शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी कर्जमाफीचे एक कोटी परत जाणार

By admin | Updated: July 7, 2015 22:39 IST

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने खासगी सावकारांकडून ३० जूनपर्यंत प्रस्ताव मागविले होते. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सर्व तालुकास्तरावरील उपनिबंधक कार्यालयांना सूचना दिली होती.

दिलीप दहेलकर, गडचिरोलीशेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने खासगी सावकारांकडून ३० जूनपर्यंत प्रस्ताव मागविले होते. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सर्व तालुकास्तरावरील उपनिबंधक कार्यालयांना सूचना दिली होती. मात्र, ३० जूनपर्यंत सावकारांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे एकही प्रस्ताव दाखल झाला नाही. एकाही शेतकऱ्यावर कर्ज नाही, असे जिल्ह्यातील सावकारांनी उपनिबंधकांना कळविले आहे. त्यामुळे शासनाकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बीडीएसवर प्राप्त एक कोटी रुपये परत जाणार आहेत. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकरी आत्महत्यांमागील प्रमुख कारण असल्याचे विविध समित्यांच्या अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात गणना असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधित तालुक्याच्या सहकारी संस्थांचे सहायक निबंधकांकडे ३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे होते. मात्र, ३० जूनपर्यंत एकाही परवानाधारक शेतकऱ्याचा प्रस्ताव दाखल झाला नाही. जिल्ह्यात देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा व गडचिरोली या चार तालुक्यांत एकूण ५६ परवानाधारक खासगी सावकार आहेत. कर्जमाफीच्या निर्णयाची माहिती या सावकारांना देऊन विहित मुदतीत, विहित नमुन्यात सहायक उपनिबंधकाकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यावर आमचे कर्ज नाही, आम्ही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही, असे सावकारांनी उपनिबंधकांना सांगितले. त्यामुळे जिल्ह्याला प्राप्त एक कोटी रुपये शासनाला परत जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी सहकारी संस्था गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक गणवीर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.४शेतकरी आत्महत्येसाठी सावकारांकडील कर्ज कारणीभूत असल्याचा दावा करून शासनाने सावकारांकडील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात देसाईगंज येथील काही सावकारांनी न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या शासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.