शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

एक बार कमिटमेण्ट...

By admin | Updated: April 25, 2016 03:34 IST

केवळ सरकार किंवा देशातील सरकारी बँकाच नव्हे, तर संपूर्ण देशाच्याच हातावर तुरी देऊन विदेशी पलायन करते झालेले मद्यसम्राट खासदार विजय मल्ल्या यांना भारतात आणून देशाच्या

केवळ सरकार किंवा देशातील सरकारी बँकाच नव्हे, तर संपूर्ण देशाच्याच हातावर तुरी देऊन विदेशी पलायन करते झालेले मद्यसम्राट खासदार विजय मल्ल्या यांना भारतात आणून देशाच्या न्यायव्यवस्थेच्या पुढ्यात हजर करण्याबाबत सरकार ‘कमिटेड’ म्हणजे वचनबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने ठासून जाहीर केले आहे. कदाचित त्याची सुरुवात म्हणूनच की काय आधी त्यांचे राजनैतिक पारपत्र रद्द केले गेले व त्यानंतर त्यांच्या नावे अजामीनपात्र पकड वॉरण्ट जारी केले. पण त्यापायी टस से मस न झालेले मल्ल्या विलायतेतून देशातल्या सरकारी बँकांना तडजोडीसाठी आधी दिलेल्या देकारात दहा-पाच कोटी वाढवित जाण्याचा उद्योग करीत आहेत. पूर्वी काही महिला जुन्या कपड्यांवर कोमट्याकडून भांडी घेताना हळूचकन एकेक कपडा त्याच्या पुढ्यात टाकीत त्यासारखाच हा उद्योग. मुद्दा इतकाच की, भारत सरकार जे काही जाहीर करीत आहे त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होताना दिसत नाही. आणि होईल तरी कसा? परदेशात बसून आपले सारे व्यवहार सुरळीतपणे पार पाडणाऱ्या अनेकांना असेच मुसक्या बांधून देशाच्या न्यायसंस्थेपुढे हजर करण्याच्या ‘कमिटमेण्ट्स’ सरकारमार्फत करून झाल्या आहेत. त्या प्रत्येकवेळी प्रत्यक्षात उतरल्या असत्या तर दाऊद इब्राहीम, टायगर मेमन, नदीम शेख, जेम्स लेन, ललित मोदी आणि तत्सम थोर मंडळी एव्हाना येरवडा, आॅर्थर, नागपूर वा तत्सम जागी सरकारी पाहुणचार घेताना दिसली असती. पण तसे काहीही होऊ शकलेले नाही व होण्याची शक्यताही दिसत नाही. विजय मल्ल्या तर या साऱ्यांहून कितीतरी पटींनी अधिक थोर आहेत. ते देशाचे ‘कायदाकर्ते’ आहेत आणि तशांनी त्यांचा खिसा आधीच जडही केलेला आहे.