शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

सावकारी कर्जमाफीचे एक कोटी परत जाणार

By admin | Updated: July 7, 2015 22:39 IST

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने खासगी सावकारांकडून ३० जूनपर्यंत प्रस्ताव मागविले होते. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सर्व तालुकास्तरावरील उपनिबंधक कार्यालयांना सूचना दिली होती.

दिलीप दहेलकर, गडचिरोलीशेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने खासगी सावकारांकडून ३० जूनपर्यंत प्रस्ताव मागविले होते. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सर्व तालुकास्तरावरील उपनिबंधक कार्यालयांना सूचना दिली होती. मात्र, ३० जूनपर्यंत सावकारांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे एकही प्रस्ताव दाखल झाला नाही. एकाही शेतकऱ्यावर कर्ज नाही, असे जिल्ह्यातील सावकारांनी उपनिबंधकांना कळविले आहे. त्यामुळे शासनाकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बीडीएसवर प्राप्त एक कोटी रुपये परत जाणार आहेत. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकरी आत्महत्यांमागील प्रमुख कारण असल्याचे विविध समित्यांच्या अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात गणना असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधित तालुक्याच्या सहकारी संस्थांचे सहायक निबंधकांकडे ३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे होते. मात्र, ३० जूनपर्यंत एकाही परवानाधारक शेतकऱ्याचा प्रस्ताव दाखल झाला नाही. जिल्ह्यात देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा व गडचिरोली या चार तालुक्यांत एकूण ५६ परवानाधारक खासगी सावकार आहेत. कर्जमाफीच्या निर्णयाची माहिती या सावकारांना देऊन विहित मुदतीत, विहित नमुन्यात सहायक उपनिबंधकाकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यावर आमचे कर्ज नाही, आम्ही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही, असे सावकारांनी उपनिबंधकांना सांगितले. त्यामुळे जिल्ह्याला प्राप्त एक कोटी रुपये शासनाला परत जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी सहकारी संस्था गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक गणवीर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.४शेतकरी आत्महत्येसाठी सावकारांकडील कर्ज कारणीभूत असल्याचा दावा करून शासनाने सावकारांकडील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात देसाईगंज येथील काही सावकारांनी न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या शासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.