शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

एक शिक्षक, एक शहाणं गाव... आणि एक शाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 07:38 IST

‘वर्ल्ड‌स‌् बेस्ट स्कूल २०२५’ या पुरस्काराच्या लघुयादीतील ४ भारतीय शाळांमध्ये एक आहे जालिंदरनगरची जि.प. प्राथमिक शाळा. या शाळेच्या प्रवासाबद्दल...

दत्तात्रय वारे, शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा

जालिंदरनगर, ता. खेड, जि. पुणे

जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की तिची एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. गळकी कौले, पडकी इमारत, मोडकी बाके आणि दुरवस्था… ही प्रतिमा सपशेल चुकीची असते असेही नाही. मला अशा दोन शाळांमध्ये काम करायची संधी मिळाली. सहसा अशी शाळा म्हणून नाक मुरडणे ही शिक्षकांची पहिली आणि स्वाभाविक प्रतिक्रिया असेल तर त्यात आश्चर्य काही नाही; मी मात्र ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि बदलाची सुरुवातही तिथूनच झाली.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात जालिंदरनगर हे लहानसे गाव. इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत माझी बदली झाली तेव्हा शाळा बंद पडण्याच्या यादीत होती. पटसंख्या अवघी तीन  होती. तिथून पुढे वर्षभरात शाळेची पटसंख्या १२०वर जाऊन पोहोचली  आणि ‘मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा’ स्पर्धेत सर्वोत्तम ठरली. त्यापूर्वी मी वाबळेवाडीच्या शाळेत काम केले, तिथे पटसंख्या ३२ होती, शाळा म्हणजे दोन गळक्या खोल्या होत्या. दोन-अडीच वर्षांनी तिथे प्रवेश मिळवण्यासाठी ५००० मुलांची ‘वेटिंग लिस्ट’ लागली. - हा चमत्कार तुम्ही कसा काय करता?- असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. त्यावर माझे उत्तर आहे - शिक्षकाचे प्रामाणिक, तळमळीचे प्रयत्न आणि जबाबदार लोकसहभाग!

प्राथमिक शाळेचा शिक्षक ही व्यक्ती गावात केंद्रस्थानी असते. ‘नजरेत’ही असते. या  शिक्षकाला शाळा, विद्यार्थी, गाव, ग्रामस्थ यांच्याप्रति प्रामाणिक तळमळ आणि आत्मीयता उपजतच असली पाहिजे. तिचे ढोंग करता येत नाही. शिक्षक तळमळीचा असेल आणि त्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि तिथून शाळेच्या कायापालटाला सुरुवात होते.

वाबळेवाडीमध्ये शाळेला चांगली इमारत, त्यासाठी पुरेशी जागा हवी, असे आम्ही म्हणताच ग्रामस्थांनी दीड एकर जागा शाळेला बक्षीसपत्र करून दिली. त्या जागेची ‘मार्केट व्हॅल्यू’ सात ते आठ कोटी रुपयांच्या घरात होती. तिथून जवळच असलेल्या एका माजी आमदाराच्या शाळेच्या पटसंख्येवर आमच्या शाळेमुळे परिणाम होऊ लागल्यावर आमदार महोदयांनी शाळेला सर्वतोपरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ग्रामस्थ शाळेच्या पाठीशी उभे राहिले आणि ग्रामसभेत ठराव करून आमदारालाच गावबंदी केली. गावातील मुलांना चांगले शिक्षण देणारी आपली शाळा असावी, या लोकभावनेतूनच हे शक्य झाले.

सरकारी शाळा म्हटले की, ‘त्या शाळा ही सरकारची जबाबदारी’ ही अपेक्षा चुकीची नाही. पण सरकारच्या अखत्यारीत एक लाखांहून जास्त शाळा आहेत. सगळ्यांना देण्यासाठी निधी तरी सरकारकडे आहे की नाही कोणास ठाऊक? अशा परिस्थितीत ‘सरकार येईल आणि शाळा सुधारेल’ अशी अपेक्षा न करता शिक्षकानेच ग्रामस्थांच्या मदतीने हे करणे हा एकमेव मार्ग मला तरी दिसतो.

जालिंदरनगरच्या शाळेत काय नाही? इथले विद्यार्थी इंटिग्रेटेड आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीचे शिक्षण घेतात. इथे २२ पेक्षा जास्त कौशल्ये शिकवली जातात. रोबोटिक्स, भारतीय आणि परदेशी भाषा, मेकॅनिक्स, कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स, प्लंबिंग, कारपेंटरी, ज्वेलरी मेकिंग अशा कितीतरी गोष्टी इथली मुले शिकतात. इस्रोबरोबर शाळेचे टाय-अप आहे. पॅराशूट, प्रत्यक्ष लाँचसाठी तयार उपग्रह क्युब सॅट, रॉकेट आणि त्यासाठी लागणारे इंधन, ॲस्ट्रो फिजिक्स अशा विषयांची मुलांना माहिती आहे. हे करण्यासाठी शिक्षकाचे समर्पण, प्रामाणिक मेहनत ही मात्र सगळ्यांत आवश्यक ‘टुल्स’ आहेत. ती असतील तर काहीही अशक्य नाही.

२८ वर्षे मी शिक्षकी पेशात आहे. अनेक मुले या काळात हाताखालून गेली. हल्ली आपल्या घरातील व्यक्तीचीही खात्री आता देता येत नाही; पण या सगळ्या विद्यार्थ्यांची मी खात्री देऊ शकतो की ते कधीही चुकीचे वागणार नाहीत. भ्रष्टाचार करणार नाहीत. त्यांना निराशा येणार नाही असे नाही; पण आलीच तर निराशेच्या भरात कुठलेही चुकीचे पाऊल ती मुले उचलणार नाहीत.

 एक चांगला, तळमळीचा शिक्षक आणि त्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारे शहाणे गाव यांची एकत्रित तयारी असेल तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे!

                dattajiware@gmail.com

                (शब्दांकन : भक्ती बिसुरे)