शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उघड मतदान हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:30 IST

मतदान हा शब्दच मत आणि दान या दोन शब्दांनी परिपूर्ण झाला आहे़ जनता आपले मत दान स्वरूपात देते़ म्हणजेच कुठल्याही आमिषाला बळी पडून वा एखाद्या लाभासाठी

मतदान हा शब्दच मत आणि दान या दोन शब्दांनी परिपूर्ण झाला आहे़ जनता आपले मत दान स्वरूपात देते़ म्हणजेच कुठल्याही आमिषाला बळी पडून वा एखाद्या लाभासाठी मत दिले जाऊ शकत नाही़ ते सर्वार्थाने दान आहे़ शिवाय, तो मूलभूत हक्क आहे़ एकूणच हा उदात्त हेतू ठेवून निवडणुका होतात़ प्रत्यक्षात काय घडते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही़ याचा अर्थ पूर्णत: चुकीच्या दिशेने वा गैर होत आहे, असेही नाही़ मात्र बहुतांश मतांचे मूल्य जात, धर्म, प्रांत, भाषा आणि थेट पैशाच्या तराजूत तोलले जाते़ ज्यावर करडी नजर ठेवणारा निवडणूक आयोगही कारवाईला पुरेसा ठरत नाही़ एकवेळ जाहीर निवडणुका बहुतांशी आचारसंहितेच्या चौकटीत होतात़ मात्र जिथे जाणते लोकप्रतिनिधीच मतदार आहेत, तिथे मतांचे मूल्य कसे ठरते, ऐन मतदानादिवशीच अनुपस्थिती कशी राहते, पळवा-पळवी कशी होते, मतदारांना सहलीला कसे न्यावे लागते हा सर्व प्रकार लोकशाहीची थट्टा करणारा आहे़महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी सदस्य निवडून दिले गेले़ या निवडणुकीतील उमेदवारांना महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य यांनी मतदान केले़ काही अपक्ष वगळता विविध राजकीय पक्षांच्या तिकिटावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार होते़ स्वाभाविकच ज्या पक्षाचे मतदार अधिक त्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, अशी अपेक्षा असताना निकाल अचंबित करणारे आले़ स्वपक्षातील मतदारांचीसुद्धा खात्री नसल्याने मतदारांना सहलीला नेले़ मतदान गुप्त पद्धतीने असल्याने कोणी कोणाला मतदान केले हे कळत नाही़ परिणामी मते फुटली़शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांची संख्या मोठी असते़ त्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार एकतर ते लोकप्रतिनिधी आहेत, शिवाय संख्या अत्यंत कमी आहे़ त्यामुळे किमान या निवडणुकीपुरते मतदान उघडपणे करण्याची घटनात्मक तरतूद केली तर पळवा पळवी आणि मतांचे मूल्य जोखण्याचा व्यवहार बऱ्यापैकी थांबू शकेल़देशामध्ये सर्वच राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही़ घटक राज्यांचे वरिष्ठ सभागृह म्हटली जाणारी परिषद महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये घटनेच्या कलम १६९ (१) नुसार अस्तित्वात आली आहे़ विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी तसेच पदवीधर व शिक्षक मतदारांद्वारे विधानपरिषद सदस्य निवडून देतात़ राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला व समाजसेवेतील प्रख्यात लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात़ केंद्रामध्ये लोकसभेत व राज्यात विधानसभेत सर्वच घटकातील लोकप्रतिनिधी निवडले जातील, असे नाही हे गृहित धरून ज्येष्ठ व विविध क्षेत्रातील अनुभवी लोकांचे वरिष्ठ सभागृह म्हणून राज्यसभा व विधानपरिषद अस्तित्वात आली आहे़ त्यामध्ये विधानपरिषद जशी बहुमताने ठराव करून अस्तित्वात येते तशीच विधानसभेने ठराव केला तर विसर्जित होऊ शकते़ एकंदर विधान परिषदेच्या निवडणुकींचे राजकारण आणि बदलत असलेले अर्थकारण लक्षात घेता विधान परिषदेच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होत आहे़ राज्यातील जाणते नेतेही जाणतात की विधान परिषदेसाठी आर्थिक क्षमता लागते़ तरीही राजकारणातला जो काही चांगुलपणा टिकून आहे, त्याला चिकटून राहिले तरच विधान परिषद निवडणुका खºया अर्थाने यापुढे मूल्याधिष्ठित होत राहतील़- धर्मराज हल्लाळे