेता आणि त्याची धोरणे कितीही वादग्रस्त असली, तरी तो देशाचे काहीतरी भले करेल, अशी आशा त्याने निर्माण केल्यास, त्याला संपूर्ण बहुमत देऊन त्याच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची संधी द्यायची, असे अलीकडे जगभरातील मतदारांनी ठरविले असल्याचे दिसते.

जगातील काही प्रमुख देशांमध्ये गत काही वर्षांत पार पडलेल्या निवडणुकांच्या निकालांवर नजर फिरविल्यास याची प्रचिती येईल. ब्रिटनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. ही निवडणूक फार लोकप्रिय नसलेल्या दोन नेत्यांभोवती केंद्रित झाली होती. कंझर्व्हेटिव्ह (हुजूर) पक्षाचे बोरिस जॉन्सन आणि लेबर (मजूर) पक्षाचे जेरेमी कॉर्बिन हे ते दोन नेते! दोघांपैकी एकाचीही लोकप्रिय नेत्यांमध्ये गणना करता येत नाही, पण ब्रिटनच्या अलीकडील इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण अशा ब्रेक्झिटच्या, अर्थात युरोपीयन संघातून बाहेर पडण्याच्या मुद्द्यावरील निर्णय घेण्यासाठीच जणू नियतीने त्या दोघांची निवड केलेली! जॉन्सन यांनी या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट अशी भूमिका घेतली होती. ब्रिटनने शक्य तेवढ्या लवकर युरोपीयन संघास सोडचिठ्ठी द्यावी, असे त्यांचे ठाम मत होते आणि निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ते जोरकसपणे मांडले. किंबहुना, ‘गेट ब्रेक्झिट डन’ हेच त्यांनी त्यांच्या प्रचाराचे घोषवाक्य बनविले होते. दुसऱ्या बाजूला जेरेमी कॉर्बिन यांनी अखेरपर्यंत ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिकाच घेतली नाही. या मुद्द्यावर ब्रिटनमधील जनमानस अत्यंत अस्वस्थ होते. युरोपीयन संघात असल्याने ब्रिटनचे खूप नुकसान होत असल्याच्या समजामुळे ब्रिटनने लवकरात लवकर युरोपीयन संघातून बाहेर पडायला हवे, असा ब्रिटिश जनतेचा सूर होता. जॉन्सन यांनी तो अचूक टिपला होता. मात्र, हाउस आॅफ कॉमन्समध्ये आवश्यक तेवढे बहुमत पाठीशी नसल्याने त्यांना ब्रेक्झिटचा प्रस्ताव मंजूर करून घेता आला नव्हता. त्यामुळे हाउस आॅफ कॉमन्स बरखास्त करून नव्याने निवडणुकीला सामोरे जाण्याचा जुगार त्यांनी खेळला आणि जिंकलाही! त्यांच्या पक्षाला भरीव बहुमत मिळाल्यामुळे, आता ब्रिटनला ३१ जानेवारीपूर्वी युरोपीयन संघातून बाहेर पडणे शक्य होईल.

जॉन्सन यांच्यापुढील खºया आव्हानाला त्यानंतर सुरुवात होईल. ब्रेक्झिटमुळे ब्रिटनचा लाभ होईल, असे जॉन्सन सांगत आहेत. कदाचित, त्यांचे म्हणणे खरेही ठरेल, पण ती भविष्यातील गोष्ट असेल. नीट बसलेली घडी जेव्हा अचानक विस्कटते, तेव्हा गोंधळ निर्माण होणे अनिवार्य असते आणि गोंधळ म्हटला की नुकसान ठरलेलेच! सबब ब्रेक्झिटमुळे सुदूर भविष्यात ब्रिटनला लाभ होणे गृहित धरले, तरी निकटच्या भविष्यात काही तोटे सहन करावेच लागतील. ब्रिटिश सरकारलाही त्याची कल्पना आहे. ब्रेक्झिटमुळे १५ वर्षांच्या कालावधीत ब्रिटनचा विकास किमान ६.७ टक्क्यांनी घटेल, असे अनुमान ब्रिटिश सरकारनेच बांधले आहे. विकास दर घटतो, तेव्हा आर्थिक मंदी, बेरोजगारीत वाढ, उद्योगधंदे बंद पडणे, कृषी क्षेत्राची वाढ खुंटल्याने शेतकरी वर्गाची नाराजी, असे अनेक दृश्य परिणाम समोर येत असतात. सरकारच्या एखाद्या धोरणाला भरीव समर्थन देणारा मतदार, झळा स्वत:पर्यंत पोहोचू लागताच, सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करू लागतो. भारत सध्याच्या घडीला त्याचा अनुभव घेत आहे. ब्रेक्झिटमुळे उद्या ब्रिटनमध्ये बेरोजगारी वाढली, उद्योगधंदे बंद पडले, कृषी क्षेत्राचा विकास अवरुद्ध झाला, तर ब्रिटनमधील जनमत जॉन्सन आणि हुजूर पक्षाच्या विरोधात जायला वेळ लागणार नाही. पत्रकारितेपासून प्रवास सुरू करून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेल्या जॉन्सन यांना ही बाब ध्यानात ठेवूनच पुढील प्रवास करावा लागणार आहे.

त्यामध्ये ते कितपत यशस्वी होतात, ब्रेक्झिटचे आव्हान किती समर्थपणे पेलतात, यावरच त्यांची पुढील कारकीर्द अवलंबून राहणार आहे. त्यांनी ब्रेक्झिटचे आव्हान यशस्वीपणे पेलल्यास ब्रिटनच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. मात्र, अपयशाचा शिक्का बसल्यास सर्वाधिक निंदानालस्ती झालेला नेता अशीच त्यांची नोंद होईल. जॉन्सन यांचा विजय भारतासाठी मात्र दिलासादायकच आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर भारतविरोधी भूमिका घेतलेल्या मजूर पक्षाचा विजय भारतासाठी डोकेदुखी ठरला असता, त्यामुळे भारताने तरी हुजूर पक्षाच्या विजयाचे स्वागतच करायला हवे!