शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

केवळ चित्तथरारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:15 IST

दिनेश कार्तिकने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पाडव्याची गोडी दुप्पट केली. अवघ्या आठ चेंडूंवर दोन चौकार आणि तीन षटकारांसह २९ धावांचा झंझावात हा केवळ आणि केवळ चित्तथरारक असाच होता.

दिनेश कार्तिकने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पाडव्याची गोडी दुप्पट केली. अवघ्या आठ चेंडूंवर दोन चौकार आणि तीन षटकारांसह २९ धावांचा झंझावात हा केवळ आणि केवळ चित्तथरारक असाच होता. प्रतिभा असलेला, पण संधीअभावी देदीप्यमान कामगिरीत अपयशी ठरलेल्या दिनेश कार्तिकने संधी मिळताच तिचे सोने केले. दिग्गजांना हेवा वाटेल अशी कामगिरी केली. शेवटच्या दोन षटकांमध्ये ३४ धावा हव्या होत्या. १९ चेंडू टोलवित १७ धावा करणाऱ्या विजय शंकरला मोठे फटके मारण्यात अपयश येत असल्याचे दिसताच भारताने सामना गमावला असे अनेकांचे मत बनले होते. पण दिनेश कार्तिकने बांगलादेशच्या तोंडातून विजयाचा घास अक्षरश: हिसकावून घेतला. सामना संपताच प्रसारमाध्यमांनी दिनेश कार्तिकला डोक्यावर घेतले. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या करिश्म्यात झाकोळला गेलेला खेळाडू असेच दिनेश कार्तिकचे वर्णन केले गेले, तेही या विजयाच्या पार्श्वभूमीवर योग्य वाटते. कार्तिक तसा नशीबवान म्हणावा लागेल. आयपीएलमुळे त्याची प्रतिभा नजरेपुढे येत राहिली. धोनी निवृत्त झाल्यावर तरी किमान आपल्या प्रतिभेला मोठा वाव मिळू शकतो असा आशावाद बाळगून कार्तिक मैदानात आहे. दिनेश कार्तिक यापुढेही खेळत राहील. नवे विक्रम रचेल, परंतु बांगलादेशविरोधात निदाहास ट्रॉफीच्या निर्णायक सामन्यात अखेरच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारा क्षण कार्तिकची ओळख ठरेल यात शंका नाही. हा क्षण त्याला आणि तमाम क्रिकेटप्रेमींना आयुष्यभर सुखद साथ देणारा असेल. न डगमगता जिगरबाज फटकेबाजी करणाºया कार्तिकने देशाला विजय मिळवून दिला नसता तर अंतिम फेरीपर्यंतचा भारताचा प्रवास हा व्यर्थच ठरला असता. सौम्या सरकारच्या चेंडूवर क्रिकेटच्या भाषेत ‘पॅरलल’ षटकार खेचून कार्तिकने बांगलादेश संघाच्या उन्मादाला ठोस उत्तर दिले. त्याआधीचे काही क्षण कर्णधार रोहित शर्मासाठी निराशादायी होते. अखेरच्या चेंडूवर पाच धावा निघणार की नाही म्हणून त्याने कार्तिकचा हा थरारक फटका पाहिलाच नाही. कार्तिकने मात्र अशक्य ते शक्य करून दाखविले. त्यामुळेच हा निर्णायक षटकार पुढील अनेक वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात राहील. फलंदाजी, यष्टिरक्षण आणि क्षेत्ररक्षणात तरबेज असलेल्या कार्तिकला आता नियमित खेळाडू या नात्याने संघात स्थान मिळावे, अशी चर्चा रंगणार आहे. नियमितपणे स्थान मिळण्यासारखे त्याचे कर्तृत्वदेखील आहेच. पण भारतीय क्रिकेटमध्ये नियमितपणे स्थान मिळविणे हे मोठे अवघड आव्हान. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण काय चीज आहोत, हे दाखवून देण्याची कला कार्तिककडून शिकावी, हा आदर्शपाठ कालच्या त्याच्या कामगिरीतून घडला, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Dinesh Karthikदिनेश कार्तिकNidahas Trophy 2018निदाहास ट्रॉफी २०१८