शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

केवळ नियतीचा घाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:28 IST

एखादी अनपेक्षित दु:खद घटना घडली, की नियतीचा घाला असे म्हणून आपण मोकळे होतो. कधी अशा घटना मानवी प्रयत्नांद्वारे टाळता येण्यासारख्या नसतात किंवा मानवी चुकीमुळे घडलेल्या नसतात.

एखादी अनपेक्षित दु:खद घटना घडली, की नियतीचा घाला असे म्हणून आपण मोकळे होतो. कधी अशा घटना मानवी प्रयत्नांद्वारे टाळता येण्यासारख्या नसतात किंवा मानवी चुकीमुळे घडलेल्या नसतात. अशा वेळी नियतीचा घाला या शब्दांत त्या घटनेचे वर्णन केले तर ते समजून घेता येईल; परंतु जेव्हा एखादी घटना निव्वळ मानवी चुकीमुळे, अक्षम्य हलगर्जीमुळे घडते, तेव्हा केवळ नियतीवर दोषारोपण करून कसे मोकळे होता होईल? अकोला जिल्ह्यातील आगर या गावातील एका कुटुंबावर सोमवारी असाच दुर्दैवी प्रसंग ओढवला. दिवसभर शेतात राब राब राबून मिळालेल्या मजुरीतून लेकरांसाठी कपडे खरेदी करण्याचे स्वप्न रंगवित असलेली तरुण महिला, तिचा अवघा १३ वर्षांचा मुलगा आणि इतर दोघांचा सोमवारी भल्यापहाटे नागपूरनजीक झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाचा फेरा असा, की ती तरुण महिला, तिचा मुलगा आणि इतर पाच जण ज्या आॅटोरिक्षातून शेतातून घरी परतत होते, त्या रिक्षाला विरुद्ध दिशेने येणाºया ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागल्याने अपघात झाला होता. त्या अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याने, अवघ्या काही तासांच्या अंतराने दुसरा अपघात झाला आणि त्यामध्ये चार जण दगावले. गंभीर बाब ही, की ज्या रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला तो रस्ता चौपदरी आहे. अशा रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन येणे अभिप्रेत नसते; मात्र ट्रकचालकाने चुकीच्या दिशेने ट्रक हाकला आणि जीवघेणा अपघात घडला. थोडक्यात, निव्वळ मानवी चूक व हलगर्जीमुळे अपघात घडून, चौघांना नाहक जीवास मुकावे लागले. या अपघातामुळे आम्हा भारतीयांच्या ‘ट्रॅफिक सेन्स’चा मुद्दा ऐरणीवर यायला हवा. संपूर्ण जगात भारतातील बेशिस्त वाहतूक कुप्रसिद्ध आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहतूक नियंत्रक दिव्यांकडे दुर्लक्ष, थोडासा वेळ आणि इंधन वाचविण्यासाठी दुभाजक असलेल्या रस्त्यांवर चुकीच्या दिशेने वाहन हाकणे, दुभाजक नसलेल्या रस्त्यांवर उजव्या बाजूला वळण्यासाठी आपले वाहन रस्त्याच्या पार उजव्या बाजूला नेणे, इतरांची पर्वा न करता रस्त्यात कुठेही वाहन उभे करणे, जड वाहने उजव्या लेनमधून हाकणे, रस्त्यांवर कोंडाळे करून गप्पा मारणे, असे नाना दुर्गुण बहुतांश भारतीयांच्या अंगी पुरेपूर भिनले आहेत. अशाच एखाद्या दुर्गुणामुळे कधी तरी असा भीषण अपघात घडतो. त्यात काही जीवानिशी जातात, काही कायमचे पंगू होतात आणि आम्ही मात्र नियतीवर दोष ढकलून मोकळे होतो!

टॅग्स :Accidentअपघात